शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

विधानसभेची तयारी अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 22:24 IST

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ईव्हीएमची तपासणी सुरू आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाने यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देसंडे अँकर । ईव्हीएमची तपासणी, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहितेची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक विभागाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्याचाच एक भाग म्हणून ईव्हीएमची तपासणी सुरू आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अजय गुल्हाने यांनी ही माहिती दिली.सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जारी होण्याची शक्यताही गुल्हाने यांनी वर्तविली. जिल्ह्यात कुठेही फारशी दुष्काळाची स्थिती नाही. धूळपेरणी केलेल्यांची पेरणी उलटली असली तरी त्याचे क्षेत्र अगदीच कमी आहे. टार्गेटऐवजी पात्र शेतकऱ्यांचा विचार केल्यास गेल्या वर्षीच्या तुलनेत राष्ट्रीयीकृत बँकांचे पीककर्ज वाटप बरेच वाढले आहे.शेतकरी आत्महत्या नियंत्रणात आहे. तरीही सध्या होत असलेल्या आत्महत्यांमागील नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे. पाऊस पाण्यामुळे बाधित झालेल्यांच्या आवश्यकतेनुसार सर्वेक्षणाचे आदेश दिले गेले आहे. काही भागात पिकांवर अळ्या दिसत असल्या तरी त्याचा वेळीच बंदोबस्त करण्याचे निर्देश कृषी विभागाला देण्यात आले आहे. निवडणुकांपूर्वी बहुतांश विकास कामे मार्गी लावण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले.शंभरावर कुमारी मातांच्या पुनर्वसनावर प्रशासनाचा भरजिल्ह्यातील पांढरकवडा विभागात कुमारी माता हा मोठा प्रश्न आहे. जिल्हा प्रशासनाचा फोकस सध्या कुमारी मातांवर आहे. त्यांचे पुनर्वसन, रोजगार यावर भर दिला जात आहे. विविध पद्धतीने छाननी करून सुमारे शंभर कुमारी मातांची यादी तयार करण्यात आली आहे. या जोखडातून बाहेर काढण्यासाठी त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. याशिवाय त्यांना निवासाची व्यवस्था, घरकूल उपलब्ध करून देऊन त्यांचे कायम पुनर्वसन करण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यात शंभर पैकी ३६ ते ४० कुमारी मातांच्या हाताला रोजगार देण्याचे नियोजन आहे. याशिवाय त्यांचे समूपदेशन केले जात आहे. पुन्हा कुणी कुमारी माता बनू नये म्हणून त्या परिसरातील कुटुंबांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. कुमारी मातांच्या प्रश्नावर प्रशासनाचे संपूर्ण लक्ष असल्याचे अजय गुल्हाने यांनी सांगितले.

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनvidhan sabhaविधानसभा