शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

७०० कोटी वाटपापूर्वी कर्ज वितरण गुंडाळण्याची तयारी

By admin | Updated: August 12, 2016 02:05 IST

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँकांची उदासीनता अद्यापही कायम असून ७०० कोटी

सहकार बैठकीकडे पाठ : बँका म्हणतात, कर्ज वाटपाचे लाभार्थी संपले! यवतमाळ : खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँकांची उदासीनता अद्यापही कायम असून ७०० कोटी रुपयांच्या वाटपापूर्वीच कर्ज वितरण प्रक्रिया गुंडाळण्याच्या हालचाली आहे. यात राष्ट्रीयकृत बँका आघाडीवर असून सहकार विभागाच्या बैठकीकडेही या बँकांनी पाठ फिरविल्याची माहिती पुढे आली आहे. खरीप हंगामात जिल्ह्याला १७३६ कोटी ७९ लाख रुपयांचे कर्ज वितरित करायचे होते. प्रत्यक्षात बँकांनी १०६४ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. उद्दीष्टाच्या ६१ टक्के कर्ज वितरण केले आहे. यानंतरही तब्बल ७०० कोटी रुपयांचे कर्ज बँकांनी वितरित केले नाही. जून अखेरीस कर्ज पुनर्गठनाच्या वाटपाची मुदत संपली. १५ दिवसाने खरीप कर्ज वाटपाचा कालावधी संपणार आहे. त्यामुळेच सहकार विभागाने कर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. ९ आॅगस्टला ही बैठक घेण्यात आली. १२ बँकांना आमंत्रण पाठविण्यात आले. प्रत्यक्षात मात्र पाच बँकांचेच प्रतिनिधी उपस्थित झाले. एसबीएच आणि बँक आॅफ इंडियाने सर्वात कमी कर्ज वाटप केले. या बँकांचे पदाधिकारी या बैठकीकडे आलेच नाही. कमी कर्ज वाटप करणाऱ्या बँकांनी आता सहकार विभागाच्या बैठकीकडेही पाठ फिरविली आहे. तर उपस्थित असलेल्या बँकांनी कर्ज वाटपाचे सदस्य संपल्याचे स्पष्टीकरण सहकार विभागाला दिले. त्यामुळे आता पुढील १५ दिवसात या बँका कर्ज वाटणार की नाही यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. बँकांच्या या अडवणुकीच्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली आहे. यानंतर धोरणात्मक निर्णय काय होणार यावर पीक कर्जाचे गणित अवलंबून राहणार आहे. राष्ट्रीयकृत बँका पीक कर्ज वाटपात कुणाचेही जुमानत नसल्याचे दिसून येते. शासन निर्णय आणि जिल्हा प्रशासनालाही या बँकांनी गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसून येते. एकंदरित राष्ट्रीयकृत बँकांच्या मनमानीपुढे प्रशासनानेही हात टेकल्याचे दिसून येत आहे. (शहर वार्ताहर) बैठकीला अग्रणी बँक व्यवस्थापकांची दांडी राष्ट्रीयकृत बँकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्रणी बँकेची नियुक्ती केलेली असते. येथील व्यवस्थापकांचा या बँकेवर वॉच असतो. परंतु सहकार विभागाने ९ आॅगस्ट रोजी आयोजित केलेल्या बैठकीला अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनीच दांडी मारली. त्यामुळे इतर राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रतिनिधींचे चांगलेच फावले. जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन यांनी या बैठकीत उपस्थित बँकांच्या प्रतिनिधींना वेळेपूर्वी कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचे आदेश दिले. परंतु ज्या बँका शासन आणि प्रशासनाला जुमानत नाही त्या कर्ज वितरित करतील काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.