शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
5
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
6
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
7
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
8
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
9
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
10
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
11
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
12
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
13
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
14
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
15
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
16
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
17
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
18
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
19
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
20
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे

नगराध्यक्ष पदासाठी सेना-भाजपा अडून

By admin | Updated: November 20, 2015 02:53 IST

नगरपंचायत कळंबच्या त्रिशंकू अवस्थेत दोन पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्ता स्थापन होणे अशक्य आहे.

बैठक निष्फळ : दोन पक्ष एकत्र आल्याशिवाय कळंबमध्ये सत्ताप्राप्ती नाहीकळंब : नगरपंचायत कळंबच्या त्रिशंकू अवस्थेत दोन पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्ता स्थापन होणे अशक्य आहे. नगरपंचायतमध्ये शिवसेना पाच तर भाजपाचे चार नगरसेवक निवडून आले. नैसर्गिक मित्रपक्ष असलेल्या या दोन पक्षांनी एकत्र आल्यासच युतीचा झेंडा फडकल्या जाऊ शकते. परंतु हे दोन्ही पक्ष नगराध्यक्ष पदासाठी अडून बसले आहेत. त्यामुळे नुकतीच झालेली जिल्हा पातळीवरील बोलणीही निष्फळ ठरल्याचेच दिसून येते.आतापर्यंतच्या ग्रामपंचायत प्रशासनावर काँग्रेसची एकहाती सत्ता होती. केवळ मागील पंचवार्षीक ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. यावेळी या प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांना डावलून जनतेने नव्या दमाच्या युवकांवर विश्वास टाकला. त्यामुळे कळंब नगर पंचायतमध्ये शिवसेना व भाजपाने एकत्र येत सत्ता स्थापन करावी, असा जनतेचा कौल आहे. परंतु दोन्ही पक्षांच्या हेकेखोर वृत्तीमुळे युती संदर्भात एका ठराविक निष्कर्षावर चर्चा पोहचलेली नाही. पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार डॉ.अशोक उईके, आमदार मदन येरावार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे आदी नेत्यांमध्ये युतीच्या संदर्भात नुकतीच चर्चा झाली. या चर्चेत डॉ.अशोक उईके यांनी एक अपक्षासह आपले पाच नगरसेवक असल्याची बाजू मांडली. नगराध्यक्ष व केवळ एक विषय समिती सभापतीचे पद ठेऊन उपनगराध्यक्षांसह सर्व पदे शिवसेनेला देण्याचा फॉर्मुला ठेवण्यात आला. परंतु शिवसेनेने हा फॉर्मुला तत्काळ रिजेक्ट केला. नगराध्यक्ष होईल तर शिवसेनेचाच हा पवित्रा घेण्यात आला. कुठल्याही परिस्थितीत कळंब नगर पंचायतवर शिवसेनेचा भगवा फडकवायचाच, अशी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची भावना होती. एवढेच नाही तर सलग पाच वर्ष सेनेचाच नगराध्यक्ष राहील, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे नगराध्यक्ष निवडीची २७ तारीख आली असतानाही युतीच्या संदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे कळंबवासी अजुनही शेवटच्या क्षणी कोणाची युती होईल या संभ्रमात आहे. शैलजा प्रकाश उमरतकर या एकमेव नगरसेवक अपक्ष म्हणून निवडून आल्या. काँग्रेस, शिवसेना व भाजपानेही त्यांच्यावर दावा ठोकला आहे. परंतु त्यांनी आपण सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षासोबत राहणार असल्याचे सांगितले. आपण कोण्या एका पक्षासोबत नसून कुठलेही दोन पक्ष एकत्र येऊन सत्ता मिळविणाऱ्यांसोबत आहो. त्यामुळे आपल्याला कोणीही गृहित धरु नये, असे रोखठोक मत त्यांनी लोकमतशी बोलताना मांडले. (तालुका प्रतिनिधी)