शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

वीज ग्राहकांच्या तक्रारींची थेट ऊर्जामंत्र्यांकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:10 IST

महावितरणकडून वीज ग्राहकांच्या तक्रारी कमी करण्यासाठी कसोसिने प्रयत्न केले जात असले तरीसुद्धा तक्रारी

 तक्रारींचा चढता आलेख : अधिकाऱ्यांनी ग्राहकांशी थेट संपर्क साधावालोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महावितरणकडून वीज ग्राहकांच्या तक्रारी कमी करण्यासाठी कसोसिने प्रयत्न केले जात असले तरीसुद्धा तक्रारी कमी होण्यापेक्षा वाढल्या आहेत. सदर बाब ऊर्जा मंत्र्यांच्या प्रत्यक्ष निदर्शनास आल्याने त्यांनी ही बाब गांभिर्याने घेतली आहे. त्यानुसार आता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्वत: वीज ग्राहकांचे मेळावे घेऊन त्यांच्या समस्या सोडवाव्यात, असे निर्देश दिले आहेत. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी यवतमाळसह विविध जिल्ह्यांना भेटी देऊन महावितरणच्या कामकाजाची पाहणी केली तथा महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. यासोबतच त्यांनी प्रत्यक्ष वीज ग्राहकांनाचा मेळावा घेऊन त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्या अपेक्षेपेक्षाही अधिक तक्रारी वीज ग्राहकांनी प्रत्यक्षरीत्या केल्या. यामध्ये विजेसंदर्भातील सर्व तक्रारींचा समावेश होता. वीज ग्राहकांच्या तक्रारी ऐकूण घेतल्या जात नाही आणि त्या वेळीच सोडविल्याही जात नसल्याचे यावेळी मंत्र्यांच्या लक्षात आले. अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून वेळीच तक्रारींची दखल घेऊन त्यांची सोडवणूक झाल्यास सर्वसामान्य वीज ग्राहक ऊर्जा मंत्र्यांपर्यंत का जाईल? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला. ही सर्व परिस्थिती प्रत्यक्ष पाहल्यानंतर ऊर्जामंत्र्यांनी व्यवस्थापकीय संचालक व प्रादेशिक संचालकांना पत्र पाठवून ग्राहकांच्या तक्रारी गांभिर्याने घेऊन त्यांची वेळेत सोडवणूक करण्याचे निर्देश सबंधितांना देण्याचे सांगितले. त्यानुसार मुख्य अभियंता यांनी प्रत्येक आठवड्याच्या गुरुवार, शुक्रवार, शनिवार या तीन दिवशी विभागीय कार्यालयात बैठक घेऊन ग्राहकांशी संपर्क साधावा. तसेच अधिक्षक अभियंता यांनी प्रत्येक आठवड्यात क्षेत्रीय स्तरावरील शाखा अभियंता कार्यालयात बैठक घेऊन तक्रारींचा आढावा घ्यावा तसेच ग्राहक मेळावे घेऊन वीज ग्राहकांशी थेट संपर्क साधावा जेणेकरून ग्राहकांच्या तक्रारीच शिल्लक राहणार नाहीत, असेही ऊर्जामंत्र्यांनी म्हटले आहे. एकीकडे महावितरणच्या वरिष्ठ स्तरावरून वीज ग्राहकांना योग्य व वेळेत सेवा मिळावी, यासाठी विविध योजना सुरु करण्यात आल्या आहेत. परंतु या योजनांची अंमलबजावणी योग्यरित्या होत नसल्याने ग्राहकांच्या तक्रारी कमी होताना दिसत नाही.सतर्क व तत्पर सेवा द्यासध्याच्या संततधार पावसामुळे वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणच्या अभियंता व जनमित्रांनी सतर्क व तत्पर राहावे, वीजपुरवठा खंडीत झाल्यास दुरूस्तीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार पर्यायी व्यवस्थेतून त्वरित वीजपुरवठा सुरळीत करावा, असे असे निर्देश सर्व विभागांना मुख्य अभियंता सुहास रंगारी यांनी दिले आहेत.