शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
2
“मुंबईसाठी अदानी अन् आमची नैतिक लढाई सुरूच राहणार, ती थांबवणार नाही”: संजय राऊत
3
मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी 
4
आता PF च्या कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; 'पासपोर्ट केंद्रां'प्रमाणे मिळणार सेवा
5
कुलदीप सेंगर पुन्हा तुरुंगात जाणार? स्थगित शिक्षेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय
6
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबूल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
7
सावधान! मोबाईलवर येणारा एक मेसेज तुमचं बँक खातं रिकामं करू शकतो; काय आहे हा नवा 'SIM Box Scam'?
8
राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..!
9
'मला वाटलं पुढचा स्टीव्ह जॉब्स मीच आहे..;' सर्गेई ब्रिन यांनी गुगलच्या 'या' अपयशाबद्दल व्यक्त केली खंत
10
"त्यांनी कधीच मला सुनेसारखं वागवलं नाही...", सासूबाईंच्या निधनानंतर अमृता देशमुखची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट
11
निसर्गाचा अजब चमत्कार! पृथ्वीवर एक असे ठिकाण जिथे कधीच पडत नाही थंडी; शास्त्रज्ञही थक्क
12
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
13
BMC Election 2026: नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
14
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
15
५०० वर्षांनी ५ दुर्मिळ योगात २०२६ प्रारंभ: ८ राशींना लक्षणीय लाभ, अकल्पनीय पद-पैसा; शुभ घडेल!
16
Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...
17
सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन?
18
"जयपूरमध्ये बॉम्बस्फोट होणार!", मध्यरात्री फोन करून धमकी दिली; पोलिसांनी पकडल्यावर वेटर जे म्हणाला... 
19
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
20
Astro Tips: तुमच्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी आहे का? नसेल तर 'हे' नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वीज ग्राहकांच्या तक्रारींची थेट ऊर्जामंत्र्यांकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:10 IST

महावितरणकडून वीज ग्राहकांच्या तक्रारी कमी करण्यासाठी कसोसिने प्रयत्न केले जात असले तरीसुद्धा तक्रारी

 तक्रारींचा चढता आलेख : अधिकाऱ्यांनी ग्राहकांशी थेट संपर्क साधावालोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महावितरणकडून वीज ग्राहकांच्या तक्रारी कमी करण्यासाठी कसोसिने प्रयत्न केले जात असले तरीसुद्धा तक्रारी कमी होण्यापेक्षा वाढल्या आहेत. सदर बाब ऊर्जा मंत्र्यांच्या प्रत्यक्ष निदर्शनास आल्याने त्यांनी ही बाब गांभिर्याने घेतली आहे. त्यानुसार आता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्वत: वीज ग्राहकांचे मेळावे घेऊन त्यांच्या समस्या सोडवाव्यात, असे निर्देश दिले आहेत. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी यवतमाळसह विविध जिल्ह्यांना भेटी देऊन महावितरणच्या कामकाजाची पाहणी केली तथा महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. यासोबतच त्यांनी प्रत्यक्ष वीज ग्राहकांनाचा मेळावा घेऊन त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्या अपेक्षेपेक्षाही अधिक तक्रारी वीज ग्राहकांनी प्रत्यक्षरीत्या केल्या. यामध्ये विजेसंदर्भातील सर्व तक्रारींचा समावेश होता. वीज ग्राहकांच्या तक्रारी ऐकूण घेतल्या जात नाही आणि त्या वेळीच सोडविल्याही जात नसल्याचे यावेळी मंत्र्यांच्या लक्षात आले. अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून वेळीच तक्रारींची दखल घेऊन त्यांची सोडवणूक झाल्यास सर्वसामान्य वीज ग्राहक ऊर्जा मंत्र्यांपर्यंत का जाईल? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला. ही सर्व परिस्थिती प्रत्यक्ष पाहल्यानंतर ऊर्जामंत्र्यांनी व्यवस्थापकीय संचालक व प्रादेशिक संचालकांना पत्र पाठवून ग्राहकांच्या तक्रारी गांभिर्याने घेऊन त्यांची वेळेत सोडवणूक करण्याचे निर्देश सबंधितांना देण्याचे सांगितले. त्यानुसार मुख्य अभियंता यांनी प्रत्येक आठवड्याच्या गुरुवार, शुक्रवार, शनिवार या तीन दिवशी विभागीय कार्यालयात बैठक घेऊन ग्राहकांशी संपर्क साधावा. तसेच अधिक्षक अभियंता यांनी प्रत्येक आठवड्यात क्षेत्रीय स्तरावरील शाखा अभियंता कार्यालयात बैठक घेऊन तक्रारींचा आढावा घ्यावा तसेच ग्राहक मेळावे घेऊन वीज ग्राहकांशी थेट संपर्क साधावा जेणेकरून ग्राहकांच्या तक्रारीच शिल्लक राहणार नाहीत, असेही ऊर्जामंत्र्यांनी म्हटले आहे. एकीकडे महावितरणच्या वरिष्ठ स्तरावरून वीज ग्राहकांना योग्य व वेळेत सेवा मिळावी, यासाठी विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. परंतु या योजनांची अंमलबजावणी योग्यरित्या होत नसल्याने ग्राहकांच्या तक्रारी कमी होताना दिसत नाही.सतर्क व तत्पर सेवा द्यासध्याच्या संततधार पावसामुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या अभियंता व जनमित्रांनी सतर्क व तत्पर राहावे, वीजपुरवठा खंडीत झाल्यास दुरूस्तीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार पर्यायी व्यवस्थेतून त्वरित वीजपुरवठा सुरळीत करावा, असे असे निर्देश सर्व विभागांना मुख्य अभियंता सुहास रंगारी यांनी दिले आहेत.