शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

ग्रामपंचायत प्रभाग रचनेत राजकीय दबाव

By admin | Updated: February 15, 2015 01:59 IST

जिल्ह्यातील ५२० ग्रामपंचायतींची निवडणूक जुलै-डिसेंबर महिन्यात होत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभाग रचनेसाठी अधिसूचना जारी केली आहे.

यवतमाळ : जिल्ह्यातील ५२० ग्रामपंचायतींची निवडणूक जुलै-डिसेंबर महिन्यात होत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रभाग रचनेसाठी अधिसूचना जारी केली आहे. प्रभागाची रचना करून आरक्षण सोडत आणि आक्षेपावर सुनावणी झाल्यानंतर १३ फेब्रुवारीला ही प्रभाग रचना प्रकाशित करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र अनेक गावांमध्ये राजकीय दबावातून अंशत: बदलाच्या सबबीखाली शेवटच्या दिवशी १३ फेब्रुवारीला सर्वेक्षणाचे काम करण्यात आले. अद्यापही कित्येक गावातील प्रभाग रचना प्रकाशित करण्यात आलेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई ग्रामपंचायत १९६६ च्या नियम ५(२) नुसार २९ जानेवारी रोजी अधिसूचना जारी केली. त्यावरून त्या-त्या गावातील सरपंच, पदाधिकारी यांना माहिती देण्यात आली. यामध्ये ५२० ग्रामपंचायतीतील प्रभागांचे विभाजन करणे, सदस्य संख्या निश्चित करणे, जागेचे आरक्षण ही प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतर ५ फेब्रुवारीपर्यंत प्रभाग रचना व आरक्षणाच्या सोडतीवर आक्षेप मागविण्यात आले. या आक्षेपाची सुनावणी १३ फेब्रुवारीपर्यंत झाली. त्याच तारखेत जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम प्रभाग रचना व आरक्षणाची सोडत निश्चित करून प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालयात दर्शनी भागात लावणे अपेक्षित होते. मात्र राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांना बगल देण्यात आली. अनेक ठिकाणी राजकीय दबावापोटी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही शेवटच्या दिवशी फेरबदल करण्याचा खटाटोप करण्यात आला. याबाबत तक्रारीही झाल्या आहेत. प्रभाग रचनाही चुकीच्या पद्धतीने करण्यात आली. प्राथमिक स्तरावरचे योग्य आक्षेप फेटाळल्या गेले आणि राजकीय दबावातून आलेले आक्षेप ग्राह्य धरून ऐन वेळेवर फेरबदलाची धडपड करण्यात आली. या विसंगतीमुळेच अनेक ग्रामपंचायतींमध्ये पदाधिकाऱ्यांत व इच्छुकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. दारव्हा, नेर, दिग्रस या तीन तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले. विशिष्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेवूनच प्रभागरचना करण्यात आल्याचे आरोपही होत आहे. महसूल यंत्रणेला राजकीय दबावातून अनधिकृत काम करण्यास भाग पाडले जात आहे. काही मंडळ अधिकारी व नायब तहसीलदारांनीही कुठलेही लेखी आदेश नसताना केवळ वरिष्ठांचा दबावापोटी हा फेरबदल करावा लागत असल्याची कबुली नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. या अनागोंदीच्या प्रकाराची राज्य निवडणूक आयोगाकडेही तक्रार करण्यात आली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)