शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

७०० कोटी वाटपापूर्वी कर्ज वितरण गुंडाळण्याची तयारी

By admin | Updated: August 12, 2016 02:05 IST

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँकांची उदासीनता अद्यापही कायम असून ७०० कोटी

सहकार बैठकीकडे पाठ : बँका म्हणतात, कर्ज वाटपाचे लाभार्थी संपले! यवतमाळ : खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँकांची उदासीनता अद्यापही कायम असून ७०० कोटी रुपयांच्या वाटपापूर्वीच कर्ज वितरण प्रक्रिया गुंडाळण्याच्या हालचाली आहे. यात राष्ट्रीयकृत बँका आघाडीवर असून सहकार विभागाच्या बैठकीकडेही या बँकांनी पाठ फिरविल्याची माहिती पुढे आली आहे. खरीप हंगामात जिल्ह्याला १७३६ कोटी ७९ लाख रुपयांचे कर्ज वितरित करायचे होते. प्रत्यक्षात बँकांनी १०६४ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. उद्दीष्टाच्या ६१ टक्के कर्ज वितरण केले आहे. यानंतरही तब्बल ७०० कोटी रुपयांचे कर्ज बँकांनी वितरित केले नाही. जून अखेरीस कर्ज पुनर्गठनाच्या वाटपाची मुदत संपली. १५ दिवसाने खरीप कर्ज वाटपाचा कालावधी संपणार आहे. त्यामुळेच सहकार विभागाने कर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. ९ आॅगस्टला ही बैठक घेण्यात आली. १२ बँकांना आमंत्रण पाठविण्यात आले. प्रत्यक्षात मात्र पाच बँकांचेच प्रतिनिधी उपस्थित झाले. एसबीएच आणि बँक आॅफ इंडियाने सर्वात कमी कर्ज वाटप केले. या बँकांचे पदाधिकारी या बैठकीकडे आलेच नाही. कमी कर्ज वाटप करणाऱ्या बँकांनी आता सहकार विभागाच्या बैठकीकडेही पाठ फिरविली आहे. तर उपस्थित असलेल्या बँकांनी कर्ज वाटपाचे सदस्य संपल्याचे स्पष्टीकरण सहकार विभागाला दिले. त्यामुळे आता पुढील १५ दिवसात या बँका कर्ज वाटणार की नाही यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. बँकांच्या या अडवणुकीच्या धोरणाविरोधात शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली आहे. यानंतर धोरणात्मक निर्णय काय होणार यावर पीक कर्जाचे गणित अवलंबून राहणार आहे. राष्ट्रीयकृत बँका पीक कर्ज वाटपात कुणाचेही जुमानत नसल्याचे दिसून येते. शासन निर्णय आणि जिल्हा प्रशासनालाही या बँकांनी गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसून येते. एकंदरित राष्ट्रीयकृत बँकांच्या मनमानीपुढे प्रशासनानेही हात टेकल्याचे दिसून येत आहे. (शहर वार्ताहर) बैठकीला अग्रणी बँक व्यवस्थापकांची दांडी राष्ट्रीयकृत बँकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्रणी बँकेची नियुक्ती केलेली असते. येथील व्यवस्थापकांचा या बँकेवर वॉच असतो. परंतु सहकार विभागाने ९ आॅगस्ट रोजी आयोजित केलेल्या बैठकीला अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनीच दांडी मारली. त्यामुळे इतर राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रतिनिधींचे चांगलेच फावले. जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन यांनी या बैठकीत उपस्थित बँकांच्या प्रतिनिधींना वेळेपूर्वी कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचे आदेश दिले. परंतु ज्या बँका शासन आणि प्रशासनाला जुमानत नाही त्या कर्ज वितरित करतील काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.