शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

रेशनच्या धान्यावर धनिकांचा डल्ला

By admin | Updated: November 2, 2015 01:54 IST

जिल्ह्यात दूर अंतरावर असलेल्या रेशन दुकानांची तपासणी अपवादानेही होत नसल्याने परवानाधारकांचे चांगलेच फावत आहे.

यवतमाळ : जिल्ह्यात दूर अंतरावर असलेल्या रेशन दुकानांची तपासणी अपवादानेही होत नसल्याने परवानाधारकांचे चांगलेच फावत आहे. धान्य काळ्याबाजारात जाण्यासोबतच निकृष्टही पुरविण्याचे प्रकार वाढत आहे. गरिबांच्या धान्यावर श्रीमंतवर्गच डल्ला मारत आहे. मुख्य रस्त्यावर असलेल्या गावांमधील रेशन दुकानांची तपासणीतेवढी संबंधितांकडून केली जाते. आडवळणाऱ्या गावांमध्ये कुठल्याही विभागाचा अधिकारी जात नाही. या प्रकारातच धान्याच्या काळ्याबाजाराचे मूळ आहे. कार्डधारक रेशन दुकानदाराकडे जातात त्यावेळी त्यांना धान्य आले नाही, कमी आले आदी प्रकारची कारणे सांगून परत पाठविले जातात. मात्र धान्य नेमके केव्हा येणार, या विषयी ठोस असे सांगितले जात नाही. हातावर आणून पानावर खाणाऱ्या कुटुंबाला रेशनचे धान्य मिळविण्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागतात. त्यांच्याशी रेशन दुकानदारांची वागणूकही चांगली नसते. तुसडेपणाचा प्रकार त्यांच्याशी केला जातो. धान्य देताना कमी दिल्याचेही प्रकार घडतात. रेशन परवानाधारकाकडे असलेल्या वजनमापाची तपासणीही कुणाकडून केली जात नाही. त्यामुळे अनेक नागरिकांना धान्य कमी मिळते. एखाद्या जागरूक नागरिकाने संबंधितांकडे तक्रार केल्यास कारवाई केली जात नाही. उलट तक्रारकर्त्यालाच धाकदपट करण्याचे प्रकार पुढे येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)