शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
4
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
5
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
6
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
7
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
8
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
9
जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
10
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
11
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
13
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
14
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
15
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
16
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
17
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
18
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
19
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
20
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?

आत्महत्याग्रस्त कुटुंबाला शासन योजनात प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2015 00:31 IST

परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि पालकमंत्री संजय राठोड यांनी सोमवारी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांची भेट घेतली.

भेट घेऊन सांत्वन : परिवहन मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचनायवतमाळ : परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि पालकमंत्री संजय राठोड यांनी सोमवारी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांची भेट घेतली. या कुटुंबाचे सांत्वन करण्यासोबतच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्राधान्याने शासकीय योजनांचा लाभ देण्याची सूचना यावेळी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार अनुप खांडे, प्रवीण पांडे आदी उपस्थित होते.पिंपरी (बुटी) येथील शांता प्रल्हाद ताजणे या महिलेने आत्महत्या केली होती. त्यांची मुले अमोल, मोहन, साधना यांच्याशी ना.रावते आणि ना.राठोड यांनी चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. घाटाना (लोणी) येथील बाबुलाल राठोड यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांचा मुलगा मनोज राठोड यांच्याशी संवाद साधला. घाटंजी तालुक्यातील घाटी येथील शेतकरी संतोष पांडे यांच्या कुटुंबाची परिस्थिती जाणून घेतली. केळापूर तालुक्याच्या घोडधरा येथे माधव गुलाबराव गोडे या शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेवून सांत्वन केले. या शेतकऱ्याचे खरडीचे पैसे उशिरा प्राप्त झाल्याने संबंधितांची चौकशी करून कार्यवाही करण्याची सूचना ना.रावते यांनी यावेळी केली. डोंगरखर्डा येथील राजू रामनाथ मुंगले या शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेण्यात आली. यावेळी सदर गावातील नागरिकांनी मॉक्रोफायनांस तसेच दारिद्र्यरेषेचे कार्ड आणि राशनकार्डबाबत तक्रारी केल्या. दारिद्र्य रेषेचे कार्ड आणि रेशनकार्डच्या याद्या तपासून अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे ना. रावते यांनी सुचविले.घाटाना येथे काही शेतकऱ्यांना सिलिंगच्या जमिनीचे वाटप केले असतानासुध्दा अशा जमिनीच्या खरेदीचे व्यवहार झाल्याने याप्रकरणी चौकशीचे आदेशही ना.रावते यांनी यावेळी प्रशासनास दिले. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांशी चर्चा करताना त्यांचे दु:ख, अडीअडचणी दोन्ही मंत्र्यांनी समजून घेतल्या. या कुटुंबांना शासकीय योजनेचा लाभ देण्यासोबतच त्यांच्या अडचणी सोडविण्याची सूचना यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शासन त्यांच्या पाठीशी आहे. असा विश्वास यावेळी देण्यात आला. (वार्ताहर)