शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
5
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
6
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
7
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
8
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
9
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
11
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
12
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
13
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
14
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
15
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
16
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
17
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
18
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
19
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
20
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली

महागड्या बियाण्याने बळीराजा चिंतातूर

By admin | Updated: June 20, 2014 00:06 IST

अतिवृष्टी व गारपिटीमुळे नेस्तनाबूत झालेल्या बळीराजाला बियाण्याच्या वाढत्या महागाईची चिंता सतावू लागली आहे. नापिकने त्रस्त झाल्यामुळे त्यातच बियाण्याचे भाव वाढल्याने पेरणी करायची कशी,

दीपक वगारे - महागाव कसबाअतिवृष्टी व गारपिटीमुळे नेस्तनाबूत झालेल्या बळीराजाला बियाण्याच्या वाढत्या महागाईची चिंता सतावू लागली आहे. नापिकने त्रस्त झाल्यामुळे त्यातच बियाण्याचे भाव वाढल्याने पेरणी करायची कशी, असा प्रश्न त्यांच्या पुढे उभा ठाकला आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी खरीपपूर्व मशागत पूर्ण केली आहे. त्यांना मृगाच्या पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र मृग नक्षत्रामध्ये पाऊस पडला नसल्यामुळे शेतकऱ्यांची धडधड वाढली आहे. यंदा खरिपाची पेरणी कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने आपला माल विकावा लागला. यंदा मात्र बियाण्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. त्यामुळे हे महागडे बियाणे कसे विकत घ्यायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.एकीकडे शेतकरी नापिकीचा सामना करत असताना बँक मात्र पीक कर्जाचे पुनर्गठण करायला तयार नाही. जुने थकीत कर्ज न दिल्यामुळे नवीन कर्ज देताना बँका शासकीय नियमांचा आधार घेत आहे. पीक कर्ज मिळण्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा यंदाचा खरीप हंगामही धोक्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी आता खासगी सावकाराकडे कर्जासाठी धाव घेतली आहे. महागाव परिसरात अनेकांनी खासगी सावकारीचा व्यवसाय सुरू केला आहे. कर्जाच्या बदलीत शेतकऱ्यांकडून गहाण खत करून घेण्यात येत आहे. अव्वाच्या सव्वा व्याज दर असलेले हे सावकारी कर्ज शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या न परवडणारे आहे. असे असतानाही बँक मात्र आपल्या आडमुठ्या धोरणावर कायम आहे. एकीकडे शासनाकडून शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध घोषणा केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. पीककर्जाचे पुनर्गठण होत नसल्यामुळे आता कृषी केंद्र संचालकाकडूनच सावकारी पद्धतीने शेतकऱ्यांना बियाणे घ्यावे लागत आहे. पेरणीची वेळ येवून ठेपली असूनही बँका पीककर्ज द्यायला तयार नाही. त्यामुळे बँक प्रशासनाविषयी रोष व्यक्त केला जात आहे.