शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

जिल्ह्यातील नद्यांमध्ये प्रदूषण वाढतेय

By admin | Updated: June 4, 2014 00:22 IST

जिल्हय़ातून वाहणार्‍या नद्या प्रदूषित झाल्या असून बेशरम आणि जलपर्णीच्या विळख्यात अडकल्या आहे. मूळ पात्र अरुंद झाले असून दरवर्षी नदी तिरावरील शेकडो गावांना त्यामुळे पुराचा फटका बसतो.

शुद्धीकरण मोहीम गरजेची : पावसाळ्यात नदी किनार्‍यावरील लोकांना फटकायवतमाळ : जिल्हय़ातून वाहणार्‍या नद्या प्रदूषित झाल्या असून बेशरम आणि जलपर्णीच्या विळख्यात अडकल्या आहे. मूळ पात्र अरुंद झाले असून दरवर्षी नदी तिरावरील शेकडो गावांना त्यामुळे पुराचा फटका बसतो. त्यात कोट्यवधीचे नुकसान होत असले तरी प्रशासन मात्र नदी शुद्धीकरण मोहीम राबवित नाही. परिणामी नदी तिरावरील गावकर्‍यांना पावसाळा आला की जीव मुठीत घेऊन राहावे लागते.  यवतमाळ जिल्हय़ामध्ये वर्धा व पैनगंगा या प्रमुख नद्या आहेत. दोनही नद्या जिल्हय़ाच्या अनुक्रमे इशान्य व दक्षिण सीमेवरील वाहतात. जिल्हय़ाच्या मध्यभागात वाहणार्‍या उपनद्या वर्धा व पैनगंगा नद्यांना मिळतात. वर्धा नदी रुंदी अधिक असून खोलदेखील आहे. वर्धेच्या बेंबळा व निगरुडा या दोन प्रमुख उपनद्या आहेत. त्यापैकी निगरुडा नदी पूर्णत: वणी तालुक्यातून वाहते. तर बेंबळा बाभूळगाव तहसीलच्या उत्तरेकडून घाटाच्या पायथ्याशी वाहते. पैनगंगा नदीला सहा प्रमुख उपनद्या आहेत. पूस, अरुणावती, अडाण, वाघाडी, खुनी, विदर्भ या नावाने त्या ओळखल्या जाते. या सोबतच अनेक लहान-मोठय़ा नद्या व नाले आहेत. जिल्हय़ाला सुपीक बनविण्यात या नद्यांचा मोठा हातभार लागला आहे. काही नद्या बाराही महिने खळखळून वाहतात तर काही हिवाळ्यातच कोरड्या पडतात. जिल्हय़ासाठी जीवनदायिनी असलेल्या या नद्या मात्र सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या आहेत. नदी पात्रात मोठय़ा प्रमाणात बेशरम वाढला आहे. मोठाले झुडुपे नदीपात्रात दिसून येतात. अडाण, पूस, धावंडा, गोखी, अरुणावती या नद्यांना बेशरमने आपल्या कवेत घेतले आहे. नदीचे पात्र पूर्ण हिरवेगार दिसते. तसेच काही नद्यात जलपर्णी वनस्पती वाढली आहे. बेशरम आणि जलपर्णी वनस्पतीमुळे पाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण होते. झुडुपांमध्ये मोठय़ा प्रमाणात केरकचरा अडकून असतो. पहिल्या पुरासोबत आलेला कचरा या झुडुपांना अडकतो. त्यामुळे नदीचा प्रवाह बदलतो. थोडे जरी पाणी आले तरी नदीची थडी फुटून पाणी गावात शिरते. तसेच शेतातही शिरून मोठय़ा प्रमाणात नुकसान होते. दरवर्षी त्याच त्या गावांना पुराचा फटका बसतो. पुरामुळे कोट्यवधीचे नुकसान होत असले तरी प्रशासन मात्र नदी शुद्धीकरणाकडे दुर्लक्ष करते. आजपर्यंत प्रशासनाने नदी शुद्धीकरणाकडे लक्षच दिले नाही. यापूर्वी महात्मा फुले जल व भूमी अभियान राबविण्यात आले होते. तलावात साचलेला गाळ काढण्याचा प्रयत्न झाला. यासोबतच नदी पात्रातील बेशरम काढण्याची गरज होती. प्रशासनाने नदी पात्र शुद्धीकरण मोहीम हाती घेतली असती तर काही अंशी पुराचा प्रकोप कमी करण्यात यश आले असते. परंतु प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न नद्यांसाठी होतांना दिसत नाही. (प्रतिनिधी)