शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

मानधनाच्या प्रतीक्षेत ३४ निराधारांनी सोडले प्राण

By admin | Updated: July 23, 2014 00:14 IST

निराधार योेजनेच्या मानधनासाठी उपोषण, आंदोलन, पदयात्रा आदी करूनही पदरात काहीच पडले नाही. दरम्यानच्या काळात ३३ वृद्ध निराधार लाभार्थ्यांनी मानधनाच्या प्रतीक्षेत प्राण सोडला.

उपेक्षा कायम : महागाव तालुक्यातील निराधार आंदोलन करूनही थकलेमहागाव : निराधार योेजनेच्या मानधनासाठी उपोषण, आंदोलन, पदयात्रा आदी करूनही पदरात काहीच पडले नाही. दरम्यानच्या काळात ३३ वृद्ध निराधार लाभार्थ्यांनी मानधनाच्या प्रतीक्षेत प्राण सोडला. मात्र अद्यापही प्रशासनाला जाग आली नाही. निराधार मंडळी लाभासाठी तहसीलचे उंबरठे मात्र कायम झिजवित आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचा लाभ मिळतो. महागाव तालुक्यातील शेकडो वृद्ध निराधारांना लाभ मिळत होता. मात्र २०११ मध्ये तालुक्यातील तीन हजार लाभार्थी या योजनेतून अचानक बाद झाले. एक रुपयाही अनुदान मिळाले नाही. अनुदानासाठी दररोज तहसील कार्यालयावर वृद्ध निराधार धडकत आहे. या निराधारांचा प्रश्न घेऊन पंचायत समितीचे माजी सभापती डी.बी. नाईक, जगदीश नरवाडे यांनी वारंवार आंदोलने केली. गेल्या दोन महिन्यापूर्वी तर प्रदीर्घ लढा देण्यात आला. तहसील कार्यालयासमोर प्रश्न सुटत नसल्याने आंदोलनकर्ते पदयात्रा करीत उमरखेडच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले. मात्र उपयोग झाला नाही. दरम्यान किसान सभेचे पॉलिटब्युरो सीताराम येचुरी यांनी थेट उपजिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारे यांना विचारणा केली होती. मात्र अनुदान मिळाले नाही. वृद्ध निराधारांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. पुरेसे अन्न मिळत नसल्याने उपासमार होत आहे. वृद्धापकाळात दुसऱ्या पुढे हात पसरण्याचा अपमानास्पद प्रसंग या वृद्धांवर आला आहे. अशा परिस्थितीत ३४ जणांनी जगाचाच निरोप घेतला. त्यात अंबाजी बनसोडे, आनंदा रोकडे उटी, शेख इमाम शेख फतरु मोरथ, तुळशीराम इंगोले जनुना, अंजूबाई ठाकरे, जनाबाई बोरकर, अनुसया चौधरी, नारायण राऊत करंजखेड, मुक्ताबाई भांडवले कलगाव, तुळसाबाई अढागळे कोठारी, शेख इमाम शेख चाँद काळी टेंभी, शेख हलीमा शेख शेरु, दगडूबाई गोंडाडे, अंजूबाई गुलाब, अनुसया लांडगे, धारुबाई भगत, हुसानाबी नवाबोद्दीन फुलसावंगी, गोपाळ शिंदे इजनी, रायभान चपाट, मुकुंदा भगत वेणी, बैनाबाई गडदने, भाऊ हनवते, शारदाबाई हनवते, गुणाबाई हुलगुंडे सवना, सावित्रीबाई लहाने माळकिन्ही, सरूबाई लोखंडे, धरुबाई गरडे सारखनी, यशोदाबाई पहूर पिंपळगाव, सरस्वती चिपडे, गयाबाई ढोले, नामदेव ढोले, तोतीबाई राठोड गुंज, नागोराव फुलउंबरकर कान्हा, दुर्गाबाई खोकले पिंपळगाव यांचा समावेश आहे. अनेक निराधार अखेरच्या घटका मोजत आहे. परंतु प्रलंबित प्रकरणांवर प्रशासन तोडगा काढायला तयार नाही. आता प्रशासनाला किती बळी हवे आहेत असा प्रश्न विचारला जात आहे. (शहर प्रतिनिधी)