शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त कुटुंबाला शासन योजनात प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2015 00:31 IST

परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि पालकमंत्री संजय राठोड यांनी सोमवारी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांची भेट घेतली.

भेट घेऊन सांत्वन : परिवहन मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचनायवतमाळ : परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि पालकमंत्री संजय राठोड यांनी सोमवारी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांची भेट घेतली. या कुटुंबाचे सांत्वन करण्यासोबतच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्राधान्याने शासकीय योजनांचा लाभ देण्याची सूचना यावेळी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार अनुप खांडे, प्रवीण पांडे आदी उपस्थित होते.पिंपरी (बुटी) येथील शांता प्रल्हाद ताजणे या महिलेने आत्महत्या केली होती. त्यांची मुले अमोल, मोहन, साधना यांच्याशी ना.रावते आणि ना.राठोड यांनी चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. घाटाना (लोणी) येथील बाबुलाल राठोड यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांचा मुलगा मनोज राठोड यांच्याशी संवाद साधला. घाटंजी तालुक्यातील घाटी येथील शेतकरी संतोष पांडे यांच्या कुटुंबाची परिस्थिती जाणून घेतली. केळापूर तालुक्याच्या घोडधरा येथे माधव गुलाबराव गोडे या शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेवून सांत्वन केले. या शेतकऱ्याचे खरडीचे पैसे उशिरा प्राप्त झाल्याने संबंधितांची चौकशी करून कार्यवाही करण्याची सूचना ना.रावते यांनी यावेळी केली. डोंगरखर्डा येथील राजू रामनाथ मुंगले या शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेण्यात आली. यावेळी सदर गावातील नागरिकांनी मॉक्रोफायनांस तसेच दारिद्र्यरेषेचे कार्ड आणि राशनकार्डबाबत तक्रारी केल्या. दारिद्र्य रेषेचे कार्ड आणि रेशनकार्डच्या याद्या तपासून अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे ना. रावते यांनी सुचविले.घाटाना येथे काही शेतकऱ्यांना सिलिंगच्या जमिनीचे वाटप केले असतानासुध्दा अशा जमिनीच्या खरेदीचे व्यवहार झाल्याने याप्रकरणी चौकशीचे आदेशही ना.रावते यांनी यावेळी प्रशासनास दिले. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांशी चर्चा करताना त्यांचे दु:ख, अडीअडचणी दोन्ही मंत्र्यांनी समजून घेतल्या. या कुटुंबांना शासकीय योजनेचा लाभ देण्यासोबतच त्यांच्या अडचणी सोडविण्याची सूचना यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शासन त्यांच्या पाठीशी आहे. असा विश्वास यावेळी देण्यात आला. (वार्ताहर)