शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

नापिकीमुळे पशूधन विक्रीला

By admin | Updated: January 1, 2015 23:09 IST

घाटंजीचा बैल बाजार जिल्ह्यासह परजिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. सध्या या बैलबाजारात विक्रीसाठी आणलेल्या पशुंची मोठी गर्दी आहे. परंतु पशुंच्या या गर्दीला शेतकऱ्यांच्या दु:ख व अगतिकतेची

सुधाकर अक्कलवार - घाटंजीघाटंजीचा बैल बाजार जिल्ह्यासह परजिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. सध्या या बैलबाजारात विक्रीसाठी आणलेल्या पशुंची मोठी गर्दी आहे. परंतु पशुंच्या या गर्दीला शेतकऱ्यांच्या दु:ख व अगतिकतेची झालर आहे. नापिकी व कर्जबाजारिपणामुळे शेतकऱ्यांकडे दमडीही शिल्लक नाही. त्यामुळे जीवापेक्षाही जपलेल्या या पशुधनाला जड अंतकरणाने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बैलबाजारात आणले.सततची नापिकी आणि यावर्षी असलेली दुष्काळी परिस्थिती यामुळे शेतकरी पूर्णत: खचून गेला आहे. अंगावरील बँका व सावकारांचे कर्ज कसे फेडायचे, घरातील मुलामुलींचे विवाह कसे करायचे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असे विविध प्रश्न त्याच्या मनात काहूर माजवताहेत. शिवाय पाण्याचे स्त्रोत आतापासूनच नष्ट झाले असून वैरणाची समस्या निर्माण झाली आहे. नुकतेच नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपले. या अधिवेशनापासून विदर्भ-मराठवाड्यातील दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु शेतकरी हिताचा कोणताही ठोस निर्णय न झाल्याने व आता रबीतूनही फारकाही वाचेल असे वाटत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पाळलेले जनावरे आता विक्रीसाठी बाजारात आणली आहे. उल्लेखनिय म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून पाळलेली ही जनावरे शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे झाली आहे. यातून कसाबसा आपला व्यवहार भागवायचा, मुला-मुलींचे लग्नकार्य करायचे आणि पैसे उरल्यास पुन्हा शेतीला लावायचे, असे चक्र शेतकऱ्यांनी ठरविले आहे. शेतकऱ्यांचा अशा प्रकारचा मानस असला तरी बाजारातील वाढलेली आवकसुद्धा त्यांच्या अंगलट आली आहे. जो भाव त्यांना मिळायला पाहिजे तो येथे मिळताना दिसत नाही. त्यामुळे येथेही त्यांच्या पदरी निराशाच आली. अनेक शेतकऱ्यांची मुले शेतकऱ्यांना विचारतात की तुम्ही बैल विक्रीस काढले मग आपण शेती कशी करायची. परंतु परिस्थितीची जाण त्या मुलांना नसल्यामुळे शेतकऱ्यांकडेही काय उत्तर द्यावं हा प्रश्नच आहे. त्याबाबतचा विचार आजच केल्यास त्याचा संपूर्ण व्यवहार ठप्प पडणार असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. यावर्षी अत्यल्प उत्पन्न झाले असून लागलेला खर्चही निघाला नाही. ज्या अटीवर आपण व्यवहार केला आहे त्याचे पैसे फेडायचे कसे, घरात धान्याचा दाणा नाही, उदरपोषण करायचे कसे, अखेर जनावरे विकून काही तरी ओझे हलके होईल, असे वाटून आम्ही आजवर जपलेली ही जनावरे बैलबाजारात विक्रीस आणल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. भविष्यात काय समस्या येईल याबाबत विचार करण्यापेक्षा आजचा विचार केल्याने हा निर्णय घेतला आहे. काही शेतकऱ्यांनी तर जीवापाड घरातील सदस्यांप्रमाणे सांभाळलेल्या जनावरांना विकण्याची इच्छा नसताना नाईलाजाने विकावे लागत असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांप्रती भरीव मदत जाहीर करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना केंद्र व राज्यातील सत्तांतरानंतर नवीन सरकार तारेल काय, नाही म्हणायला काँग्रेसने दुष्काळात शेतकऱ्यांना अनेकदा भरीव मदत केली आहे. नवीन सरकारनेसुद्धा काँग्रेसचा कित्ता गिरवित शेतकऱ्यांना मदत करावी, तसेच नापिकी व कर्जबाजारीपणावर कायमस्वरूपी उपाय योजावेत, अशी अपेक्षा घाटंजीच्या बैलबाजारात पशुधन विक्रीस आणलेल्या शेतकऱ्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ व्यक्त केली.