शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

पांढरकवडा नगरपरिषदेतर्फे धडक स्वच्छता मोहीम

By admin | Updated: June 14, 2017 00:24 IST

पांढरकवडा नगरपरिषदेतर्फे मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहिम राबविल्या जात असून या मोहिमेत ...

स्वच्छ भारत अभियान : नगरवासीयांचे सहकार्य आवश्यक -वंदना रॉय लोकमत न्यूज नेटवर्क पांढरकवडा : पांढरकवडा नगरपरिषदेतर्फे मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहिम राबविल्या जात असून या मोहिमेत नगरवासियांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष वंदना रॉय यांनी केले आहे. शहरातील नागरिकांच्या आणि नगरसेवकांच्या सहकार्यानेच नगरविकासाच्या कामात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल पांढरकवडा नगरपरिषदेला अमरावती विभागातून उत्कृष्ठ नगरपरिषदेचा व्दितीय क्रमांकाचा एक कोटी रूपयांचा पुरस्कारमिळाला. हा संपुर्ण शहरवासियांचा सन्मान आहे. शासनाच्या स्वच्छ भारत योजनेअंतर्गत नगरपरिषदेतर्फे राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेतसुध्दा नागरिक असेच सहकार्य करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शहरातील नाल्यांची साफसफाई करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून पावसाने नाल्या तुंबू नये, यासाठी नियमित नाल्या साफ केल्या जात आहेत. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे स्वच्छ पाण्याचा पुरवठा केल्या जात आहे, असेही त्यांनी सांगीतले. ‘ग्रीन सिटी’साठी जय्यत तयारी खऱ्या अर्थाने पांढरकवडा शहर हे ‘ग्रिन सिटी’ व्हावे अशी आपली मनिषा असून संपुर्ण शहर हिरवेगार करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे नगराध्यक्ष वंदना रॉय यांनी सांगितले. मागील वर्षी प्रमाणेच यावर्षीदेखील १ जुलैपासून शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रात यावर्षी देखील मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण होणार असून यवतमाळ जिल्ह्यात २३ लाख ७९ हजार वृक्ष लागवडीचे उदिष्ट आहे. पांढरकवडा नगरपरिषदेने देखील शासनाच्या या योजनेत मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे ठरविले आहे. शहरवासियांच्या सहकार्याने मागीलवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. वृक्षारोपनासह लावलेल्या वृक्षाचे संगोपन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे त्या म्हणाल्या.