शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पांढरकवडा नगरपरिषदेतर्फे धडक स्वच्छता मोहीम

By admin | Updated: June 14, 2017 00:24 IST

पांढरकवडा नगरपरिषदेतर्फे मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहिम राबविल्या जात असून या मोहिमेत ...

स्वच्छ भारत अभियान : नगरवासीयांचे सहकार्य आवश्यक -वंदना रॉय लोकमत न्यूज नेटवर्क पांढरकवडा : पांढरकवडा नगरपरिषदेतर्फे मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहिम राबविल्या जात असून या मोहिमेत नगरवासियांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष वंदना रॉय यांनी केले आहे. शहरातील नागरिकांच्या आणि नगरसेवकांच्या सहकार्यानेच नगरविकासाच्या कामात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल पांढरकवडा नगरपरिषदेला अमरावती विभागातून उत्कृष्ठ नगरपरिषदेचा व्दितीय क्रमांकाचा एक कोटी रूपयांचा पुरस्कारमिळाला. हा संपुर्ण शहरवासियांचा सन्मान आहे. शासनाच्या स्वच्छ भारत योजनेअंतर्गत नगरपरिषदेतर्फे राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेतसुध्दा नागरिक असेच सहकार्य करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शहरातील नाल्यांची साफसफाई करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून पावसाने नाल्या तुंबू नये, यासाठी नियमित नाल्या साफ केल्या जात आहेत. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे स्वच्छ पाण्याचा पुरवठा केल्या जात आहे, असेही त्यांनी सांगीतले. ‘ग्रीन सिटी’साठी जय्यत तयारी खऱ्या अर्थाने पांढरकवडा शहर हे ‘ग्रिन सिटी’ व्हावे अशी आपली मनिषा असून संपुर्ण शहर हिरवेगार करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे नगराध्यक्ष वंदना रॉय यांनी सांगितले. मागील वर्षी प्रमाणेच यावर्षीदेखील १ जुलैपासून शहरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रात यावर्षी देखील मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण होणार असून यवतमाळ जिल्ह्यात २३ लाख ७९ हजार वृक्ष लागवडीचे उदिष्ट आहे. पांढरकवडा नगरपरिषदेने देखील शासनाच्या या योजनेत मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे ठरविले आहे. शहरवासियांच्या सहकार्याने मागीलवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. वृक्षारोपनासह लावलेल्या वृक्षाचे संगोपन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे त्या म्हणाल्या.