शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अकाली पावसाचा पिकांना फटका

By admin | Updated: January 4, 2015 23:21 IST

ऐन हिवाळ्यात अचानक वातावरणातील बदल आणि जिल्ह्यात झालेला पाऊस यामुळे रबी हंगामाला चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संकटांची मालिका संपली नसल्याचेच यातून दिसून आले.

यवतमाळ : ऐन हिवाळ्यात अचानक वातावरणातील बदल आणि जिल्ह्यात झालेला पाऊस यामुळे रबी हंगामाला चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संकटांची मालिका संपली नसल्याचेच यातून दिसून आले. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक असमतोलामुळे मोठे संकट आले आहे. गारपीट, अतिवृष्टी आणि त्यानंतर मागील वर्षी खरिपात पावसाने दडी मारल्यामुळे दुबार व तिबार पेरणीचे संकट यातूनही शेतकऱ्यांनी सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यातच सोयाबीन व कापसावर विविध कीडींचा प्रादुर्भाव या सर्व संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच आले नाही. होते नव्हते सर्व काही गेल्यानंतर शेतकऱ्यांनी उसणवारी करून पुन्हा एकदा नव्या जोमाने रबी हंगामाची तयारी केली. त्यामध्ये गहू, हरभरा, आंबा, मिरची, भूईमूग आदींची लागवण करण्यात आली. यातून काही तर वाचेल आणि वर्ष कसेतरी निघेल ही अपेक्षा असताना अचानक गेल्या दोन दिवसांपूर्वी हिवाळ्यातच पावसाने हजेरी लावली. प्रचंड धुके आणि थंडावा यामुळे रबीच्या पिकांवर चांगलाच परिणाम झाला. आंब्याचा मोहर गळाला आहे. मिरचीवर रसशोषक कीडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मिरचीचेही उत्पादन चांगलेच घटले आहे. अनेक शेतकऱ्यांनी तुरीचे डबलबार पीक घेण्याचा प्रयत्न केला. परंतु या वातावरणामुळे तो यशस्वी झाला नाही तर काहींनी तूर कापून ठेवली होती. त्यांना या पावसाचा फटका बसला. यावर्षी कापूस तोडायला मजूरही मिळेनासा झाला. अनेकांचा उरलासुरला व वाचलेला कापूस शेतात होता. हा कापूस ओला झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या अपेक्षाही गुंडाळल्या गेल्या. अचानक वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांच्या संकटाची समस्या सुरूच आहे. खरिपाच्या हंगामातील कोणतीही मदत अद्याप अनेकांपर्यंत पोहोचलीच नसताना हे नवे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. यावर्षी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट होती. या दरम्यान सत्तांतर होवून विदर्भाला मुख्यमंत्रीपद मिळाले. त्यानंतर झालेल्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनात सर्वांचे डोळे नागपूरकडे लागले होते. शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण काही निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा होती. परंतु हिवाळी अधिवेशनात कोणतेही शेतकरी हिताचे निर्णय न घेतले गेल्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. विशेषत: विदर्भात सर्वाधिक उत्पादित होणाऱ्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही कायमस्वरूपी लाभाचे निर्णय होण्याची शक्यता होती. परंतु शासनाने यामध्ये शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे. त्यानंतर आता रबी हंगामावर आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशाअपेक्षा धूळीस मिळाल्या आहेत. (शहर वार्ताहर)