शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

मानधनाच्या प्रतीक्षेत ३४ निराधारांनी सोडले प्राण

By admin | Updated: July 23, 2014 00:14 IST

निराधार योेजनेच्या मानधनासाठी उपोषण, आंदोलन, पदयात्रा आदी करूनही पदरात काहीच पडले नाही. दरम्यानच्या काळात ३३ वृद्ध निराधार लाभार्थ्यांनी मानधनाच्या प्रतीक्षेत प्राण सोडला.

उपेक्षा कायम : महागाव तालुक्यातील निराधार आंदोलन करूनही थकलेमहागाव : निराधार योेजनेच्या मानधनासाठी उपोषण, आंदोलन, पदयात्रा आदी करूनही पदरात काहीच पडले नाही. दरम्यानच्या काळात ३३ वृद्ध निराधार लाभार्थ्यांनी मानधनाच्या प्रतीक्षेत प्राण सोडला. मात्र अद्यापही प्रशासनाला जाग आली नाही. निराधार मंडळी लाभासाठी तहसीलचे उंबरठे मात्र कायम झिजवित आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचा लाभ मिळतो. महागाव तालुक्यातील शेकडो वृद्ध निराधारांना लाभ मिळत होता. मात्र २०११ मध्ये तालुक्यातील तीन हजार लाभार्थी या योजनेतून अचानक बाद झाले. एक रुपयाही अनुदान मिळाले नाही. अनुदानासाठी दररोज तहसील कार्यालयावर वृद्ध निराधार धडकत आहे. या निराधारांचा प्रश्न घेऊन पंचायत समितीचे माजी सभापती डी.बी. नाईक, जगदीश नरवाडे यांनी वारंवार आंदोलने केली. गेल्या दोन महिन्यापूर्वी तर प्रदीर्घ लढा देण्यात आला. तहसील कार्यालयासमोर प्रश्न सुटत नसल्याने आंदोलनकर्ते पदयात्रा करीत उमरखेडच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले. मात्र उपयोग झाला नाही. दरम्यान किसान सभेचे पॉलिटब्युरो सीताराम येचुरी यांनी थेट उपजिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारे यांना विचारणा केली होती. मात्र अनुदान मिळाले नाही. वृद्ध निराधारांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. पुरेसे अन्न मिळत नसल्याने उपासमार होत आहे. वृद्धापकाळात दुसऱ्या पुढे हात पसरण्याचा अपमानास्पद प्रसंग या वृद्धांवर आला आहे. अशा परिस्थितीत ३४ जणांनी जगाचाच निरोप घेतला. त्यात अंबाजी बनसोडे, आनंदा रोकडे उटी, शेख इमाम शेख फतरु मोरथ, तुळशीराम इंगोले जनुना, अंजूबाई ठाकरे, जनाबाई बोरकर, अनुसया चौधरी, नारायण राऊत करंजखेड, मुक्ताबाई भांडवले कलगाव, तुळसाबाई अढागळे कोठारी, शेख इमाम शेख चाँद काळी टेंभी, शेख हलीमा शेख शेरु, दगडूबाई गोंडाडे, अंजूबाई गुलाब, अनुसया लांडगे, धारुबाई भगत, हुसानाबी नवाबोद्दीन फुलसावंगी, गोपाळ शिंदे इजनी, रायभान चपाट, मुकुंदा भगत वेणी, बैनाबाई गडदने, भाऊ हनवते, शारदाबाई हनवते, गुणाबाई हुलगुंडे सवना, सावित्रीबाई लहाने माळकिन्ही, सरूबाई लोखंडे, धरुबाई गरडे सारखनी, यशोदाबाई पहूर पिंपळगाव, सरस्वती चिपडे, गयाबाई ढोले, नामदेव ढोले, तोतीबाई राठोड गुंज, नागोराव फुलउंबरकर कान्हा, दुर्गाबाई खोकले पिंपळगाव यांचा समावेश आहे. अनेक निराधार अखेरच्या घटका मोजत आहे. परंतु प्रलंबित प्रकरणांवर प्रशासन तोडगा काढायला तयार नाही. आता प्रशासनाला किती बळी हवे आहेत असा प्रश्न विचारला जात आहे. (शहर प्रतिनिधी)