शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

शेती पिकाला अवकाळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST

पाऊस जिल्ह्यात सर्वत्र बरसत आहे. विजांच्या कडकडाटासह बरसणाºया या पावसाने आजपर्यंतचे दिवाळीतील रेकॉर्ड मोडले आहे. यामुळे खरिपाची अपरिमित हानी झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान कोट्यवधी रूपयांच्या घरात आहे. यामध्ये सोयाबीन आणि कापूस पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. पीक काढणीच्या सुमारास झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हादरले आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान : पिकांची धुळधाण, शेतात पाणीच पाणी, सोयाबीनला बुरशी, पºहाटी आडवी

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अरबी समुद्रातील कॅर चक्री वादळाने विदर्भात धुंवाधार पाऊस बरसत आहे. गत दोन दिवसात जिल्ह्यात ६६ मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस पिकांना असह्य झाल्याने शेतशिवाराचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुगीच्या तोंडावर झालेले हे नुकसान भरून निघणे अवघड आहे. यामुळे शेतकरी हादरले आहेत.हा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र बरसत आहे. विजांच्या कडकडाटासह बरसणाºया या पावसाने आजपर्यंतचे दिवाळीतील रेकॉर्ड मोडले आहे. यामुळे खरिपाची अपरिमित हानी झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान कोट्यवधी रूपयांच्या घरात आहे. यामध्ये सोयाबीन आणि कापूस पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. पीक काढणीच्या सुमारास झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हादरले आहेत.यवतमाळात १५ मिमी, बाभूळगाव १८, कळंब २१, दारव्हा २०, दिग्रस ११, आर्णी ४१, नेर २१, पुसद १९, उमरखेड २१, महागाव ३१, वणी २, मारेगाव ५, झरी ५, के ळापूर १, घाटंजी ४, तर राळेगावमध्ये ८ मिमी पाऊस कोसळला. आर्णी तालुुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. पाऊस न थांबल्याने सोयाबीनच्या गंज्या धोक्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीनला कोंब फुटत आहेत. तर सोयाबीन वाळविता न आल्याने बुरशी पकडली आहे. कापसाचे बोंड गळून पडत आहे. पऱ्हाटी आडवी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा त्राणच गेला आहे.आर्णी तालुक्यातील काही गावांची कृषी अधीक्षकांनी पाहणी केली. तर काही ठिकाणी तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदारांनी भेटी दिल्या. केळापूर तालुक्यातील रूंझा परिसरातील १० ते १२ गावांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला. शेकडो एकरवरील कपाशीचे नुकसान झाले. यातील रूंझा, रामपूर, जोगीनकवडा, दाभा, पाथरी, सायखेडा या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य निमिष मानकर, तहसीलदार सुरेश कवळे, उपविभागीय अधिकारी जगन राठोड, कृषी अधिकारी डी. बी. गडमवार, कृषी पर्यवेक्षक आर. आर. आत्राम, कृषी सहायक दातारकर, शुभम मेश्राम, माजी पंचायत समिती सदस्य गणेश आडे यांनी भेटी दिल्या आणि नुकसानीची पाहणी केली.सुटीने खोळंबले सर्वेक्षणजिल्ह्यात अवकाळी पावसाने होणाऱ्या नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहे. दिवाळीच्या सुट्यांमुळे कर्मचारी शिवारात पोहोचण्यास विलंब लागत आहे. यामुळे नुकसानीचे सर्वेक्षण खोळंबले आहे. त्यामुळे नुकसान आणखी वाढणार आहे.

अतिपाण्याने हरभरा जळण्याचा धोकाजिल्ह्यात सतत कोसळणाºया पावसाने रब्बी हरभरा पिकाला मोठा फटका बसण्याचा धोका वाढला आहे. अतिपावसाने पेरलेला हरभरा जळण्याचा धोका वाढला आहे.विमा कंपनीचा फोन लागेनापीकविमा उतरविणाºया शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर या शेतकºयांना २४ तासात मदत देण्याचे आश्वासन विमा कंपनीने दिले होते. सध्या पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कंपनीचे प्रतिनिधीच गवसले नाही. त्यांचा दूरध्वनी क्रमांक कायमच बंद येत होता. यामुळे शेतकºयांनी विमा कंपनीवर रोष व्यक्त केला.भाजीपाला पिकांचे मोठे नुकसानसतत कोसळणाऱ्या पावसाने भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये पालक, मेथी, कोथिंबीर, भेंडी, वांगे, कारले, वाल, दोडके या पिकांना मोठा फटका बसला आहे. भाजीपाला उत्पादन घटण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :agricultureशेती