शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दिग्रसच्या सूर्यकोटी मंडळातर्फे प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 22:32 IST

येथील मोठा मारोती मंदिर परिसरातील सूर्य कोटी गणेश मंडळाने सामाजिक प्रबोधनाची परंपरा जोपासत यावर्षी भाविकांना तालुक्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याची विनवणी केली आहे.

ठळक मुद्देपूरग्रस्तांना मदतीची विनवणी : विविध छायाचित्रातून उभा केला वास्तववादी पट

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : येथील मोठा मारोती मंदिर परिसरातील सूर्य कोटी गणेश मंडळाने सामाजिक प्रबोधनाची परंपरा जोपासत यावर्षी भाविकांना तालुक्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याची विनवणी केली आहे.आॅगस्टमध्ये मुसळधार पावसाने शहराच्या मध्यवस्तीतून जाणाऱ्या धावंडा नदीला महापूर आला. नदी कोपल्याने शहरात पुराचे पाणी शिरले. यामुळे हजारो घरांचे नुकसान झाले, शेकडोंचे संसार उघड्यावर आले. पालिकेच्या हलगर्जीपणामुळे १३ वर्षांपूर्वी ९ जुलै २००५ रोजी नांदगव्हाण धरणाची सुरक्षा भिंत तुटल्याने धावंडा नदीला महापूर आला होता. त्यात १४ निष्पापांचे बळी गेले होते. घरातील चीजवस्तू, पैसा-अडका वाहून गेला होता. बायका-मुलांचे जीव वाचविण्यासाठी अनेक कुटुंब प्रमुखांनी जीवाचा आटापिटा केला होता. ज्यांना जमले नाही, त्यांच्या डोळ्यासमोर काळजाचे तुकडे वाहून गेले. त्यांच्या किंकाळ्या आजही कानात घुमत आहे. १३ वर्षे उलटूनही त्या आठवणींमधून दिग्रसकर बाहेर येऊ शकलेले नाही.१३ वर्षांपासून त्यांच्या घरकुलांचे बांधकाम सुरू आहे. मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही. ते तेव्हाच पूर्ण झाले असते, तर आता धावंडेला झालेल्या नुकसानीपासून दिग्रसकरांची सुटका झाली असती. यातील भ्रष्टाचाराची चौकशी करून लवकरात लवकर घरकूल बांधून देत आमचे पुनर्वसन करावे, असा पूरग्रस्तांमधून व्यक्त होणारा सूर मंडळाने नागरिकांसमोरच मांडला.शब्द दर्शवतात पूरग्रस्तांच्या व्यथाधावंडा कोपल्याने हजारोंचा संसार उघड्यावर आला. ९ जुलैच्या त्या काळ रात्रीची आठवण आजही असह्य करून सोडते. आता मलमपट्टी नको, तर कायम उपाययोजना करा मानवतेची, हाक मदतीची-पूरग्रस्तांचे संसार सावरण्यास मदत करा, मदतीसाठी पुढे आलेला एक हात-लाख मोलाच्या सल्ल्यापेक्षा श्रेष्ठ, जो इतरांचे दु:ख समजून घेतो-तोच खरा सज्जन समजावा, आम्हा पूरग्रस्तांना-घर देता घर, आम्ही मेल्यानंतरच देणार का कायमचे घर, अशा शब्दांतून मंडळाने पूरग्रस्तांची व्यथा मांडली आहे. सूर्य कोटी गणेश मंडळाने पूरग्रस्तांचे हाल दिग्रसकरांसमोर मांडून एका महत्त्वाच्या समस्येला नव्याने वाचा फोडल्याबद्दल मंडळाचे कौतुक होत आहे.