शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये मोर्चेबांधणी

By admin | Updated: March 9, 2015 01:41 IST

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलले, आता जिल्हाध्यक्षही बदलतीलच, असा अंदाज बांधून काँग्रेसमधील

यवतमाळ मुख्यालयाचा आग्रह : भाजप, सेना, राष्ट्रवादीचा हवालायवतमाळ : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलले, आता जिल्हाध्यक्षही बदलतीलच, असा अंदाज बांधून काँग्रेसमधील काही नेतेमंडळींनी जिल्हाध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी चालविली आहे. संभाव्य जिल्हाध्यक्ष यवतमाळ मुख्यालयाचा होणार की पुन्हा ग्रामीण भागातील याकडे लक्ष लागले आहे. काँग्रेसने राज्याची सूत्रे माणिकराव ठाकरे यांच्याकडून काढून घेऊन खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे सोपविली. प्रदेशाध्यक्ष बदलताच यवतमाळ जिल्हा काँग्रेसमध्येही अध्यक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहे. नवे प्रदेशाध्यक्ष आपली नवी टीम बनविणार की जुन्याच खेळाडूंच्या बळावर पुढचा कारभार चालविणार, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र येथील जिल्हाध्यक्ष अनेक वर्षांपासून असल्याने त्यांना बदलले जाण्याची दाट शक्यता आहे. ही शक्यता पाहता काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होण्यासाठी अनेक नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. उमरखेड, दिग्रस या तालुक्यांमधून अधिक जोर पाहायला मिळत आहे. गेली काही वर्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद मुख्यालयापासून ११० किलोमीटर दूर ग्रामीण भागात जिल्ह्याच्या एका बाजूला गेले होते. यावेळी मात्र जिल्हाध्यक्ष हा यवतमाळ जिल्हा मुख्यालयी राहणारा असावा, असा सूर काँग्रेसच्या गोटातून ऐकायला मिळत आहे. अध्यक्षपद पुन्हा उमरखेडकडे गेल्यास जुन्याच कारभाराची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तविता ग्रामीण भागात नेतृत्व सोपविण्यास पक्षातूनच विरोध केला जात आहे. काँग्रेसमधीलच एक गट अध्यक्षपद यवतमाळ मुख्यालयी द्यावे म्हणून प्रयत्नरत आहे. त्यासाठी शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादीतील जिल्हाध्यक्षपदाचा हवाला दिला जात आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुखपद अद्याप महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडेच आहे. नवा जिल्हा प्रमुख कोण आणि केव्हा होणार, याची प्रतीक्षा शिवसैनिकांना आहे. भाजपाचेही जिल्हाध्यक्ष यवतमाळचेच आहेत. मात्र त्यांची टर्म मार्चअखेरीस संपणार आहे. त्यांना पुन्हा संधी दिली जाते की नवा चेहरा आणला जातो, याकडे लक्ष लागले आहे. मात्र चेंज झाल्यास भाजपाचा नवा जिल्हाध्यक्ष जिल्हा मुख्यालयाचाच करण्याकडे आमदार मंडळींचा कल असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षही यवतमाळ शहरातील आहेत. त्यामुळेच काँग्रेसमध्येसुद्धा नवा जिल्हाध्यक्ष यवतमाळ येथील द्यावा, असा आग्रह केला जात आहे. जिल्हा काँग्रेसची जबाबदारी एखाद्या तरुण अभ्यासू माजी आमदाराकडे दिली जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या आमदाराचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठीही चर्चेत होते. मात्र ही संधी हुकल्याने त्यांचे जिल्हाध्यक्ष म्हणून पुनर्वसन केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)विरोधाची धार वाढविण्यासाठी संघटनावर भरलोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस जिल्ह्यात चारीमुंड्या चित झाली. संघटनेतील साठमारी दूर करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. त्या बदलाचे वारे प्रदेश कमिटीपर्यंत पोहोचले असून आता जिल्हास्तरावरच्या समित्यांमध्येही फेरबदल होत आहे. विरोधी बाकावर बसलेल्या काँग्रेसजणांकडून विरोधाची धार वाढविण्यासाठी संघटनावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी पक्षातीलच सर्वश्रृत आणि नेहमी संपर्कात येणारे नेतृत्व जिल्हाध्यक्षपदी बसावं अशी मनीषा निष्ठावान कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. जिल्हा नियंत्रित करण्यासाठी मुख्यालयी दबदबा असलेल्या व्यक्तीलाच पक्षाची धुरा द्यावी, असाही सूर निघत आहे.