शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार
4
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
5
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
6
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
7
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
8
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
9
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
10
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
11
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
12
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
13
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
14
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
15
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
16
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
17
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
18
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
19
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
20
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्ष पदासाठी सेना-भाजपा अडून

By admin | Updated: November 20, 2015 02:53 IST

नगरपंचायत कळंबच्या त्रिशंकू अवस्थेत दोन पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्ता स्थापन होणे अशक्य आहे.

बैठक निष्फळ : दोन पक्ष एकत्र आल्याशिवाय कळंबमध्ये सत्ताप्राप्ती नाहीकळंब : नगरपंचायत कळंबच्या त्रिशंकू अवस्थेत दोन पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्ता स्थापन होणे अशक्य आहे. नगरपंचायतमध्ये शिवसेना पाच तर भाजपाचे चार नगरसेवक निवडून आले. नैसर्गिक मित्रपक्ष असलेल्या या दोन पक्षांनी एकत्र आल्यासच युतीचा झेंडा फडकल्या जाऊ शकते. परंतु हे दोन्ही पक्ष नगराध्यक्ष पदासाठी अडून बसले आहेत. त्यामुळे नुकतीच झालेली जिल्हा पातळीवरील बोलणीही निष्फळ ठरल्याचेच दिसून येते.आतापर्यंतच्या ग्रामपंचायत प्रशासनावर काँग्रेसची एकहाती सत्ता होती. केवळ मागील पंचवार्षीक ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. यावेळी या प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांना डावलून जनतेने नव्या दमाच्या युवकांवर विश्वास टाकला. त्यामुळे कळंब नगर पंचायतमध्ये शिवसेना व भाजपाने एकत्र येत सत्ता स्थापन करावी, असा जनतेचा कौल आहे. परंतु दोन्ही पक्षांच्या हेकेखोर वृत्तीमुळे युती संदर्भात एका ठराविक निष्कर्षावर चर्चा पोहचलेली नाही. पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार डॉ.अशोक उईके, आमदार मदन येरावार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे आदी नेत्यांमध्ये युतीच्या संदर्भात नुकतीच चर्चा झाली. या चर्चेत डॉ.अशोक उईके यांनी एक अपक्षासह आपले पाच नगरसेवक असल्याची बाजू मांडली. नगराध्यक्ष व केवळ एक विषय समिती सभापतीचे पद ठेऊन उपनगराध्यक्षांसह सर्व पदे शिवसेनेला देण्याचा फॉर्मुला ठेवण्यात आला. परंतु शिवसेनेने हा फॉर्मुला तत्काळ रिजेक्ट केला. नगराध्यक्ष होईल तर शिवसेनेचाच हा पवित्रा घेण्यात आला. कुठल्याही परिस्थितीत कळंब नगर पंचायतवर शिवसेनेचा भगवा फडकवायचाच, अशी सेनेच्या पदाधिकाऱ्यांची भावना होती. एवढेच नाही तर सलग पाच वर्ष सेनेचाच नगराध्यक्ष राहील, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे नगराध्यक्ष निवडीची २७ तारीख आली असतानाही युतीच्या संदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यामुळे कळंबवासी अजुनही शेवटच्या क्षणी कोणाची युती होईल या संभ्रमात आहे. शैलजा प्रकाश उमरतकर या एकमेव नगरसेवक अपक्ष म्हणून निवडून आल्या. काँग्रेस, शिवसेना व भाजपानेही त्यांच्यावर दावा ठोकला आहे. परंतु त्यांनी आपण सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षासोबत राहणार असल्याचे सांगितले. आपण कोण्या एका पक्षासोबत नसून कुठलेही दोन पक्ष एकत्र येऊन सत्ता मिळविणाऱ्यांसोबत आहो. त्यामुळे आपल्याला कोणीही गृहित धरु नये, असे रोखठोक मत त्यांनी लोकमतशी बोलताना मांडले. (तालुका प्रतिनिधी)