नेर : पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. पिके कोमेजून जात असल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहे. आणखी काही दिवस पाऊस न झाल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसासाठी येथे मंगळवारी मुस्लिम बांधवांनी प्रार्थना केली. वरुण राजा प्रसन्न व्हावा, यासाठी रात्री ९ ते २ वाजतापर्यंत रिजवान मौलवी यांनी साकडे घातले. सकाळीसुद्धा नमाज अदा करण्यात आली. यावेळी अकबान खान, जफरूल्ला खान रफीक शेख, याकूबखाँ यायाखान, कासिम कुरेशी, अकिल कुरेशी, रफिक टेलर, फारूक दिवाणजी, जफर खान, साजिद खान, अब्दुल अजिज, अजिज नूर आदी समाज बांधवांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)
मुस्लिम बांधवांची पावसासाठी प्रार्थना
By admin | Updated: July 16, 2015 02:29 IST