शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

नगराध्यक्ष पदासाठी सेना-भाजपा अडून

By admin | Updated: November 20, 2015 02:53 IST

नगरपंचायत कळंबच्या त्रिशंकू अवस्थेत दोन पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्ता स्थापन होणे अशक्य आहे.

बैठक निष्फळ : दोन पक्ष एकत्र आल्याशिवाय कळंबमध्ये सत्ताप्राप्ती नाहीकळंब : नगरपंचायत कळंबच्या त्रिशंकू अवस्थेत दोन पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्ता स्थापन होणे अशक्य आहे. नगरपंचायतमध्ये शिवसेना पाच तर भाजपाचे चार नगरसेवक निवडून आले. नैसर्गिक मित्रपक्ष असलेल्या या दोन पक्षांनी एकत्र आल्यासच युतीचा झेंडा फडकल्या जाऊ शकते. परंतु हे दोन्ही पक्ष नगराध्यक्ष पदासाठी अडून बसले आहेत. त्यामुळे नुकतीच झालेली जिल्हा पातळीवरील बोलणीही निष्फळ ठरल्याचेच दिसून येते.आतापर्यंतच्या ग्रामपंचायत प्रशासनावर काँग्रेसची एकहाती सत्ता होती. केवळ मागील पंचवार्षीक ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. यावेळी या प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांना डावलून जनतेने नव्या दमाच्या युवकांवर विश्वास टाकला. त्यामुळे कळंब नगर पंचायतमध्ये शिवसेना व भाजपाने एकत्र येत सत्ता स्थापन करावी, असा जनतेचा कौल आहे. परंतु दोन्ही पक्षांच्या हेकेखोर वृत्तीमुळे युती संदर्भात एका ठराविक निष्कर्षावर चर्चा पोहचलेली नाही. पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार डॉ.अशोक उईके, आमदार मदन येरावार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे आदी नेत्यांमध्ये युतीच्या संदर्भात नुकतीच चर्चा झाली. या चर्चेत डॉ.अशोक उईके यांनी एक अपक्षासह आपले पाच नगरसेवक असल्याची बाजू मांडली. नगराध्यक्ष व केवळ एक विषय समिती सभापतीचे पद ठेऊन उपनगराध्यक्षांसह सर्व पदे शिवसेनेला देण्याचा फॉर्मुला ठेवण्यात आला. परंतु शिवसेनेने हा फॉर्मुला तत्काळ रिजेक्ट केला. नगराध्यक्ष होईल तर शिवसेनेचाच हा पवित्रा घेण्यात आला. कुठल्याही परिस्थितीत कळंब नगर पंचायतवर शिवसेनेचा भगवा फडकवायचाच, अशी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची भावना होती. एवढेच नाही तर सलग पाच वर्ष सेनेचाच नगराध्यक्ष राहील, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे नगराध्यक्ष निवडीची २७ तारीख आली असतानाही युतीच्या संदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे कळंबवासी अजुनही शेवटच्या क्षणी कोणाची युती होईल या संभ्रमात आहे. शैलजा प्रकाश उमरतकर या एकमेव नगरसेवक अपक्ष म्हणून निवडून आल्या. काँग्रेस, शिवसेना व भाजपानेही त्यांच्यावर दावा ठोकला आहे. परंतु त्यांनी आपण सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षासोबत राहणार असल्याचे सांगितले. आपण कोण्या एका पक्षासोबत नसून कुठलेही दोन पक्ष एकत्र येऊन सत्ता मिळविणाऱ्यांसोबत आहो. त्यामुळे आपल्याला कोणीही गृहित धरु नये, असे रोखठोक मत त्यांनी लोकमतशी बोलताना मांडले. (तालुका प्रतिनिधी)