शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
3
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
4
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
5
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
6
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
7
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
8
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
9
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
10
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
11
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
12
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
13
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
14
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
15
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
16
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
17
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
18
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
19
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
20
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु

अकाली पावसाचा पिकांना फटका

By admin | Updated: January 4, 2015 23:21 IST

ऐन हिवाळ्यात अचानक वातावरणातील बदल आणि जिल्ह्यात झालेला पाऊस यामुळे रबी हंगामाला चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संकटांची मालिका संपली नसल्याचेच यातून दिसून आले.

यवतमाळ : ऐन हिवाळ्यात अचानक वातावरणातील बदल आणि जिल्ह्यात झालेला पाऊस यामुळे रबी हंगामाला चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संकटांची मालिका संपली नसल्याचेच यातून दिसून आले. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक असमतोलामुळे मोठे संकट आले आहे. गारपीट, अतिवृष्टी आणि त्यानंतर मागील वर्षी खरिपात पावसाने दडी मारल्यामुळे दुबार व तिबार पेरणीचे संकट यातूनही शेतकऱ्यांनी सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यातच सोयाबीन व कापसावर विविध कीडींचा प्रादुर्भाव या सर्व संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच आले नाही. होते नव्हते सर्व काही गेल्यानंतर शेतकऱ्यांनी उसणवारी करून पुन्हा एकदा नव्या जोमाने रबी हंगामाची तयारी केली. त्यामध्ये गहू, हरभरा, आंबा, मिरची, भूईमूग आदींची लागवण करण्यात आली. यातून काही तर वाचेल आणि वर्ष कसेतरी निघेल ही अपेक्षा असताना अचानक गेल्या दोन दिवसांपूर्वी हिवाळ्यातच पावसाने हजेरी लावली. प्रचंड धुके आणि थंडावा यामुळे रबीच्या पिकांवर चांगलाच परिणाम झाला. आंब्याचा मोहर गळाला आहे. मिरचीवर रसशोषक कीडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मिरचीचेही उत्पादन चांगलेच घटले आहे. अनेक शेतकऱ्यांनी तुरीचे डबलबार पीक घेण्याचा प्रयत्न केला. परंतु या वातावरणामुळे तो यशस्वी झाला नाही तर काहींनी तूर कापून ठेवली होती. त्यांना या पावसाचा फटका बसला. यावर्षी कापूस तोडायला मजूरही मिळेनासा झाला. अनेकांचा उरलासुरला व वाचलेला कापूस शेतात होता. हा कापूस ओला झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या अपेक्षाही गुंडाळल्या गेल्या. अचानक वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांच्या संकटाची समस्या सुरूच आहे. खरिपाच्या हंगामातील कोणतीही मदत अद्याप अनेकांपर्यंत पोहोचलीच नसताना हे नवे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. यावर्षी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय वाईट होती. या दरम्यान सत्तांतर होवून विदर्भाला मुख्यमंत्रीपद मिळाले. त्यानंतर झालेल्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनात सर्वांचे डोळे नागपूरकडे लागले होते. शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण काही निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा होती. परंतु हिवाळी अधिवेशनात कोणतेही शेतकरी हिताचे निर्णय न घेतले गेल्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. विशेषत: विदर्भात सर्वाधिक उत्पादित होणाऱ्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी काही कायमस्वरूपी लाभाचे निर्णय होण्याची शक्यता होती. परंतु शासनाने यामध्ये शेतकऱ्यांचा भ्रमनिरास केला आहे. त्यानंतर आता रबी हंगामावर आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशाअपेक्षा धूळीस मिळाल्या आहेत. (शहर वार्ताहर)