शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

तुरीचे दर पडलेलेच अन् तूरडाळ उसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 13:14 IST

रेशन दुकानातील तूरडाळीच्या दरात वाढ झाली. हे दर वाढताच खुल्या बाजारात तूरडाळीचे दर ८० रूपयांवर पोहचले आहे.

ठळक मुद्देनफा व्यापाऱ्यांच्याच घशात रेशनची डाळ महागताच व्यापाऱ्यांनी दर वाढविले

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रेशन दुकानातील तूरडाळीच्या दरात वाढ झाली. हे दर वाढताच खुल्या बाजारात तूरडाळीचे दर ८० रूपयांवर पोहचले आहे. विशेष म्हणजे, तूरडाळीसाठी वापरल्या जाणाऱ्या तुरीचे दर जैसे थे आहे. तरी व्यापाऱ्यांनी तूरडाळीचे दर किलोमागे २० रूपयांनी वाढविले आहेत. त्यामुळे अव्वाच्या सव्वा नफा व्यापाऱ्यांच्या पदरात पडला आहे. तर शेतकऱ्यांचा नाहक बळी गेला.गरिबांनाही तूरडाळ खरेदी करता यावी म्हणून रेशन दुकानामधून तूरडाळ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. ही तूरडाळ मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची प्रक्रिया वाढली. याच सुमारास पुरवठा विभागाने डाळीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. याच्या अंमलबजावणीचे आदेश राज्यभरातील पुरवठा विभागात धडकले आहेत. यामुळे रेशनवरची तूरडाळ १५ रूपयांनी महाग होणार आहे.दोन वर्षांपूर्वी तूरडाळ १४० रूपये किलोवर पोहोचली होती. गरीब कुटुंबांना ही डाळ खरेदी करणे म्हणजे स्वप्न ठरले होते. राज्यशासनाने हस्तक्षेप करून स्वस्तधान्य दुकानातून तूरडाळ देण्याचा निर्णय घेतला. ४० रूपये किलो दराने तूरडाळीचा पुरवठा सुरू झाला. यामुळे नागरिकांची पहिली पसंती तूरडाळीला मिळाली. रेशन दुकानातून तूरडाळ खरेदीचे प्रमाण वाढले.तूरडाळीची मागणी रेशन दुकानात वाढल्याने याचा फटका व्यापाऱ्यांना बसला. झालेले नुकसान भरून काढण्यासाठीच व्यापाऱ्यांनी नवीन खेळी केली आहे. स्वस्तधान्य दुकानातील ४० रूपये किलोची तूरडाळ ५५ रूपये किलो झाली. यामध्ये किलोमागे १५ रूपयांची वाढ करण्यात आली. याच संधीचा फायदा घेत तूरडाळ व्यापाऱ्यांनी खुल्या बाजारात तूरडाळीचे दर ६५ रूपयांवरून ८५ रूपयांवर नेले.क्विंटलमागे दोन हजारांचा नफाज्या तुरीपासून डाळ तयार होते, त्या तुरीचे दर ४७०० ते ५००० रूपये क्विंटल आहे. एका क्विंटलपासून ७२ किलो डाळ तयार होते. २८ किलोचे बेसन आणि कनोर मिळते. त्याचे पैसे वेगळे. ७२ किलो तूरडाळीचे पैसे आणि २८ किलो बेसन आणि कनोर याचा सध्याचा दर धरला तर क्विंटलमागे दोन हजार रूपयांचा फायदा व्यापाऱ्यांना होत आहे. विशेष म्हणजे, एक क्विंटल तूरडाळीवर प्रक्रिया करण्यासाठी विजेचा खर्च नगण्य आहे. शेतकऱ्यांना वर्षभर घाम गाळून जो नफा मिळाला नाही, तो नफा काही तासात व्यापाऱ्यांनी खिशात पाडून घेतला आहे.

टॅग्स :agricultureशेती