शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

आत्महत्याग्रस्त कुटुंबाला शासन योजनात प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2015 00:31 IST

परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि पालकमंत्री संजय राठोड यांनी सोमवारी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांची भेट घेतली.

भेट घेऊन सांत्वन : परिवहन मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचनायवतमाळ : परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि पालकमंत्री संजय राठोड यांनी सोमवारी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांची भेट घेतली. या कुटुंबाचे सांत्वन करण्यासोबतच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्राधान्याने शासकीय योजनांचा लाभ देण्याची सूचना यावेळी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार अनुप खांडे, प्रवीण पांडे आदी उपस्थित होते.पिंपरी (बुटी) येथील शांता प्रल्हाद ताजणे या महिलेने आत्महत्या केली होती. त्यांची मुले अमोल, मोहन, साधना यांच्याशी ना.रावते आणि ना.राठोड यांनी चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. घाटाना (लोणी) येथील बाबुलाल राठोड यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांचा मुलगा मनोज राठोड यांच्याशी संवाद साधला. घाटंजी तालुक्यातील घाटी येथील शेतकरी संतोष पांडे यांच्या कुटुंबाची परिस्थिती जाणून घेतली. केळापूर तालुक्याच्या घोडधरा येथे माधव गुलाबराव गोडे या शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेवून सांत्वन केले. या शेतकऱ्याचे खरडीचे पैसे उशिरा प्राप्त झाल्याने संबंधितांची चौकशी करून कार्यवाही करण्याची सूचना ना.रावते यांनी यावेळी केली. डोंगरखर्डा येथील राजू रामनाथ मुंगले या शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेण्यात आली. यावेळी सदर गावातील नागरिकांनी मॉक्रोफायनांस तसेच दारिद्र्यरेषेचे कार्ड आणि राशनकार्डबाबत तक्रारी केल्या. दारिद्र्य रेषेचे कार्ड आणि रेशनकार्डच्या याद्या तपासून अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे ना. रावते यांनी सुचविले.घाटाना येथे काही शेतकऱ्यांना सिलिंगच्या जमिनीचे वाटप केले असतानासुध्दा अशा जमिनीच्या खरेदीचे व्यवहार झाल्याने याप्रकरणी चौकशीचे आदेशही ना.रावते यांनी यावेळी प्रशासनास दिले. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांशी चर्चा करताना त्यांचे दु:ख, अडीअडचणी दोन्ही मंत्र्यांनी समजून घेतल्या. या कुटुंबांना शासकीय योजनेचा लाभ देण्यासोबतच त्यांच्या अडचणी सोडविण्याची सूचना यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शासन त्यांच्या पाठीशी आहे. असा विश्वास यावेळी देण्यात आला. (वार्ताहर)