शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

दिग्रसच्या सूर्यकोटी मंडळातर्फे प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 22:32 IST

येथील मोठा मारोती मंदिर परिसरातील सूर्य कोटी गणेश मंडळाने सामाजिक प्रबोधनाची परंपरा जोपासत यावर्षी भाविकांना तालुक्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याची विनवणी केली आहे.

ठळक मुद्देपूरग्रस्तांना मदतीची विनवणी : विविध छायाचित्रातून उभा केला वास्तववादी पट

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : येथील मोठा मारोती मंदिर परिसरातील सूर्य कोटी गणेश मंडळाने सामाजिक प्रबोधनाची परंपरा जोपासत यावर्षी भाविकांना तालुक्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याची विनवणी केली आहे.आॅगस्टमध्ये मुसळधार पावसाने शहराच्या मध्यवस्तीतून जाणाऱ्या धावंडा नदीला महापूर आला. नदी कोपल्याने शहरात पुराचे पाणी शिरले. यामुळे हजारो घरांचे नुकसान झाले, शेकडोंचे संसार उघड्यावर आले. पालिकेच्या हलगर्जीपणामुळे १३ वर्षांपूर्वी ९ जुलै २००५ रोजी नांदगव्हाण धरणाची सुरक्षा भिंत तुटल्याने धावंडा नदीला महापूर आला होता. त्यात १४ निष्पापांचे बळी गेले होते. घरातील चीजवस्तू, पैसा-अडका वाहून गेला होता. बायका-मुलांचे जीव वाचविण्यासाठी अनेक कुटुंब प्रमुखांनी जीवाचा आटापिटा केला होता. ज्यांना जमले नाही, त्यांच्या डोळ्यासमोर काळजाचे तुकडे वाहून गेले. त्यांच्या किंकाळ्या आजही कानात घुमत आहे. १३ वर्षे उलटूनही त्या आठवणींमधून दिग्रसकर बाहेर येऊ शकलेले नाही.१३ वर्षांपासून त्यांच्या घरकुलांचे बांधकाम सुरू आहे. मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही. ते तेव्हाच पूर्ण झाले असते, तर आता धावंडेला झालेल्या नुकसानीपासून दिग्रसकरांची सुटका झाली असती. यातील भ्रष्टाचाराची चौकशी करून लवकरात लवकर घरकूल बांधून देत आमचे पुनर्वसन करावे, असा पूरग्रस्तांमधून व्यक्त होणारा सूर मंडळाने नागरिकांसमोरच मांडला.शब्द दर्शवतात पूरग्रस्तांच्या व्यथाधावंडा कोपल्याने हजारोंचा संसार उघड्यावर आला. ९ जुलैच्या त्या काळ रात्रीची आठवण आजही असह्य करून सोडते. आता मलमपट्टी नको, तर कायम उपाययोजना करा मानवतेची, हाक मदतीची-पूरग्रस्तांचे संसार सावरण्यास मदत करा, मदतीसाठी पुढे आलेला एक हात-लाख मोलाच्या सल्ल्यापेक्षा श्रेष्ठ, जो इतरांचे दु:ख समजून घेतो-तोच खरा सज्जन समजावा, आम्हा पूरग्रस्तांना-घर देता घर, आम्ही मेल्यानंतरच देणार का कायमचे घर, अशा शब्दांतून मंडळाने पूरग्रस्तांची व्यथा मांडली आहे. सूर्य कोटी गणेश मंडळाने पूरग्रस्तांचे हाल दिग्रसकरांसमोर मांडून एका महत्त्वाच्या समस्येला नव्याने वाचा फोडल्याबद्दल मंडळाचे कौतुक होत आहे.