शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीच्या गलथान कारभाराने शेतकरी त्रस्त

By admin | Updated: August 29, 2014 00:08 IST

वीज कंपनीच्या वडकी केंद्रांतर्गत सध्या मोठ्या प्रमाणात बोगस कारभार सुरू असून याचा फटका परिसरातील शेतकरी व नागरिकांना बसत आहे. वडकी अंतर्गत अनेक गावे येतात. या गावांमध्ये शेतकरी, शेतमजूरांची

मंगेश चवरडोल - किन्ही(जवादे)वीज कंपनीच्या वडकी केंद्रांतर्गत सध्या मोठ्या प्रमाणात बोगस कारभार सुरू असून याचा फटका परिसरातील शेतकरी व नागरिकांना बसत आहे. वडकी अंतर्गत अनेक गावे येतात. या गावांमध्ये शेतकरी, शेतमजूरांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी मोटरपंप व विहीर या दोनही बाबी असताना वीज पुरवठाच नसल्यामुळे शेतीला पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त आहे. परिसरातील गावांमध्ये वडकी वीज केंद्रावरून विद्युत पुरवठा पुरविण्यात आला आहे. परंतु २४ तासात १०० पेक्षा अधिकवेळा विजेची ये-जा सुरू असते.सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी, नागरिक, विद्यार्थी, व्यापारी सर्वच त्रस्त झाले आहेत. याबाबत वीज कंपनीच्या कार्यालयावर गावकरी तक्रारीसाठी वारंवार गेले असता तेथे कुणीही जबाबदार अभियंता कधीच उपलब्ध नसतो. अभियंता ताजने यांना त्यांच्या कार्यालयातूनच मोबाईलवर संपर्क करावा लागतो. त्यानंतर त्यांनी फोनवरच सांगितले की, मी वडकी कार्यालयाचा कायमस्वरूपी अभियंता नसून माझ्याकडे केवळ प्रभार आहे. तुम्ही कार्यालयात येवून नंतर भेटा. त्यांनी सांगितलेल्या तारखेवर कार्यालयात भेटावयास गेल्यास त्यादिवशी ते मात्र भेटत नाहीत. संबंधित किन्ही गावातील लाईनमनला फोन केल्यास आठ-आठ दिवसात लाईनमन बदलत असतात. त्यामुळे नेमका कुणाशी संपर्क साधावा, हा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. वडकी सर्कलमधील वीज कंपनीचे लाईनमन हे वडकीवरूनच संपूर्ण गावे पाहण्याचा प्रयत्न करतात. गावातील कोणत्याही खासगी व्यक्तीला फेज टाकण्यासाठी व वायर जोडण्यासाठी पाठवितात. यामुळे अपघाताची शक्यता फेटाळता येत नाही. गावागावातील डीपी फुटलेल्या आहे. अशा परिस्थितीत कुण्याही खासगी व्यक्तीकडून कामे करून घेणे म्हणजे मोठा धोका आहे. येथील वीज कंपनी कार्यालयाला कायमस्वरूपी अभियंता देण्यात यावा व प्रत्येक गावातील लाईनमनने आपली कामे स्वत: करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.