शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
6
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
7
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
8
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
9
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
10
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
11
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
12
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
13
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
14
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
15
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
16
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
17
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
18
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
19
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
20
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर

गोखीचे पाणी मेपर्यंत अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 00:24 IST

शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर तत्काळ मिळणाऱ्या गोखी प्रकल्पाच्या पाण्याकडे यवतमाळकरांच्या नजरा लागल्या आहे. परंतु पाणीपुरवठ्यासाठी लागणारे अत्यावश्यक पाईपच अद्याप यवतमाळात पोहोचले नाही. तर इतर कामांसाठी १५ दिवसांचा अवधी लागणार आहे.

ठळक मुद्देपाईप पोहोचलेच नाही : कामासाठी लागणार १५ दिवसांचा अवधी

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर तत्काळ मिळणाऱ्या गोखी प्रकल्पाच्या पाण्याकडे यवतमाळकरांच्या नजरा लागल्या आहे. परंतु पाणीपुरवठ्यासाठी लागणारे अत्यावश्यक पाईपच अद्याप यवतमाळात पोहोचले नाही. तर इतर कामांसाठी १५ दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे गोखीच्या पाण्यासाठी यवतमाळकरांना मे महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणारे निळोणा आणि चापडोह प्रकल्प कोरडे पडले. बेंबळा प्रकल्पाचे पाणीही लवकरच मिळण्याची आशा नाही. त्यामुळे गोखी प्रकल्पाचा पर्याय पुढे आला. त्यासाठी युद्ध पातळीवर कामकाज हाती घेण्यात आले. यवतमाळ शहरापासून २७ किलोमीटर अंतरावरील गोखी प्रकल्पाचे पाणी यवतमाळच्या एमआयडीसीत येते. तेथून पाणी दर्डानगरच्या टाकीपर्यंत आणण्यासाठी पाईपलाईन टाकली जाणार आहे. औद्योगिक वसाहत ते दर्डानगर हे ४.२० किमी अंतर आहे. आता औद्योगिक वसाहत ते लोहारा येथील पाण्याच्या टाकीपर्यंत गोखी प्रकल्पाचे पाणी आणले जाईल. तेथून दर्डानगर पाण्याच्या टाकीपर्यंत २००७ मध्ये टाकण्यात आलेल्या २०० एमएम पीव्हीसी पाईपने पाणी आणले जाईल.औद्योगिक वसाहतीपासून लोहाराच्या टाकीपर्यंत पाईप टाकण्यासाठी खोदकाम सुरू झाले आहे. एमआयडीसीतील मुख्य चौकापर्यंत खोदकामही झाले आहे. परंतु अद्यापपर्यंत पाईपच आले नाही. त्यामुळे या पाईपची सर्वांना प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे सदर पाईप शनिवारी यवतमाळात पोहोचणार होते. परंतु सोमवारपर्यंत पाईप आले नव्हते. पाईप आल्यानंतर कामाला सुरुवात होईल. त्यासाठी १५ दिवसाचा अवधी लागणार आहे. त्यामुळे गोखीचे पाणी मिळण्यासाठी मे महिना उजाडणार आहे.अतिरिक्त पाणी सममध्ये जाणारगोखी प्रकल्पाचे पाणी दर्डानगर टाकीत पोहोचल्यानंतर दर्डानगर, वडगाव, लोहारा, सुयोगनगरातील सुमारे ८० हजार लोकसंख्येपर्यंत पाणी पोहोचणार आहे. ज्या दिवशी गोखी प्रकल्पातून अधिक पाणी खेचले जाईल. ते पाणी जीवन प्राधिकरणाच्या सममध्ये सोडले जाईल आणि तेथून ते शहरातील इतर भागांना वितरित केले जाणार आहे.दररोज मिळणार २० लाख लिटर पाणीगोखी प्रकल्पातून दररोज २ एमएल म्हणजे २० लाख लिटर पाण्याचा पुरवठा करण्याच्या प्रस्तावाला औद्योगिक वसाहतीने मान्यता दिली आहे. त्यामुळे शहरातील काही भागांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. गोखी प्रकल्पाचा मृतसाठा हा निळोणा प्रकल्पाच्या संपूर्ण साठ्याएवढा आहे. गोखी प्रकल्पात १.५ दलघमी जीवंत साठा आणि ७.५१ दलघमी मृतसाठा आहे. जीवंत साठा संपला तरी सहा महिने पुरेल एवढा मृतसाठा या प्रकल्पात आहे.