पुरोगामी चळवळीला समाज मुकलामाजी राज्यपाल रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या निधनाचे वृत्त कळताच मोठा धक्का बसला. त्यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. नागपूर येथील दीक्षाभूमी उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. मी आज सायंकाळी नागपूरला पोहोचून दीक्षाभूमी येथे रा.सू. गवई यांचे अंतिम दर्शन घेतले. दादासाहेबांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीसह समाजाची अपरिमीत हानी झाली. प्रचंड संघर्षातून त्यांनी स्वत:चे राजकीय आणि सामाजिक वलय निर्माण करून जनमानसाच्या मनात घर केले होते. - संजय राठोड, पालकमंत्री यवतमाळ जिल्हा.सर्वांना सोबत घेऊन चालणारा नेताशेवटच्या घटकाला न्याय मिळावा ही रा.सू. उपाख्य दादासाहेब गवाई यांची तळमळ असायची. सर्वांना सोबत घेऊन चालणारा नेता ही प्रतिमा त्यांनी शेवटपर्यंत जपली. त्यांचे आणि आमचे घरोब्याचे संबंध होते. सच्चा मनाचा नेता हरविला.- सदाशिवराव ठाकरे, माजी खासदार.दबलेल्यांना वर आणलेमाजी राज्यपाल रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई हे एक पोक्त नेतृत्व होते. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला दादासाहेबांनी पिढ्यानपिढ्या दबलेल्या माणसांना वर आणले. नागपूर येथील दीक्षाभूमीसाठी त्यांनी मोठे काम केले. त्यांनी अनेक लढे उभारले. या लढ्यांनी गोरगरीबांना न्याय मिळाला. प्रामाणिक, धाडसी वृत्तीचे आणि माणूसकीची कदर करणारे व्यक्तीमत्व होते. - अॅड़ शिवाजीराव मोघे, माजी मंत्री.तेजस्वी तारा निखळलापाच दशके राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आंबेडकर, दलित, राजकीय व सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या रा.सू. गवई यांच्या निधनाने चळवळीतील एक तेजस्वी तारा निखळला. एक ज्येष्ठ नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. वसंतराव नाईकांसोबतचे स्नेहसंबंध असलेले रा.सू. गवई यांच्या रुपाने नाईक घराण्याचे पितृछत्र हरविले आहे. - मनोहरराव नाईक, आमदार पुसद. महाराष्ट्र अभ्यासू नेत्याला मुकलामहाराष्ट्राच्या राजकारणात ४० वर्षांपासून आपला ठसा उमटविणारे आणि दलित चळवळीतील अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आज हिरावल्या गेले. त्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले. सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संपूर्ण राजकीय जीवनाची वाटचाल केली. - राजेंद्र नजरधने, आमदार उमरखेड़न्याय व हक्कासाठी लढणारा नेतानागपूर येथील दीक्षाभूमीचा संपूर्ण जगात प्रचार व प्रसार करणारे आणि विपरित परिस्थितीतही समाजाला दिशा देणारे दादासाहे गवई यांच्या निधनाने मोठी हानी झाली. न्याय व हक्कासाठी लढणारे असे व्यक्तिमत्व सर्वांना सोडून गेले. त्यामुळे संपूर्ण दलित समाज पोरका झाला आहे. - विजय खडसे, माजी आमदार, उमरखेड़ चळवळीतील व्यक्तिमत्त्व दलित युवकांना राजकीय, सामाजिक व शैक्षणिक चळवळीमध्ये सतत सहकार्य करणारे व बौद्ध समाजाचे अतिशय हुशार नेते म्हणून त्यांनी आपली वेगळी छाप पाडली होती. बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसारासाठी सतत मदत करणारा नेता गेल्याने समाजाचे झालेले नुकसान भरून निघणार नाही. - भदंत खेमधम्मो महाथेरो, प्राचार्य, मुळावा.समस्या सोडविण्यासाठी तत्परदलित समाजातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला गेल्या अनेक वर्षात राजकारण आणि सामाजिक चळवळीत दादासाहेबांनी मोठे केले. ते सतत समाजातील समस्या सोडविण्यासाठी तत्पर रहात होते. एका अभ्यासू नेत्याला देश मुकला आहे. - बापूराव धुळे, उमरखेडदीनदलितांचा कैवारी दलित चळवळीच्या मुकुटातील हिरा आज गळून पडला. त्यांच्यासोबत दलित चळवळीचे काम करीत असताना राजकारणातून समाजकारण कसे केले पाहिजे हे शिकण्यासारखे होते. दलित कार्यकर्त्यांची आपुलकीने चौकशी करणारे चळवळीतील नेता हवाहवासा वाटणारा होता. - बंडोपंत राऊत, जिल्हा उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (गवई गट).