शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

जिल्हा दारूबंदीवर राजकीय सामसूम

By admin | Updated: July 22, 2015 00:24 IST

यवतमाळ जिल्ह्यातील दारूबंदीची मागणी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गाजेल, अशी अपेक्षा जनतेला होती. मात्र प्रत्यक्षात तेथे राजकीय सामसूम पहायला मिळत आहे.

लोकमत विशेष

राजेश निस्ताने यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील दारूबंदीची मागणी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गाजेल, अशी अपेक्षा जनतेला होती. मात्र प्रत्यक्षात तेथे राजकीय सामसूम पहायला मिळत आहे. या मुद्यावर शिवसेना आक्रमक असली तरी भाजपा मात्र गप्प आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीनेही दारूबंदीवर ब्रसुद्धा काढलेला नाही. अधिवेशनात काही तरी होईल, या आशेवर असलेल्या दारूबंदी चळवळीतील कार्यकर्त्यांची आंदोलनेही घोषणेच्या प्रतीक्षेत थंडावली आहे. वर्धा, गडचिरोली, चंद्रपूरच्या धर्तीवर यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी लागू केली जावी, अशी बरीच जुनी मागणी आहे. अलिकडे या मागणीने राज्याचे लक्ष वेधले. गावागावात महिलांच्या नेतृत्वात दारू विक्री विरोधात आंदोलने केली गेली. सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महिलांनी प्रत्येक तालुका स्तरावर दारू विरोधी आंदोलन राबविले. या आंदोलनात राजकीय पक्षांनाही सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला गेला. त्यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांना, लोकप्रतिनिधींना निवेदने दिली गेली. दारूबंदी घोषित व्हावी यासाठी शिवसेनेचे नेते आग्रही आहेत. मात्र त्या तुलनेत भाजपाची नेते मंडळी आक्रामक दिसत नाही. भाजपाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी दारूबंदीच्या मुद्यावर अद्याप ब्रसुद्धा काढला नाही. यवतमाळ जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार भाजपाचे आहेत. भाजपाचे मुख्यमंत्री, भाजपाचे अर्थमंत्री, गृहमंत्री, जिल्ह्यातील केंद्रीय राज्यमंत्री असे सर्वच काही भाजपाचे असूनही येथील आमदार दारूबंदीच्या मुद्यावर गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांची ही चुप्पी महिलांच्या दारू विरोधी आंदोलनाचे बळ कमी करणारी आणि मद्य सम्राटांना दिलासा देणारी ठरत आहे. महिलांकडून दारू विरोधात आलेल्या निवेदनांना तात्पुरता प्रतिसाद तेवढा दिला जात आहे. मात्र त्यासाठी भाजपाच्या आमदारांनी आपल्याच पक्षाच्या सरकारकडे आक्रमक भूमिका मांडल्याचे ऐकिवात नाही. विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीकडून दारूबंदीला पाठबळ मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र सध्या तरी ही अपेक्षा फोल ठरल्याचे दिसून येते. यवतमाळ जिल्हा दारूमुक्त करा या मागणीवर विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे एखाद्यातरी आमदाराकडून लक्ष वेधले जाईल, अशी रास्त अपेक्षा या चळवळीतील महिला कार्यकर्त्यांना होती. अधिवेशन अर्ध्यावर येऊनही या अपेक्षांची पूर्ती होऊ शकलेली नाही. ते पाहता जिल्ह्यातील सत्ताधारी व विरोधी आमदार दारूबंदी चळवळीसोबत की विरोधात असा प्रश्न निर्माण केला जात आहे. तालुक्याच्या यावली (इजारा) येथील पोलीस पाटील वीरेंद्र राठोड यांचा दारू विक्रेत्यांनी निर्घृण खून केला. या खुनानंतर सरकार २ आॅक्टोबर गांधी जयंतीचा मुहूर्त साधून यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी जाहीर करेल, असे सांगितले जात होते. त्या दृष्टीने प्रशासन तयारीलाही लागले होते. जनतेतून निर्माण केल्या गेलेल्या दबावातूनच सरकारवर घोषणेचा दबाव निर्माण झाला होता. आंदोलनांची धग पाहून सरकारने घोषणेचे मोर्चेबांधणी चालविली होती. मात्र घोषणा होणारच म्हणून दारू विरोधी आंदोलने काहीशी थंडावल्याने सरकार स्तरावरचा दारूबंदीचा प्रस्तावही काहीसा बाजूला पडल्याचे सांगितले जाते. हा प्रस्ताव बाजूला पडावा म्हणून मद्य सम्राटांनी आपले वजन खर्ची घालण्यासाठी धडपड चालविली आहे. महिलांची दारू विरोधी आंदोलने थांबल्याने सरकारची दारूबंदीची घोषणाही थांबण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ते पाहता पोलीस पाटलाचे बलिदान व्यर्थ तर जाणार नाही ना अशी हूरहूर या चळवळीतील कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.