शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

राजकीय कार्यकर्ते सामसूम

By admin | Updated: January 20, 2015 22:44 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आटोपताच तालुक्यात राजकीय आघाडीवर सामसूम दिसू लागली आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी पिचला जात असताना राजकीय

वणी : लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आटोपताच तालुक्यात राजकीय आघाडीवर सामसूम दिसू लागली आहे. दुष्काळी परिस्थितीत शेतकरी पिचला जात असताना राजकीय पक्ष त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्यास तयार नाहीत. या पक्षांनी कापूस, सोयाबिनच्या दराबाबतही सोयीस्कर चुप्पी साधल्याचे दिसून येत आहे.प्रथम लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणूक झाली. या दोनही निवडणुकीच्या वेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते भलतेच जोमात होते. विविध राजकीय पक्ष शेतकऱ्यांसह सामान्य मतदारांना विकासाचे आमीष दाखवित होते. शेतमालाच्या भावासंदर्भात जागृत असल्याचे भासवीत होते. त्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकलाही हुरूप चढला होता. त्याच हुरूपाने देशात आणि राज्यात सत्तांतर घडवून आणले. या सत्तांतरानंतर आता ‘अच्छे दिन’ येतील, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र झाले उलटेच. सत्तांतर घडूनही त्यांच्या पदरी निराशाच आली.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी जोषात असणारे राजकीय पक्ष आता मूग गिळून गप्प आहे. वणी तालुक्यात राजकीय आघाडीवर तूर्तास सर्वत्र सामसूम दिसत आहे. यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहे. कपाशी आणि सोयाबिनच्या उतारीत घट आली आहे. त्यातच कापसाचे हमी भाव तोकडे आहेत. चार हजार ५0 रूपये प्रती क्विंटलप्रमाणे पणन महासंघ कापूस खरेदी करीत आहे. प्रत्यक्षात अनेकदा जिनींगमध्ये कापूस साठविण्यासाठी जागाच शिल्लक राहात नसल्याने महासंघाला वारंवार खरेदी बंद करावी लागत आहे. परिणामी व्यापारी शेतकऱ्यांचा कापूस कवडीमोल दराने खरेदी करीत आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांसाठी ‘रान’ उठविणारे सर्वच राजकीय पक्ष आता भूमिगत झाल्यासारखे दिसत आहे. कापूस, सोयाबिनला प्रती क्विंटल जादा दर देण्यासंदर्भात कोणताही राजकीय पक्ष सध्या आंदोलनाची भूमिका घेण्यास तयार नाही. काही पक्ष केवळ निवेदन देऊन शेतकऱ्यांची सहानुभूती लाटण्याचा प्रयत्न करीत आहे. काही महिन्यांपूर्वी काही राजकीय पक्षांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन पाठवून कापूस आणि सोयाबिनला जादा दर देण्याची मागणी केली होती. मात्र केवळ निवेदनावरच त्यांनी शेतकऱ्यांची बोळवण केली. प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी कुणीच आंदोलनात्मक भूमिका घ्यायला तयार दिसत नाहीत.वणीच्या बाजारपेठेत सध्या कापसाची विक्रमी आवक होत आहे. लगतच्या तालुक्यांतील कापूस येथे विक्रीस येत आहे. परिणामी पणन महासंघाला वारंवार खरेदी बंदची घोषणा करावी लागत आहे. तरीही राजकीय पक्ष आंदोलन करण्याच्या तयारीत नाही. आता नुकतेच काही पक्ष व शेतकऱ्यांनी स्वतंत्रपणे पणन महासंघाला निवेदन सादर करून कापूस खरेदी नियमित ठेवण्याची मागणी केली. निवेदनातून आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. मात्र प्रत्यक्षात कुणीच आंदोलन करताना दिसत नाही. दुष्काळामुळे शेतकरी देशोधडीला लागत असताना राजकीय पक्षांनी चुप्पी साधली आहे. त्यामुळे बळीराजा चोहोबाजूंनी संकटात अडकला आहे. त्यातच शासकीय मदतही अत्यंत तोकडी ठरत आहे. परिणामी शेतकरी आत्महत्या कशा थांबतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत बोलायला कुणीच तयार नाही. (कार्यालय प्रतिनिधी)