शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

गरिबांनो, किलोभर साखरेत करा दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:22 IST

गेल्या चार वर्षांपासून जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपा सरकारने गोरगरीब जनतेवर अवघ्या एक किलो साखरेत दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली आहे. शासकीय स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिबांना दिवाळीच्या निमित्ताने प्रती कार्ड केवळ एक किलो साखर दिली जाणार आहे.

ठळक मुद्देशासनाचा फतवा : जिल्ह्यातील सव्वा पाच लाख लाभार्थ्यांपुढे पेच, हेच का ‘अच्छे दिन’?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या चार वर्षांपासून जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपा सरकारने गोरगरीब जनतेवर अवघ्या एक किलो साखरेत दिवाळी साजरी करण्याची वेळ आणली आहे. शासकीय स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिबांना दिवाळीच्या निमित्ताने प्रती कार्ड केवळ एक किलो साखर दिली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील सरकार, जिल्हा प्रशासन व पुरवठा विभागाविरूद्ध जनतेत रोष पाहायला मिळतो आहे.राज्यात सव्वा पाच लाख रेशनकार्डधारक आहेत. त्यांची दिवाळी गोड करण्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने केली. आता खूप काही आपल्या पदरी पडेल अशी अपेक्षा या गोरगरीब कार्डधारकांना होती. मात्र प्रत्यक्षात भाजपा सरकारचा दिवाळीचा हा बार फुसका निघाला. दिवाळी गोड करण्यासाठी शासनाकडून रेशन कार्डवर केवळ एक किलो साखर दिली जाणार आहे. त्याचा दर २० रुपये प्रती किलो राहणार आहे. चार ते सहा जणांच्या कुटुंबाला किलोभर साखर दिवाळीसाठी पुरणार कशी, हा प्रश्न आहे. सरकारस्तरावर दौरे, बैठका, उद्घाटन, भूमिपूजन या माध्यमातून लोकप्रतिनिधी व अधिकाºयांकडून प्रचंड उधळपट्टी शासकीय तिजोरीतून सुरू आहे. तर दुसरीकडे गोरगरिबांना दिवाळीसारख्या सर्वात मोठ्या सणासाठी अवघी किलोभर साखर देऊन त्यांची बोळवण केली जात असल्याने गरिबांमध्ये केंद्र व राज्यातील भाजपा सरकारविरोधात तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे.४० टक्के पुरवठा कमीरेशन कार्डावरील वाटपासाठी ५३० मेट्रिक टन साखर मंजूर करण्यात आली. त्याचप्रमाणे तूर डाळ ५३० मेट्रिक टन, चणाडाळ १९७ मेट्रिक टन, उडीद डाळ ९७ मेट्रिक टन मंजूर करण्यात आली. यापैकी ६० टक्के मालाचा पुरवठा जिल्ह्याला झाला असून ४० टक्क्यांची मागणी आणखी नोंदविली गेली आहे.