शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
4
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
5
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
6
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
7
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
8
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
9
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
10
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
11
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
12
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
13
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
14
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
15
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
16
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
17
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
18
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
19
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
20
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?

प्राथमिक शिक्षणाधिकारी सक्तीच्या रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 21:50 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत पारित झाला.

ठळक मुद्देजिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत ठराव पारित : पोषण आहार, शिक्षक निलंबन गाजले

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाºयांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत पारित झाला. या सभेत सदस्यांनी पोषण आहार, शिक्षकांचे निलंबन, बदल्या आदींवरून शिक्षण विभागावर थेट हल्लाबोल केला. त्यामुळे ही सभा प्रचंड वादळी ठरली.जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांच्या अध्यक्षतेखालील सभेची सुरूवातच शिक्षण विभागापासून झाली. शिक्षण समितीत ठराव घेताना सर्वच अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाºयांना असल्याचे सांगून शिक्षणाधिकारी सदस्यांची दिशाभूल करतात, असा आरोप सदस्यांनी केला. सर्वच अधिकार सीईओंना असतील, तर सदस्य आणि समित्यांचे कामच काय, असा प्रश्नही त्यांनी केला. अनेक शाळांमध्ये सुविधा नाहीत, लोहारा येथील दोन पाळीतील शाळा एकाच पाळीत कुणाच्या आदेशावरून करण्यात आली, आदी प्रश्नांची सरबत्ती सदस्यांनी केली.हिवरी-अकोलाबजार सर्कलच्या सदस्य रेणूताई शिंदे यांनी अकोलाबाजार येथील शाळेचे वास्तव मांडले. यांनी या शाळेत चक्क एक्सपायरी झालेल्या साहित्याची खिचडी विद्यार्थ्यांना दिले जाते, असा आरोप केला. त्याची सत्यता पटवून देण्यासाठी त्यांनी चक्क एक्सपायरी डेट उलटलेल्या काही साहित्याचे पुडेच सभागृहात सादर केले. त्यात मसाल्याच्या पाकिटवर चक्क दहा महिन्यांपूर्वीची एक्सपायरी डेट होती. तोच मसाला अद्याप खिचडीत वापरण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.अकोलाबाजार शाळेतील स्वयंपाकगृहात प्रचंड अस्वच्छता असल्याचा आरोप रेणूताई शिंदे यांनी केला. तेथील खिचडी बणविण्याचे गंज जंगलेले आहेत. इतर भांडी अत्यंत अस्वच्छ असल्याचे आढळले, असा घणाघात त्यांनी केला. त्यावर शिक्षणाधिकारी निरूत्तर झाल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले.अशोक कठाणे नामक शिक्षकाच्या निलंबनाचा मुद्दा यावेळी उपस्थित झाला. त्यांच्याविरूद्ध पोलिसांनी अहवाल मागूनही का दिला गेला नाही. त्यांना तीन वर्षे निलंबित ठेवून मानसीक व आर्थिक त्रास का देण्यात आला. यात शिक्षणाधिकाºयांची चूक असून तुम्ही राजीनामा द्या, अशी मागणी सदस्यांनी शिक्षणाधिकाºयांना केली. तसेच त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव सभागृहात पटलावर ठेवला. त्यांची बदली होईपर्यंत अधिकार गोठवावे, अशी मागणीही लावून धरली. त्यामुळे अध्यक्षांनी अखेर १० मिनीटांसाठी सभा तहकूब केली. नंतर सभा पुन्हा सुरू होताच शिक्षणधिकाºयांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव पटलावर ठेवण्यात आला. तो पारित झाल्याचे अध्यक्षांनी घोषित केल्यानंतरच सभागृहातील वादळ शांत झाले.१० मिनिटांच्या नावाखाली एक तास तहकूबअध्यक्षांनी केवळ १० मिनीटांसाठी सभा तहकूब केली. तीसुद्धा एका सदस्याच्या मागणीवरून. मात्र १० मिनीटांऐवजी चक्क एक तास सभा तहकूब राहिली. तोपर्यंत अध्यक्षांच्या दालनात सर्व पदाधिकारी व काही सदस्यांची याच मुद्यावरून चर्चा सुरू होती. तेथे सीईओंनाही पाचारण करण्यात आले. नंतर प्रथम सीईओ परतले. त्यानंतर पदाधिकारी अन् अध्यक्ष परतल्या. परिणामी एक तासाने तहकूब सभा पुन्हा सुरू झाली. यात मनरेगामधील अपहार, सदस्यांना वाढीव मानधन, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, मुख्याध्यापकांनी केलेली अफरातफर, जनावरांच्या शेडसाठी वाढीव निधी आदींवरून वादळी चर्चा झाली.