शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

गोखीचे पाणी मेपर्यंत अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:24 IST

शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर तत्काळ मिळणाऱ्या गोखी प्रकल्पाच्या पाण्याकडे यवतमाळकरांच्या नजरा लागल्या आहे. परंतु पाणीपुरवठ्यासाठी लागणारे अत्यावश्यक पाईपच अद्याप यवतमाळात पोहोचले नाही. तर इतर कामांसाठी १५ दिवसांचा अवधी लागणार आहे.

ठळक मुद्देपाईप पोहोचलेच नाही : कामासाठी लागणार १५ दिवसांचा अवधी

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर तत्काळ मिळणाऱ्या गोखी प्रकल्पाच्या पाण्याकडे यवतमाळकरांच्या नजरा लागल्या आहे. परंतु पाणीपुरवठ्यासाठी लागणारे अत्यावश्यक पाईपच अद्याप यवतमाळात पोहोचले नाही. तर इतर कामांसाठी १५ दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे गोखीच्या पाण्यासाठी यवतमाळकरांना मे महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणारे निळोणा आणि चापडोह प्रकल्प कोरडे पडले. बेंबळा प्रकल्पाचे पाणीही लवकरच मिळण्याची आशा नाही. त्यामुळे गोखी प्रकल्पाचा पर्याय पुढे आला. त्यासाठी युद्ध पातळीवर कामकाज हाती घेण्यात आले. यवतमाळ शहरापासून २७ किलोमीटर अंतरावरील गोखी प्रकल्पाचे पाणी यवतमाळच्या एमआयडीसीत येते. तेथून पाणी दर्डानगरच्या टाकीपर्यंत आणण्यासाठी पाईपलाईन टाकली जाणार आहे. औद्योगिक वसाहत ते दर्डानगर हे ४.२० किमी अंतर आहे. आता औद्योगिक वसाहत ते लोहारा येथील पाण्याच्या टाकीपर्यंत गोखी प्रकल्पाचे पाणी आणले जाईल. तेथून दर्डानगर पाण्याच्या टाकीपर्यंत २००७ मध्ये टाकण्यात आलेल्या २०० एमएम पीव्हीसी पाईपने पाणी आणले जाईल.औद्योगिक वसाहतीपासून लोहाराच्या टाकीपर्यंत पाईप टाकण्यासाठी खोदकाम सुरू झाले आहे. एमआयडीसीतील मुख्य चौकापर्यंत खोदकामही झाले आहे. परंतु अद्यापपर्यंत पाईपच आले नाही. त्यामुळे या पाईपची सर्वांना प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे सदर पाईप शनिवारी यवतमाळात पोहोचणार होते. परंतु सोमवारपर्यंत पाईप आले नव्हते. पाईप आल्यानंतर कामाला सुरुवात होईल. त्यासाठी १५ दिवसाचा अवधी लागणार आहे. त्यामुळे गोखीचे पाणी मिळण्यासाठी मे महिना उजाडणार आहे.अतिरिक्त पाणी सममध्ये जाणारगोखी प्रकल्पाचे पाणी दर्डानगर टाकीत पोहोचल्यानंतर दर्डानगर, वडगाव, लोहारा, सुयोगनगरातील सुमारे ८० हजार लोकसंख्येपर्यंत पाणी पोहोचणार आहे. ज्या दिवशी गोखी प्रकल्पातून अधिक पाणी खेचले जाईल. ते पाणी जीवन प्राधिकरणाच्या सममध्ये सोडले जाईल आणि तेथून ते शहरातील इतर भागांना वितरित केले जाणार आहे.दररोज मिळणार २० लाख लिटर पाणीगोखी प्रकल्पातून दररोज २ एमएल म्हणजे २० लाख लिटर पाण्याचा पुरवठा करण्याच्या प्रस्तावाला औद्योगिक वसाहतीने मान्यता दिली आहे. त्यामुळे शहरातील काही भागांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. गोखी प्रकल्पाचा मृतसाठा हा निळोणा प्रकल्पाच्या संपूर्ण साठ्याएवढा आहे. गोखी प्रकल्पात १.५ दलघमी जीवंत साठा आणि ७.५१ दलघमी मृतसाठा आहे. जीवंत साठा संपला तरी सहा महिने पुरेल एवढा मृतसाठा या प्रकल्पात आहे.