शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
2
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
3
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
4
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
5
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
6
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
7
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
8
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
9
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
10
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
11
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
12
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
13
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
14
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
15
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
16
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
17
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
18
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण

प्रफुल्ल पटेल यांचा यवतमाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नागरी सत्कार

By admin | Updated: June 29, 2016 02:30 IST

यवतमाळ : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार प्रफुल्ल पटेल यांचा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ...

यवतमाळ : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार प्रफुल्ल पटेल यांचा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने यवतमाळ नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन केले.खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले, शिवसेनेची सत्ता असताना आणि सेनेचा पालकमंत्री असताना यवतमाळ बंदची हाक शिवसेनेतर्फे दिली जाते. ते सत्तेत असल्याचे विसरून त्यांना आजही आपण विरोधात असल्याचे वाटते तर दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी वाल्यांना आपण आजही सत्तेत असल्याचा भास होतो, म्हणूनच आपण कुठेतरी कमी पडत असल्याच्या कानपिचक्याही त्यांनी पदाधिकाऱ्यांना घेतल्या. काँग्रेसमुळे राष्ट्रवादीला सुरूवातीपासून मार बसल्याचे सांगून मूळात काँग्रेससोबत जाणे ही मोठी चूक झाल्याची कबुली पटेल यांनी यावेळी दिली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेना-भाजपा पेक्षाही मोठा शत्रू राष्ट्रवादीला मानले होते, त्यामुळे ते तर गेलेच शिवाय आपलेही नुकसान करून गेल्याचे ते म्हणाले. विदर्भातील मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे दोघे विदर्भासाठी काय करीत आहेत, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. पाच-सात हजार कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन मागे गडकरी यांनी यवतमाळात केले, गोंदियातही केले. परंतु अद्याप या कामांचे गोंदियात टेंडरही निघाले नाही सोबतच मिहानचे काम थंडबस्त्यात असल्याचे ते म्हणाले. प्रत्यक्षात कामांना सुरूवातच होत नसून केवळ गाजावाजाच जास्त होत आहे. या दोन वर्षात कोणत्याही बाबतीत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूरांचे ‘अच्छे दिन’आले नाही. सध्या काँग्रेस, सेना व भाजपाची राज्यातील स्थिती पाहता येत्या काळात राष्ट्रवादीला मोठी संधी राज्यात असल्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला. यावेळी इतर मान्यवरांनीसुद्धा आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना गाडबैले, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, महिला जिल्हाध्यक्ष क्रांती धोटे, संध्याताई इंगोले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वसंत घुईखेडकर, जिल्हा परिषद सभापती सुभाष ठोकळ, लता खांदवे, ययाती नाईक, उत्तमराव शेळके, विजय चव्हाण, अनिरुद्ध लोणकर, आशिष मानकर, शबीना बेग आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)पेट्रोलचे दर ३५ रुपये असायला पाहिजेजागतिक स्तरावरील पेट्रोलियम पदार्थांच्या घडामोडींवर नजर टाकल्यास आपल्याकडे पेट्रोलचे दर लिटरमागे ३५ ते ४० रुपये असायला पाहिजे परंतु आज पेट्रोलचे दर डबलने आहे. आमच्या वेळी आम्ही पेट्रोलियम कंपन्यांना दोन लाख कोटी रुपये देत होतो, जेणेकरून सर्वसमान्यांच्या खिशावर ताण येऊ नये, हे सरकार मात्र स्वत: पैसा कमवित असल्याचा आरोप खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला.