शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिटिकल स्कूल बाबासाहेबांचे स्वप्न होते

By admin | Updated: April 19, 2017 01:16 IST

पुणे करारानुसार दलित नेतृत्त्वासाठी अपात्र माणसेच निवडली जातील. हीच माणसे मंत्रिपदे भूषवितील. पक्षाच्या

 क्षिप्रा उके : पंजाबमध्ये उभे राहणार ‘पॉलिटिकल स्कूल’, सामाजिक निधी देण्याचे आवाहन यवतमाळ : पुणे करारानुसार दलित नेतृत्त्वासाठी अपात्र माणसेच निवडली जातील. हीच माणसे मंत्रिपदे भूषवितील. पक्षाच्या आदेशाप्रमाणेच पोपटासारखी बोलतील. प्रसंगी समाजाला विकूनही टाकतील, ही शंका बाबासाहेबांना होती. म्हणूनच दलित नेतृत्त्व हे शीलवान असावे, त्याची भाषा, देहबोली, वेशभूषा, वक्तृत्व, सामाजिक भान इत्यादींचे त्याला प्रशिक्षण असावे. यासाठीच जुलै १९५६ मध्ये डॉ. आंबेडकरांनी ‘पोलिटिकल स्कूल’ची स्थापना केली होती. मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजच्या परिसरात हे स्कूल चालविले जात आहे. त्यात १५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. ही प्रशिक्षण देणारी शाळा आम्ही विसरलो आणि पक्ष स्थापन करीत बसलो. एक माणूस एक पार्टी एवढी अवकळा आज पक्षाची झाली आहे. सर्वच नेत्यांनी दलित समाजाला भ्रमित केले आहे, असे मत जेएनयूच्या प्राध्यापिका आणि पोलिटिकल स्कूलसाठी भारतभर जनजागृती करणाऱ्या प्रा.डॉ. क्षिप्रा उके यांनी समता पर्वात मांडले. ‘लोकशाही मजबूत करण्याहेतू डॉ. आंबेडकरांचे पोलिटिकल स्कूल : ६० वर्षानंतर एक समीक्षा’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी किशोर भगत होते. प्रमुख पाहुणे म्हणून यवतमाळच्या नगराध्यक्ष कांचन चौधरी, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, बसपाचे तारिक लोखंडवाला, सुनील पुनवटकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र हेंडवे, डॉ. लीलाताई भेले, प्रमोदिनी रामटेके आदी मंडळी विचार मंचावर उपस्थित होती. डॉ. क्षिप्रा उके पुढे म्हणाल्या, दलित समाज भावनांच्या लाटेत वाहवत जातो. रिपब्लिकन पार्टीचे तुकडे-तुकडे होत असताना कोणी रस्त्यावर आले नाही. एखाद्या ठिकाणच्या बाबासाहेबांच्या मूर्तीचे बोट तुटले की सर्वजण रस्त्यावर येतात. मूर्त्या आणि पुतळे बसविण्यावरच भर दिला जातो, हे राजकारण दलितांना समजत नाही. आंबेडकरांच्या विचारांना खतपाणी देण्याची गरज असताना आम्ही फक्त घोषणा देतो. बाकी कर्तृत्व काहीच करीत नाही. ज्या दिवशी हा समाज इमोशनल ऐवजी रॅशनल होईल, त्याच दिवशी विकासाचा प्रारंभ होईल. विदर्भाच्या बाबतीत बोलताना त्या म्हणाल्या, आज सोशल सायन्सचा अभ्यास केला जात नाही. त्यामुळे सामाजिक प्रश्नच कळत नाही. महाराष्ट्रात ५२ आणि एकट्या विदर्भात ३५ समाजकार्य महाविद्यालय आहेत. सोशल वर्कस् ही गांधीजींची फिलॉसॉफी आहे. या तत्त्वज्ञानात संघर्षाऐवजी सामंजस्याला महत्त्व दिले जाते. याउलट सोशल जस्टीस हे बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान आहे. यात संघर्षाला महत्त्व दिले जाते. आज न्यायासाठी सामाजिक न्यायाची गरज आहे. दलित समाजाला दूरदृष्टीचे नेतृत्त्व मिळावे यासाठी डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ‘पोलिटिकल स्कूल’ची नव्याने स्थापना जुलै २०१७ मध्ये पंजाबातील जालंदर येथे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी सामाजिक निधी देण्याचेही आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमात कांचन चौधरी, शिवाजीराव मोघे, किशोर भगत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन मन्सूर एजाज जोश यांनी, तर आभार प्रमोदिनी रामटेके यांनी मानले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)