शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

शेती पिकाला अवकाळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST

पाऊस जिल्ह्यात सर्वत्र बरसत आहे. विजांच्या कडकडाटासह बरसणाºया या पावसाने आजपर्यंतचे दिवाळीतील रेकॉर्ड मोडले आहे. यामुळे खरिपाची अपरिमित हानी झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान कोट्यवधी रूपयांच्या घरात आहे. यामध्ये सोयाबीन आणि कापूस पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. पीक काढणीच्या सुमारास झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हादरले आहेत.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान : पिकांची धुळधाण, शेतात पाणीच पाणी, सोयाबीनला बुरशी, पºहाटी आडवी

रूपेश उत्तरवारलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अरबी समुद्रातील कॅर चक्री वादळाने विदर्भात धुंवाधार पाऊस बरसत आहे. गत दोन दिवसात जिल्ह्यात ६६ मिमी पावसाची नोंद झाली. हा पाऊस पिकांना असह्य झाल्याने शेतशिवाराचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुगीच्या तोंडावर झालेले हे नुकसान भरून निघणे अवघड आहे. यामुळे शेतकरी हादरले आहेत.हा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र बरसत आहे. विजांच्या कडकडाटासह बरसणाºया या पावसाने आजपर्यंतचे दिवाळीतील रेकॉर्ड मोडले आहे. यामुळे खरिपाची अपरिमित हानी झाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान कोट्यवधी रूपयांच्या घरात आहे. यामध्ये सोयाबीन आणि कापूस पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. पीक काढणीच्या सुमारास झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हादरले आहेत.यवतमाळात १५ मिमी, बाभूळगाव १८, कळंब २१, दारव्हा २०, दिग्रस ११, आर्णी ४१, नेर २१, पुसद १९, उमरखेड २१, महागाव ३१, वणी २, मारेगाव ५, झरी ५, के ळापूर १, घाटंजी ४, तर राळेगावमध्ये ८ मिमी पाऊस कोसळला. आर्णी तालुुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. पाऊस न थांबल्याने सोयाबीनच्या गंज्या धोक्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी सोयाबीनला कोंब फुटत आहेत. तर सोयाबीन वाळविता न आल्याने बुरशी पकडली आहे. कापसाचे बोंड गळून पडत आहे. पऱ्हाटी आडवी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा त्राणच गेला आहे.आर्णी तालुक्यातील काही गावांची कृषी अधीक्षकांनी पाहणी केली. तर काही ठिकाणी तालुका कृषी अधिकारी आणि तहसीलदारांनी भेटी दिल्या. केळापूर तालुक्यातील रूंझा परिसरातील १० ते १२ गावांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला. शेकडो एकरवरील कपाशीचे नुकसान झाले. यातील रूंझा, रामपूर, जोगीनकवडा, दाभा, पाथरी, सायखेडा या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य निमिष मानकर, तहसीलदार सुरेश कवळे, उपविभागीय अधिकारी जगन राठोड, कृषी अधिकारी डी. बी. गडमवार, कृषी पर्यवेक्षक आर. आर. आत्राम, कृषी सहायक दातारकर, शुभम मेश्राम, माजी पंचायत समिती सदस्य गणेश आडे यांनी भेटी दिल्या आणि नुकसानीची पाहणी केली.सुटीने खोळंबले सर्वेक्षणजिल्ह्यात अवकाळी पावसाने होणाऱ्या नुकसानीचे तत्काळ सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहे. दिवाळीच्या सुट्यांमुळे कर्मचारी शिवारात पोहोचण्यास विलंब लागत आहे. यामुळे नुकसानीचे सर्वेक्षण खोळंबले आहे. त्यामुळे नुकसान आणखी वाढणार आहे.

अतिपाण्याने हरभरा जळण्याचा धोकाजिल्ह्यात सतत कोसळणाºया पावसाने रब्बी हरभरा पिकाला मोठा फटका बसण्याचा धोका वाढला आहे. अतिपावसाने पेरलेला हरभरा जळण्याचा धोका वाढला आहे.विमा कंपनीचा फोन लागेनापीकविमा उतरविणाºया शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर या शेतकºयांना २४ तासात मदत देण्याचे आश्वासन विमा कंपनीने दिले होते. सध्या पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कंपनीचे प्रतिनिधीच गवसले नाही. त्यांचा दूरध्वनी क्रमांक कायमच बंद येत होता. यामुळे शेतकºयांनी विमा कंपनीवर रोष व्यक्त केला.भाजीपाला पिकांचे मोठे नुकसानसतत कोसळणाऱ्या पावसाने भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये पालक, मेथी, कोथिंबीर, भेंडी, वांगे, कारले, वाल, दोडके या पिकांना मोठा फटका बसला आहे. भाजीपाला उत्पादन घटण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :agricultureशेती