शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

वीज ग्राहकांच्या तक्रारींची थेट ऊर्जामंत्र्यांकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:10 IST

महावितरणकडून वीज ग्राहकांच्या तक्रारी कमी करण्यासाठी कसोसिने प्रयत्न केले जात असले तरीसुद्धा तक्रारी

 तक्रारींचा चढता आलेख : अधिकाऱ्यांनी ग्राहकांशी थेट संपर्क साधावालोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महावितरणकडून वीज ग्राहकांच्या तक्रारी कमी करण्यासाठी कसोसिने प्रयत्न केले जात असले तरीसुद्धा तक्रारी कमी होण्यापेक्षा वाढल्या आहेत. सदर बाब ऊर्जा मंत्र्यांच्या प्रत्यक्ष निदर्शनास आल्याने त्यांनी ही बाब गांभिर्याने घेतली आहे. त्यानुसार आता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्वत: वीज ग्राहकांचे मेळावे घेऊन त्यांच्या समस्या सोडवाव्यात, असे निर्देश दिले आहेत. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी यवतमाळसह विविध जिल्ह्यांना भेटी देऊन महावितरणच्या कामकाजाची पाहणी केली तथा महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. यासोबतच त्यांनी प्रत्यक्ष वीज ग्राहकांनाचा मेळावा घेऊन त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्या अपेक्षेपेक्षाही अधिक तक्रारी वीज ग्राहकांनी प्रत्यक्षरीत्या केल्या. यामध्ये विजेसंदर्भातील सर्व तक्रारींचा समावेश होता. वीज ग्राहकांच्या तक्रारी ऐकूण घेतल्या जात नाही आणि त्या वेळीच सोडविल्याही जात नसल्याचे यावेळी मंत्र्यांच्या लक्षात आले. अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून वेळीच तक्रारींची दखल घेऊन त्यांची सोडवणूक झाल्यास सर्वसामान्य वीज ग्राहक ऊर्जा मंत्र्यांपर्यंत का जाईल? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला. ही सर्व परिस्थिती प्रत्यक्ष पाहल्यानंतर ऊर्जामंत्र्यांनी व्यवस्थापकीय संचालक व प्रादेशिक संचालकांना पत्र पाठवून ग्राहकांच्या तक्रारी गांभिर्याने घेऊन त्यांची वेळेत सोडवणूक करण्याचे निर्देश सबंधितांना देण्याचे सांगितले. त्यानुसार मुख्य अभियंता यांनी प्रत्येक आठवड्याच्या गुरुवार, शुक्रवार, शनिवार या तीन दिवशी विभागीय कार्यालयात बैठक घेऊन ग्राहकांशी संपर्क साधावा. तसेच अधिक्षक अभियंता यांनी प्रत्येक आठवड्यात क्षेत्रीय स्तरावरील शाखा अभियंता कार्यालयात बैठक घेऊन तक्रारींचा आढावा घ्यावा तसेच ग्राहक मेळावे घेऊन वीज ग्राहकांशी थेट संपर्क साधावा जेणेकरून ग्राहकांच्या तक्रारीच शिल्लक राहणार नाहीत, असेही ऊर्जामंत्र्यांनी म्हटले आहे. एकीकडे महावितरणच्या वरिष्ठ स्तरावरून वीज ग्राहकांना योग्य व वेळेत सेवा मिळावी, यासाठी विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. परंतु या योजनांची अंमलबजावणी योग्यरित्या होत नसल्याने ग्राहकांच्या तक्रारी कमी होताना दिसत नाही.सतर्क व तत्पर सेवा द्यासध्याच्या संततधार पावसामुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या अभियंता व जनमित्रांनी सतर्क व तत्पर राहावे, वीजपुरवठा खंडीत झाल्यास दुरूस्तीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार पर्यायी व्यवस्थेतून त्वरित वीजपुरवठा सुरळीत करावा, असे असे निर्देश सर्व विभागांना मुख्य अभियंता सुहास रंगारी यांनी दिले आहेत.