शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

उसाला २२०० रुपये भाव देणार

By admin | Updated: November 10, 2016 01:39 IST

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी २२०० रुपये प्रतिटन भाव मिळणार आहे. तशी घोषणा वसंतचे चेअरमन माधवराव पाटील जळगावकर यांनी केली.

शेतकऱ्यांना दिलासा : वसंत कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभमुळावा : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी २२०० रुपये प्रतिटन भाव मिळणार आहे. तशी घोषणा वसंतचे चेअरमन माधवराव पाटील जळगावकर यांनी केली. वसंत सहकारी साखर कारखान्याच्या ४५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ माधवराव पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. माधवराव पाटील गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी म्हणाले, आम्ही २१०० रुपये प्रतिटन भाव देण्याचे परिपत्रक काढले. परंतु शेजारच्या महागाव येथील नॅचरल शुगर व हदगावचा भाऊराव सहकारी साखर कारखाना २२०० रुपये प्रतिटन भाव देत आहे. त्यामुळे सभासदांच्या भावना लक्षात घेवून वसंत साखर कारखानासुद्धा प्रतिटन २२०० रुपये भाव देईल. यावेळी दोन लाख टन उसाचे गाळप झाले पाहिजे, हे आमचे उद्दिष्ट असून शेतकऱ्यांनी वसंतलाच ऊस देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केली. यावेळी संचालक मंडळाचीही अविरोध निवड पार पडली. कारखान्याचे उपाध्यक्ष कृष्णा पाटील देवसरकर यांनी मनोगत व्यक्त केले. २०१५-१६ मध्ये सर्वाधिक ऊस पुरवठा करणाऱ्या बाजीराव कदम, मारोती पतंगे, खंडबाराव लोखंडे आदी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.शुभारंभ कार्यक्रमाला संचालक चितांगराव कदम, आनंद चिकणे, भीमराव पाटील चंद्रवंशी, तातेराव चव्हाण, अरुण भालेराव, रमेश चौधरी, सुभाष जाधव, नाना चव्हाण, विलास मोरे, सरपंच सविता कदम, कल्याणराव माने, गणेश शिंदे, साहेबराव खडसे, शिवाजीराव देशमुख, शिवप्रसाद सूर्यवंशी, शरद पुरी, अनंत कदम, अभिलाष नाईक, राजेंद्र हाडप, पुंडलिक बडे यांच्यासोबत कंत्राटदार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)