शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

युतीच्या सत्तेतही मावळे दुबळेच

By admin | Updated: November 14, 2015 02:39 IST

मावळा हा शब्द निष्ठेची प्रचिती देणारा. स्वराज्य स्थापनेसाठी हातावर शिर घेऊन लढणारे म्हणजे मावळा.

सुरेंद्र राऊत यवतमाळ मावळा हा शब्द निष्ठेची प्रचिती देणारा. स्वराज्य स्थापनेसाठी हातावर शिर घेऊन लढणारे म्हणजे मावळा. आजही अशाच मावळ्यांच्या जिवावर सत्तेचे इमले उभे आहे. जिल्ह्यातील राजकीय पटलावर मोठा फेरबदल करण्यात या मावळ्यांचीच म्हणजे कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. सत्तेसाठी आंदोलने उभे करणारे मावळे सत्तेत येताच स्वत:ला दुबळे समजायला लागले आहे. अनेकांची अगतिकता जाहीरपणे प्रकट होत आहे. तर पुढाऱ्यांच्या मागे पुढे संधीसाधूंचाच गराडा आहेत. भाजपने काँग्रेसला धोबीपछाड देत मोठा पक्ष म्हणून वर्चस्व सिद्ध केले. शिवसेनेनेही निकराची झुंज दिली. काही ठिकाणी निसटता पराभव झाला. सत्ता येताच कार्यकर्त्यांना मान-सन्मान मिळेल, अशी अपेक्षा होती. विशेषत: पदरमोड करून उभी केलेली आंदोलने प्रसंगी कुटुंबीयांच्या इच्छा आकांक्षांना मुरड घालून पक्षासाठी केलेली आर्थिक तडजोड अशा कार्यकर्त्यांच्याच भरवशावर आजची सत्ता उभी आहे. दुर्दैवाने या कार्यकर्त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी स्थानिक पुुढाऱ्यांकडून कोणतेच प्रयत्न होत नाही. उलट कमिशन घेऊन तयार असलेल्या संधीसाधूनीं नेत्यांभोवती गराडा घातला आहे. हे दृश्य पाहून निष्ठावान कार्यकर्त्यांना क्लेश होत आहे. विरोधात असताना जो दरारा आणि सन्मान शासन दरबारी मिळत होता, आता तो बाज नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. आघाडी सरकारच्या काळात विरोधक म्हणून किमान कामांचा विशिष्ट कोटा हाती लागत होता. त्यातून घरचे अर्थकारण भागत होते. सत्तेत आल्यानंतर हे सर्व रस्तेच बंद झाले आहे. शिवाय, रस्त्यावर उतरून आंदोलन करणेही शक्य नाही. हा सर्व प्रकार केवळ पाहावा लागत आहे. जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीतही निघालेली भरघोस नजर आणेवारी, रात्री बारा वाजता सिंचनासाठी वीज पुरवठा, पडलेले भाव, प्रशासनातील अनागोंदी, रुग्णालयातील सुस्तावलेली वैद्यकीय यंत्रणा अशा एक ना अनेक समस्या कायम आहेत. जनमानसात राहणाऱ्या या कार्यकर्त्याला यामुळे उत्तर देणे कठीण झाले. पहिल्या-दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील निष्ठावंतांची कुचंबणा ही घातक ठरणारी असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. जलयुक्तच्या कामातून कार्यकर्त्यांचे पुनर्वसन अपेक्षित होते. मात्र, नेत्यांनीच कमिशन कॅश करून कार्यकर्त्यांच्या तोंडाला पाने पुसली. पूर्वी आघाडीच्या सत्तेभोवती घोंगावणारे संधीसाधू यात मलिदा मिळवत आहे. आता तीन लाखांवरची कामे ई-टेंडरिंगने होत असल्याचा निर्णय घेऊन आमच्या आशाच संपविल्याचे सांगितले जात आहे. सत्तेत आलेल्या सेना-भाजपातील मावळ्यांचे हे बोलके रूदन सर्वांनाच अंतर्मुख करायला लावणारे आहे.