शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

जिल्हाध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये मोर्चेबांधणी

By admin | Updated: March 9, 2015 01:41 IST

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलले, आता जिल्हाध्यक्षही बदलतीलच, असा अंदाज बांधून काँग्रेसमधील

यवतमाळ मुख्यालयाचा आग्रह : भाजप, सेना, राष्ट्रवादीचा हवालायवतमाळ : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलले, आता जिल्हाध्यक्षही बदलतीलच, असा अंदाज बांधून काँग्रेसमधील काही नेतेमंडळींनी जिल्हाध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी चालविली आहे. संभाव्य जिल्हाध्यक्ष यवतमाळ मुख्यालयाचा होणार की पुन्हा ग्रामीण भागातील याकडे लक्ष लागले आहे. काँग्रेसने राज्याची सूत्रे माणिकराव ठाकरे यांच्याकडून काढून घेऊन खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे सोपविली. प्रदेशाध्यक्ष बदलताच यवतमाळ जिल्हा काँग्रेसमध्येही अध्यक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहे. नवे प्रदेशाध्यक्ष आपली नवी टीम बनविणार की जुन्याच खेळाडूंच्या बळावर पुढचा कारभार चालविणार, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र येथील जिल्हाध्यक्ष अनेक वर्षांपासून असल्याने त्यांना बदलले जाण्याची दाट शक्यता आहे. ही शक्यता पाहता काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होण्यासाठी अनेक नेत्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. उमरखेड, दिग्रस या तालुक्यांमधून अधिक जोर पाहायला मिळत आहे. गेली काही वर्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद मुख्यालयापासून ११० किलोमीटर दूर ग्रामीण भागात जिल्ह्याच्या एका बाजूला गेले होते. यावेळी मात्र जिल्हाध्यक्ष हा यवतमाळ जिल्हा मुख्यालयी राहणारा असावा, असा सूर काँग्रेसच्या गोटातून ऐकायला मिळत आहे. अध्यक्षपद पुन्हा उमरखेडकडे गेल्यास जुन्याच कारभाराची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तविता ग्रामीण भागात नेतृत्व सोपविण्यास पक्षातूनच विरोध केला जात आहे. काँग्रेसमधीलच एक गट अध्यक्षपद यवतमाळ मुख्यालयी द्यावे म्हणून प्रयत्नरत आहे. त्यासाठी शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादीतील जिल्हाध्यक्षपदाचा हवाला दिला जात आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुखपद अद्याप महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडेच आहे. नवा जिल्हा प्रमुख कोण आणि केव्हा होणार, याची प्रतीक्षा शिवसैनिकांना आहे. भाजपाचेही जिल्हाध्यक्ष यवतमाळचेच आहेत. मात्र त्यांची टर्म मार्चअखेरीस संपणार आहे. त्यांना पुन्हा संधी दिली जाते की नवा चेहरा आणला जातो, याकडे लक्ष लागले आहे. मात्र चेंज झाल्यास भाजपाचा नवा जिल्हाध्यक्ष जिल्हा मुख्यालयाचाच करण्याकडे आमदार मंडळींचा कल असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षही यवतमाळ शहरातील आहेत. त्यामुळेच काँग्रेसमध्येसुद्धा नवा जिल्हाध्यक्ष यवतमाळ येथील द्यावा, असा आग्रह केला जात आहे. जिल्हा काँग्रेसची जबाबदारी एखाद्या तरुण अभ्यासू माजी आमदाराकडे दिली जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या आमदाराचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठीही चर्चेत होते. मात्र ही संधी हुकल्याने त्यांचे जिल्हाध्यक्ष म्हणून पुनर्वसन केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)विरोधाची धार वाढविण्यासाठी संघटनावर भरलोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस जिल्ह्यात चारीमुंड्या चित झाली. संघटनेतील साठमारी दूर करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. त्या बदलाचे वारे प्रदेश कमिटीपर्यंत पोहोचले असून आता जिल्हास्तरावरच्या समित्यांमध्येही फेरबदल होत आहे. विरोधी बाकावर बसलेल्या काँग्रेसजणांकडून विरोधाची धार वाढविण्यासाठी संघटनावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी पक्षातीलच सर्वश्रृत आणि नेहमी संपर्कात येणारे नेतृत्व जिल्हाध्यक्षपदी बसावं अशी मनीषा निष्ठावान कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. जिल्हा नियंत्रित करण्यासाठी मुख्यालयी दबदबा असलेल्या व्यक्तीलाच पक्षाची धुरा द्यावी, असाही सूर निघत आहे.