शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

पोलिसांच्या वॉरंट प्रवास विम्याला संरक्षण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 12:13 IST

शासकीय कामानिमित्त पोलिसांचा वॉरंट प्रवास विमा संरक्षणाबाहेर फेकला गेला आहे. वॉरंटवरील प्रति प्रवाशामागे एक रुपया अपघात विमा निधी मिळत नसल्याने ‘एसटी’ने या दाव्यापासूनच पोलिसांना दूर ठेवले आहे.

ठळक मुद्देदावा करू शकणार नाही‘एसटी’ला साहाय्यता निधी नाही

विलास गावंडे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासकीय कामानिमित्त पोलिसांचा वॉरंट प्रवास विमा संरक्षणाबाहेर फेकला गेला आहे. वॉरंटवरील प्रति प्रवाशामागे एक रुपया अपघात विमा निधी मिळत नसल्याने ‘एसटी’ने या दाव्यापासूनच पोलिसांना दूर ठेवले आहे. शिवाय पोलीस विभागाकडूनही यासाठी ठोस असे प्रयत्न झाले नाही. या व्यवहाराविषयी पोलिसांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.पोलिसांना शासकीय कामानिमित्तचा प्रवास ‘एसटी’नेच करावा लागतो. आरोपींना न्यायालयात घेऊन जाणे, मेडिकल, प्रशिक्षण, आरोपींचा शोध या कामांसाठी हा प्रवास घडतो. यासाठी पोलिसांच्या हाती रोख रक्कम दिली जात नाही. वॉरंट अर्थात कॅशलेस व्यवहार. पूर्वापार चालत आलेली ही पद्धत आहे. एखाद्या पोलिसाचे नाव आणि सोबत असलेल्या इतर व्यक्तींची संख्या वॉरंटवर लिहायची (अशोक + पाच) अर्थात सहा प्रवासी. वॉरंट दाखविला की, तिकीट फाटले आणि ते प्रवासी झाले.मात्र ‘एसटी’ महामंडळाने सुरू केलेल्या ‘हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहायता निधी’ योजनेत वॉरंटच्या प्रवाशाला दूर ठेवले गेले आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक तिकीटामागे प्रवास भाड्याव्यतिरिक्त एक रुपया अधिक घेतला जातो.प्रवास भाड्याचे शंभर रुपये आणि एक रुपया अपघात सहायता निधी असे एकूण १०१ रुपयांचे तिकीट प्रवाशाला दिले जाते. बसला अपघात होऊन प्रवाशाचा मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये त्याच्या कुटुंबाला महामंडळाकडून दिले जाते. मात्र यापासून वॉरंटवर प्रवास करणारे दूर ठेवण्यात आले आहे.वॉरंटवर अपघात सहायता निधीची रक्कम नोंद केली जात नाही. पाच व्यक्तींची नोंद असल्यास प्रती प्रवासी १०० रुपये या प्रमाणे ५०० रुपयांचेच वॉरंट पास केले जाते. त्यावर पाच प्रवाशांमागे सहायता निधी घेतला जात नाही. निधीच घेतला जात नाही तर अपघात विम्याचे संरक्षण द्यायचे कसे, हा एसटीचा प्रश्न आहे. सरकारी कामासाठी प्रवास करीत असताना विमा संरक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रकार पोलिसांना चांगलाच खटकला आहे. लोकवाहिनीकडून सर्व प्रवाशांना समान न्याय द्यावा, अशी अपेक्षा पोलिसांना आहे.

‘शिवशाही’तही जागा नाहीवॉरंटवर प्रवास करणाऱ्यांना ‘शिवशाही’तही जागा दिली जात नाही. वास्तविक जेवढे तिकीट असेल तेवढे तिकीट वॉरंटवर घेता येते. परंतु शिवशाहीने वॉरंट स्वीकारणार नाही, असा जणू पणच केला आहे. शिवशाही सुरू केल्याने महामंडळाने लांबपल्ल्याच्या इतर बसेस बंद केल्या आहे. फेऱ्या कमी झाल्याने वॉरंटने प्रवासासाठी प्रतीक्षा करावी लागते. शिवशाही नेमक्या प्रवाशांना घेऊन जाते. पोलीस अधिकारी, कर्मचारी हतबल होऊन बसकडे पाहत उभे राहतात. ही गैरसोय पोलीस विभागाकडूनही दुर्लक्षित आहे.

टॅग्स :Policeपोलिस