शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

अकाली पावसाचा पिकांना फटका

By admin | Updated: January 4, 2015 23:21 IST

ऐन हिवाळ्यात अचानक वातावरणातील बदल आणि जिल्ह्यात झालेला पाऊस यामुळे रबी हंगामाला चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संकटांची मालिका संपली नसल्याचेच यातून दिसून आले.

यवतमाळ : ऐन हिवाळ्यात अचानक वातावरणातील बदल आणि जिल्ह्यात झालेला पाऊस यामुळे रबी हंगामाला चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संकटांची मालिका संपली नसल्याचेच यातून दिसून आले. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक असमतोलामुळे मोठे संकट आले आहे. गारपीट, अतिवृष्टी आणि त्यानंतर मागील वर्षी खरिपात पावसाने दडी मारल्यामुळे दुबार व तिबार पेरणीचे संकट यातूनही शेतकऱ्यांनी सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यातच सोयाबीन व कापसावर विविध कीडींचा प्रादुर्भाव या सर्व संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच आले नाही. होते नव्हते सर्व काही गेल्यानंतर शेतकऱ्यांनी उसणवारी करून पुन्हा एकदा नव्या जोमाने रबी हंगामाची तयारी केली. त्यामध्ये गहू, हरभरा, आंबा, मिरची, भूईमूग आदींची लागवण करण्यात आली. यातून काही तर वाचेल आणि वर्ष कसेतरी निघेल ही अपेक्षा असताना अचानक गेल्या दोन दिवसांपूर्वी हिवाळ्यातच पावसाने हजेरी लावली. प्रचंड धुके आणि थंडावा यामुळे रबीच्या पिकांवर चांगलाच परिणाम झाला. आंब्याचा मोहर गळाला आहे. मिरचीवर रसशोषक कीडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मिरचीचेही उत्पादन चांगलेच घटले आहे. अनेक शेतकऱ्यांनी तुरीचे डबलबार पीक घेण्याचा प्रयत्न केला. परंतु या वातावरणामुळे तो यशस्वी झाला नाही तर काहींनी तूर कापून ठेवली होती. त्यांना या पावसाचा फटका बसला. यावर्षी कापूस तोडायला मजूरही मिळेनासा झाला. अनेकांचा उरलासुरला व वाचलेला कापूस शेतात होता. हा कापूस ओला झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या अपेक्षाही गुंडाळल्या गेल्या. अचानक वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांच्या संकटाची समस्या सुरूच आहे. खरिपाच्या हंगामातील कोणतीही मदत अद्याप अनेकांपर्यंत पोहोचलीच नसताना हे नवे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. यावर्षी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट होती. या दरम्यान सत्तांतर होवून विदर्भाला मुख्यमंत्रीपद मिळाले. त्यानंतर झालेल्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनात सर्वांचे डोळे नागपूरकडे लागले होते. शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण काही निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा होती. परंतु हिवाळी अधिवेशनात कोणतेही शेतकरी हिताचे निर्णय न घेतले गेल्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. विशेषत: विदर्भात सर्वाधिक उत्पादित होणाऱ्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही कायमस्वरूपी लाभाचे निर्णय होण्याची शक्यता होती. परंतु शासनाने यामध्ये शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे. त्यानंतर आता रबी हंगामावर आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशाअपेक्षा धूळीस मिळाल्या आहेत. (शहर वार्ताहर)