दलित समाज पोरका झालाअतिशय हुशार व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले दादासाहेब गवई यांच्या निधनाने समाजावर फार मोठा आघात झाला आहे. त्यांच्या जाण्याने सर्व समाजामध्ये शोककळा पसरली आहे. - महेश खडसे, अध्यक्ष लोकहीत शिक्षण संस्था.चळवळीतील झंझावात थांबलारिपब्लिकन पक्ष गवई गटाचे संस्थापक, केरळ व बिहारचे माजी राज्यपाल पद विभूषित केलेले रा.सू. गवई यांच्या निधनाने दलित चळवळीचा झंझावात थांबला आहे. - विजय पाटील चोंढीकर, माजी आमदार.ममतेची वागणूक देणारा दादा दादासाहेबांच्या निधनाने माझ्या कुटुंबावर आघात झाला आहे. त्यांच्या लाखो अनुयांपैकी मला त्यांनी मुलासारखे वागविले. बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी समाज जागृती केली. एक विद्वान पंडित, लोकनेता कार्यकर्त्यांना समतेची, ममतेची वागणूक देणारा दादा हरविल्याने दलित समाज पोरका झाला आहे. - बाळासाहेब सोनवने, ज्येष्ठ रिपाइं नेते, नेर.आधारवड गेलादादासाहेब गवई हे चळवळीचा आधारवड होते. सत्याग्रहातूनच दादासाहेब गवई यांचा एक महान नेतृत्त्व म्हणून उदय झाला. मात्र, अगदी शेवटच्या पातळीवरी कार्यकर्त्यांचे प्रश्नही ते जाणून होते. त्यांनी सातत्याने दलितांसाठी लढा दिला. त्यांच्या जाण्याने बौद्ध समाजाची मोठी हानी झाली आहे.- राजेंद्र हेंडवे, जिल्हाध्यक्ष, आरपीआय लढवैया, बुद्धीमान नेता हरविलाबाबासाहेबांनंतर रिपब्लिकन चळवळीची फळी उभी करण्यात गवई साहेबांचे मोठे योगदान आहे. विशेषत: राजकीय चळवळीतील त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. रिपब्लिकन ऐक्य दुभंगले, त्याही वेळेस त्यांनी एकोप्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी अनेक पदे भूषविली. मात्र, आंबेडकरी चळवळीतील लढवैय्या, बुद्धीमान नेता म्हणून त्यांची खास ओळख आहे. नामांतर, आरक्षण अशा प्रत्येक मुद्यावर ते भिडायचे. त्यांची वक्तृत्त्वशैली उत्तम होती. त्यांचा व्यासंगही मोठा होता.- आनंद गायकवाड, अध्यक्ष, नाग संघटनाचळवळ पोरकी झालीगवई साहेब बाबासाहेबांसोबत काम करण्याचा अनुभव असलेले महाराष्ट्रातील शेवटचे नेते होते. त्यामुळेच त्यांच्या निधनाने समाजाचा फार मोठा आधार हरविला आहे. हानी झाली आहे. आज राजकीय पटलावर जे आंबडकरी चळवळीतील नेते आहेत, त्यातील दादासाहेब हे वडीलधारे नेते होते. त्यांचे राजकीय, समाजिक योगदान अत्यंत मोठे आहे. चळवळ पोरकी झाली आहे. - अॅड. जयसिंह चव्हाण, यवतमाळउपेक्षितांना न्याय देणारे व्यक्तिमत्त्वदलित चळवळीतील एक कणखर नेता, उपेक्षितांना न्याय देणारे व्यक्तिमत्व रा.सू. गवई यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली. ही पोकळी कधीच भरून निघणार नाही. मी रिपाइं (आठवले) गटाच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करतो. - मोहन भोयर, जिल्हाध्यक्ष रिपाइं (आठवले गट).धुरंधर, धोरणी नेता हरविलाजागतिक बौद्ध सभेचे उपाध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते रा.सू. गवई यांच्या निधनाने एक धुरंधर, धोरणी नेता हरविला. तळागाळातील जनतेची मोठी हानी झाली. - विश्वनाथ गुजर, कोव्हळा.दादा कर्तृत्वाची छाप सोडून गेलेरा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या निधनाने उपेक्षित आणि वंचित समाजाचा आधारवड पडद्याआड गेला आहे. उत्कृष्ट संसदपटू, धोरणी राजकारणी आणि दीक्षाभूमिच्या रुपाने हजारो वर्ष आपल्या कर्तृत्वाची छाप सोडून दादा गेले. - बापूराव रंगारी, दलितमित्र पुरस्कार प्राप्त, नेर. असा नेता पुन्हा होणे नाहीमाजी राज्यपाल रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांनी रिपब्लिकन पक्षाची धुरा सांभाळली. त्यांनी आपल्या कणखर नेतृत्वातून समाजाची सेवा केली. असा नेता पुन्हा होणार नाही. - जयकृष्ण बोरकर, विदर्भ सचिव रिपाइं (आ.)महागावशी ऋणानूबंधरा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे महागावशी ऋणानूबंध आहेत. त्यांचा ७३ वा वाढदिवस महागाव येथे २००० मध्ये साजरा करण्यात आला. एक अभ्यासू नेता हरविला. - गोविंद भवरे, दलित मित्र, महागाव. सर्वांना घेऊन चालणारा नेतामाजी राज्यपाल रा.