शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
2
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
3
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
4
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
5
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
6
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
7
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
8
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
9
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
10
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
11
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
12
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
13
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
14
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
15
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
16
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
17
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
18
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
19
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
20
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

जिल्ह्यातील नद्यांमध्ये प्रदूषण वाढतेय

By admin | Updated: June 4, 2014 00:22 IST

जिल्हय़ातून वाहणार्‍या नद्या प्रदूषित झाल्या असून बेशरम आणि जलपर्णीच्या विळख्यात अडकल्या आहे. मूळ पात्र अरुंद झाले असून दरवर्षी नदी तिरावरील शेकडो गावांना त्यामुळे पुराचा फटका बसतो.

शुद्धीकरण मोहीम गरजेची : पावसाळ्यात नदी किनार्‍यावरील लोकांना फटकायवतमाळ : जिल्हय़ातून वाहणार्‍या नद्या प्रदूषित झाल्या असून बेशरम आणि जलपर्णीच्या विळख्यात अडकल्या आहे. मूळ पात्र अरुंद झाले असून दरवर्षी नदी तिरावरील शेकडो गावांना त्यामुळे पुराचा फटका बसतो. त्यात कोट्यवधीचे नुकसान होत असले तरी प्रशासन मात्र नदी शुद्धीकरण मोहीम राबवित नाही. परिणामी नदी तिरावरील गावकर्‍यांना पावसाळा आला की जीव मुठीत घेऊन राहावे लागते.  यवतमाळ जिल्हय़ामध्ये वर्धा व पैनगंगा या प्रमुख नद्या आहेत. दोनही नद्या जिल्हय़ाच्या अनुक्रमे इशान्य व दक्षिण सीमेवरील वाहतात. जिल्हय़ाच्या मध्यभागात वाहणार्‍या उपनद्या वर्धा व पैनगंगा नद्यांना मिळतात. वर्धा नदी रुंदी अधिक असून खोलदेखील आहे. वर्धेच्या बेंबळा व निगरुडा या दोन प्रमुख उपनद्या आहेत. त्यापैकी निगरुडा नदी पूर्णत: वणी तालुक्यातून वाहते. तर बेंबळा बाभूळगाव तहसीलच्या उत्तरेकडून घाटाच्या पायथ्याशी वाहते. पैनगंगा नदीला सहा प्रमुख उपनद्या आहेत. पूस, अरुणावती, अडाण, वाघाडी, खुनी, विदर्भ या नावाने त्या ओळखल्या जाते. या सोबतच अनेक लहान-मोठय़ा नद्या व नाले आहेत. जिल्हय़ाला सुपीक बनविण्यात या नद्यांचा मोठा हातभार लागला आहे. काही नद्या बाराही महिने खळखळून वाहतात तर काही हिवाळ्यातच कोरड्या पडतात. जिल्हय़ासाठी जीवनदायिनी असलेल्या या नद्या मात्र सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. नदी पात्रात मोठय़ा प्रमाणात बेशरम वाढला आहे. मोठाले झुडुपे नदीपात्रात दिसून येतात. अडाण, पूस, धावंडा, गोखी, अरुणावती या नद्यांना बेशरमने आपल्या कवेत घेतले आहे. नदीचे पात्र पूर्ण हिरवेगार दिसते. तसेच काही नद्यात जलपर्णी वनस्पती वाढली आहे. बेशरम आणि जलपर्णी वनस्पतीमुळे पाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण होते. झुडुपांमध्ये मोठय़ा प्रमाणात केरकचरा अडकून असतो. पहिल्या पुरासोबत आलेला कचरा या झुडुपांना अडकतो. त्यामुळे नदीचा प्रवाह बदलतो. थोडे जरी पाणी आले तरी नदीची थडी फुटून पाणी गावात शिरते. तसेच शेतातही शिरून मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. दरवर्षी त्याच त्या गावांना पुराचा फटका बसतो. पुरामुळे कोट्यवधीचे नुकसान होत असले तरी प्रशासन मात्र नदी शुद्धीकरणाकडे दुर्लक्ष करते. आजपर्यंत प्रशासनाने नदी शुद्धीकरणाकडे लक्षच दिले नाही. यापूर्वी महात्मा फुले जल व भूमी अभियान राबविण्यात आले होते. तलावात साचलेला गाळ काढण्याचा प्रयत्न झाला. यासोबतच नदी पात्रातील बेशरम काढण्याची गरज होती. प्रशासनाने नदी पात्र शुद्धीकरण मोहीम हाती घेतली असती तर काही अंशी पुराचा प्रकोप कमी करण्यात यश आले असते. परंतु प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न नद्यांसाठी होतांना दिसत नाही. (प्रतिनिधी)