शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

प्राथमिक आरोग्य केंद्रे वाऱ्यावर

By admin | Updated: July 5, 2014 23:49 IST

राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत डॉक्टरांनी संप पुकारल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रे वाऱ्यावर आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल होत असून रुग्ण दगावण्याचे प्रकार घडत आहेत.

रूग्णांचे हाल : डॉक्टरांच्या संपाचा ग्रामीण जनतेला बसतोय फटकावणी : राज्यभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत डॉक्टरांनी संप पुकारल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रे वाऱ्यावर आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल होत असून रुग्ण दगावण्याचे प्रकार घडत आहेत.जिल्हा परिषदेच्या अधिनस्त येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कार्यरत डॉक्टरांनी त्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यव्यापी संप पुकारला आहे. राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या आवाहनानुसार या संपात प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉक्टर सहभागी झाले आहेत. परिणामी ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र वाऱ्यावर आहेत. ऐन पावसाळ्याच्या दिवसांत डॉक्टरांनी संप पुकारल्याने साथ रोगांची लागण झाल्यास भयावह अवस्था निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य याच प्राथमिक आरोग्य केंदांवर अवलंबून असते. ग्रामीण भागात आधीच आरोग्याच्या तोकड्या सुविधा असतात. लहान गावांमध्ये तर खासगी डॉक्टरांचेही दवाखाने नसतात. केवळ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रावरच त्यांची आरोग्याची मदार असते. परिसरातील अनेक गावे या केंद्र आणि उपकेंद्रांना जोडलेली असतात. याच केंद्र व उपकेंद्रातून ग्रामीण जनतेच्या आरोग्याची काळजी वाहिली जाते. आता याच प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णांचे बेहाल होत आहे. ऐन खीरपाच्या हंगामात ग्रामीण जनतेवर ही वेळ ओढवली आहे. खरीपात शेतकरी आणि मजुरांची सर्वत्र लगबग असते. या चारच महिन्यात त्यांना वर्षभराची तजवीज करावी लागते. मजुरांना आता निंदण, खुरपणीची कामे मिळतात. मात्र यावर्षी अद्याप दमदार पाऊस आल्याने तूर्तास निंदण, खुरपण, डवरणीची कामे रखडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह मजुरांचेही हाल होत आहे. त्यात ग्रामीण भागात आता कुणी आजारी पडल्यास त्यांना आरोग्य सेवा मिळणेही कठीण झाले आहे. गावांमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन रुग्ण परत येत आहे. त्यांना उपचार मिळणे कठीण झाले आहे. बऱ्याच रुग्णांना शहरात येऊन खासगी डॉक्टरांकडून उपचार करवून घेणे अशक्य झाले आहे. त्यासाठी पैसा खर्च करण्याइतपतही अनेकांची पत नाही. आरोग्य केंद्रातून तातडीने सुविधा मिळत असल्याने ग्रामीण भागातील जनतेचा त्याकडे ओढा असतो. मात्र आता खुद्द डॉक्टरच संपावर गेल्याने ही प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे वाऱ्यावर सापडली आहेत. केवळ सहायक कर्मचारी आणि परिचारीकांच्या भरवशावर ती सुरू आहेत. परिणामी ग्रामीण रुग्णांचे आरोग्यच धोक्यात सापडले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)