सू. गवई सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व होते. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे नेतृत्व आपल्यातून हरविले आहे. त्यांच्या जाण्याने अपरिमीत हानी झाली आहे. - पंजाबराव देशमुख खडकेकर, खडका.दीक्षाभूमीचे स्वप्न पूर्णत्वास नेलेरा़सू़ गवई यांच्या निधनाने समाजाची न भरुन निघणारी हानी झाली आहे़ नागपूर येथील दीक्षाभूमी पूर्णत्वास नेण्याचे स्वप्न त्यांनी पुर्ण केले़ त्यांच्या प्रयत्नामुळेच दीक्षाभूमी उभी राहिली ़- प्रा़वासुदेव शेंदरे, पांढरकवडासामाजिक बांधिलकी जपणारेडॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम रा़सू़ गवई यांनी केले़ राजकारणात, सत्तेत राहुनही त्यांनी सामाजीक बांधिलकी कधी सोडली नाही़ सत्तेची नशा कधी त्यांना चढली नाही़- प्रा़ हरिश्चंद्र भेले, पांढरकवडासमाजाची अपरिमीत हानीरा़सू़ गवई यांनी समाजासाठी केलेले कार्य हे उल्लेखनीय आहे़ त्यांच्या निधनाने समाजाची अपरिमित हानी झाली आहे़- जयकुमार ताकसांडे, पांढरकवडासामाजिक क्षेत्रात दबदबासामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही रा़सू़ गवई यांचा दबदबा होता़ त्यांनी समाजासाठी अनेक चांगली कामे केली़ त्यांच्या जाण्याने समाजाचे खुप मोठे नुकसान झाले आहे़- प्रा़ राहुल दखने, पांढरकवडा वटवृक्ष कोसळलाज्येष्ठ नेते रा.सू. गवई यांच्या निधनाने दलित चळवळीची मोठी हानी झाली. त्यांच्या निधनाने दलित चळवळीचा वटवृक्ष कोसळला. त्यांच्या कर्तृत्वाचा वसा कार्यकर्त्यांनी पुढे न्यावा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, रा.सू. गवई यांना अभिप्रेत असलेला रिपब्लिकन पक्ष कार्यकर्त्यांनी उभा करावा, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.- प्रा. पुरूषोत्तम पाटील, जिल्हाध्यक्ष, पिरीपाजनता त्यांना कधी विसरणार नाहीरा.सू. गवई यांच्या निधनाने दलित जनतेची मोठी हानी झाली. ते कोण्या जाती, धर्माला मानणारे नव्हते. नागपूर येथील दीक्षाभूमिला त्यांच्यामुळेच आंतरराष्ट्रीयस्तराचा दर्जा मिळाला. दलित जनता त्यांना कधीही विसरणार नाही.- मंगल तेलंग, वणी तालुकाध्यक्ष रिपाई (आ.)दलित चळवळीची हानीसध्या काळात रा.सू. गवई यांच्याएवढा पुढारी दलित वर्गात नाही. त्यांच्या निधनाने संपूर्ण दलित वर्ग दु:खी झाला आहे. मला तर रडूच कोसळले. उद्या रविवारी अमरावती येथे जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहे. त्यांच्या निधनाने दलित चळवळीची हानी झाली आहे.- खुशाल भगत, जिल्हा उपाध्यक्ष, रिपाइं (ग.).देशाने मोठा नेता गमावलादादासाहेबांच्या जाण्याने दलित जनतेची मोठी हानी झाली आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाने एक मोठा नेता गमावला आहे. दादासाहेब अत्यंत मृदूभाषी होते. त्यांनी कधीही तोडफोडीची भाषा न वापरता शांततेने प्रश्न सोडविण्यासाठीच परिश्रम घेतले. - कृष्णा परिपगार, नेते, पीपल्स रिपब्लिकन पार्टीजातीधर्माच्या पलीकडे जाणारे नेतृत्वबाबासाहेबाबांच्या काळापासून ते रिपब्लिकन चळवळीत कार्यरत होते. यवतमाळात पाटीपुरा परिसरात त्यांचे वास्तव्य असायचे. १९६१ च्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे ते येथून अग्रेसर होते. तीनवेळा विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी आपली वेगळी छाप उमटविली. दलितांव्यतिरिक्त इतर समाजही त्यांच्यासोबत जुळलेला होता. त्यांचे राजकारण जाती-धर्माच्या पलिकडे जाणारे होते.- नवनीत महाजन, जिल्हा प्रवक्ता, आरपीआय (ए) मागासवर्गीयांचा तारणहारमागासवर्गीयांसाठी सदैव लढा देणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या निधनाने फार मोठी हानी झाली असून, अतिशय मनमिळाऊ नेता गेल्याचे दु:ख आहे. - मिलिंद रामटेके, सामाजिक कार्यकर्ता.
पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला
By admin | Updated: July 26, 2015 02:21 IST