शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

महागड्या बियाण्याने बळीराजा चिंतातूर

By admin | Updated: June 20, 2014 00:06 IST

अतिवृष्टी व गारपिटीमुळे नेस्तनाबूत झालेल्या बळीराजाला बियाण्याच्या वाढत्या महागाईची चिंता सतावू लागली आहे. नापिकने त्रस्त झाल्यामुळे त्यातच बियाण्याचे भाव वाढल्याने पेरणी करायची कशी,

दीपक वगारे - महागाव कसबाअतिवृष्टी व गारपिटीमुळे नेस्तनाबूत झालेल्या बळीराजाला बियाण्याच्या वाढत्या महागाईची चिंता सतावू लागली आहे. नापिकने त्रस्त झाल्यामुळे त्यातच बियाण्याचे भाव वाढल्याने पेरणी करायची कशी, असा प्रश्न त्यांच्या पुढे उभा ठाकला आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी खरीपपूर्व मशागत पूर्ण केली आहे. त्यांना मृगाच्या पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र मृग नक्षत्रामध्ये पाऊस पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांची धडधड वाढली आहे. यंदा खरिपाची पेरणी कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने आपला माल विकावा लागला. यंदा मात्र बियाण्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. त्यामुळे हे महागडे बियाणे कसे विकत घ्यायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.एकीकडे शेतकरी नापिकीचा सामना करत असताना बँक मात्र पीक कर्जाचे पुनर्गठण करायला तयार नाही. जुने थकीत कर्ज न दिल्यामुळे नवीन कर्ज देताना बँका शासकीय नियमांचा आधार घेत आहे. पीक कर्ज मिळण्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा यंदाचा खरीप हंगामही धोक्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी आता खासगी सावकाराकडे कर्जासाठी धाव घेतली आहे. महागाव परिसरात अनेकांनी खासगी सावकारीचा व्यवसाय सुरू केला आहे. कर्जाच्या बदलीत शेतकऱ्यांकडून गहाण खत करून घेण्यात येत आहे. अव्वाच्या सव्वा व्याज दर असलेले हे सावकारी कर्ज शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या न परवडणारे आहे. असे असतानाही बँक मात्र आपल्या आडमुठ्या धोरणावर कायम आहे. एकीकडे शासनाकडून शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध घोषणा केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. पीककर्जाचे पुनर्गठण होत नसल्यामुळे आता कृषी केंद्र संचालकाकडूनच सावकारी पद्धतीने शेतकऱ्यांना बियाणे घ्यावे लागत आहे. पेरणीची वेळ येवून ठेपली असूनही बँका पीककर्ज द्यायला तयार नाही. त्यामुळे बँक प्रशासनाविषयी रोष व्यक्त केला जात आहे.