रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अरबी समुद्रातील कॅर चक्री वादळाने विदर्भात धुंवाधार पाऊस बरसत आहे. गत दोन दिवसात जिल्ह्यात ६६ मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस पिकांना असह्य झाल्याने शेतशिवाराचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुगीच्या तोंडावर झालेले हे नुकसान भरून निघणे अवघड आहे. यामुळे शेतकरी हादरले आहेत.हा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र बरसत आहे. विजांच्या कडकडाटासह बरसणाºया या पावसाने आजपर्यंतचे दिवाळीतील रेकॉर्ड मोडले आहे. यामुळे खरिपाची अपरिमित हानी झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान कोट्यवधी रूपयांच्या घरात आहे. यामध्ये सोयाबीन आणि कापूस पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. पीक काढणीच्या सुमारास झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हादरले आहेत.यवतमाळात १५ मिमी, बाभूळगाव १८, कळंब २१, दारव्हा २०, दिग्रस ११, आर्णी ४१, नेर २१, पुसद १९, उमरखेड २१, महागाव ३१, वणी २, मारेगाव ५, झरी ५, के ळापूर १, घाटंजी ४, तर राळेगावमध्ये ८ मिमी पाऊस कोसळला. आर्णी तालुुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. पाऊस न थांबल्याने सोयाबीनच्या गंज्या धोक्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीनला कोंब फुटत आहेत. तर सोयाबीन वाळविता न आल्याने बुरशी पकडली आहे. कापसाचे बोंड गळून पडत आहे. पऱ्हाटी आडवी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा त्राणच गेला आहे.आर्णी तालुक्यातील काही गावांची कृषी अधीक्षकांनी पाहणी केली. तर काही ठिकाणी तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदारांनी भेटी दिल्या. केळापूर तालुक्यातील रूंझा परिसरातील १० ते १२ गावांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला. शेकडो एकरवरील कपाशीचे नुकसान झाले. यातील रूंझा, रामपूर, जोगीनकवडा, दाभा, पाथरी, सायखेडा या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य निमिष मानकर, तहसीलदार सुरेश कवळे, उपविभागीय अधिकारी जगन राठोड, कृषी अधिकारी डी. बी. गडमवार, कृषी पर्यवेक्षक आर. आर. आत्राम, कृषी सहायक दातारकर, शुभम मेश्राम, माजी पंचायत समिती सदस्य गणेश आडे यांनी भेटी दिल्या आणि नुकसानीची पाहणी केली.सुटीने खोळंबले सर्वेक्षणजिल्ह्यात अवकाळी पावसाने होणाऱ्या नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहे. दिवाळीच्या सुट्यांमुळे कर्मचारी शिवारात पोहोचण्यास विलंब लागत आहे. यामुळे नुकसानीचे सर्वेक्षण खोळंबले आहे. त्यामुळे नुकसान आणखी वाढणार आहे.
अतिपाण्याने हरभरा जळण्याचा धोकाजिल्ह्यात सतत कोसळणाºया पावसाने रब्बी हरभरा पिकाला मोठा फटका बसण्याचा धोका वाढला आहे. अतिपावसाने पेरलेला हरभरा जळण्याचा धोका वाढला आहे.विमा कंपनीचा फोन लागेनापीकविमा उतरविणाºया शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर या शेतकºयांना २४ तासात मदत देण्याचे आश्वासन विमा कंपनीने दिले होते. सध्या पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कंपनीचे प्रतिनिधीच गवसले नाही. त्यांचा दूरध्वनी क्रमांक कायमच बंद येत होता. यामुळे शेतकºयांनी विमा कंपनीवर रोष व्यक्त केला.भाजीपाला पिकांचे मोठे नुकसानसतत कोसळणाऱ्या पावसाने भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये पालक, मेथी, कोथिंबीर, भेंडी, वांगे, कारले, वाल, दोडके या पिकांना मोठा फटका बसला आहे. भाजीपाला उत्पादन घटण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.