शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बंदोबस्तात गांजेगाव बंधाऱ्याचे गेट काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 21:38 IST

इसापूर धरणातून पैनगंगा नदी पात्रात सोडलेले पाणी गांजेगाव येथील बंधाऱ्याचे गेट अडवून रोखण्यात आले. बुधवारी पोलीस बंदोबस्तात हे गेट काढण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याने हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद झाले. ही घटना दुपारी २.३० वाजता घडली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये हाणामारी : उमरखेड तालुक्यात इसापूर धरणाचे पाणी पेटले, हिमायत नगरात गुन्हे दाखल

अविनाश खंदारे ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : इसापूर धरणातून पैनगंगा नदी पात्रात सोडलेले पाणी गांजेगाव येथील बंधाऱ्याचे गेट अडवून रोखण्यात आले. बुधवारी पोलीस बंदोबस्तात हे गेट काढण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याने हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद झाले. ही घटना दुपारी २.३० वाजता घडली.नदी पात्रात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी विदर्भ व मराठवाड्यातील ९० गावांतील शेतकऱ्यांनी तब्बल १५ दिवस आंदोलन केले होते. त्यानंतर नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. मात्र हे पाणी गांजेगाव येथील बंधाऱ्याचे गेट बंद करून अडविण्यात आले. परिणामी पाणी टेलपर्यंत पोहोचलेच नाही. त्यामुळे गांजेगाव बंधाºयाचे गेट काढून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवा, अशी मागणी बंधाऱ्याखालील गावकऱ्यांनी केली होती. बुधवारी पाटबंधारे विभागाने पोलीस बंदोबस्तात हे गेट काढले. यामुळे मराठवाडा हद्दीतील गेटवरील आणि गेटखालील गावकºयांत हाणामारी झाली. पैनगंगा नदी कोरडी पडल्याने पाणी प्रश्न गंभीर बनला. आंदोलनानंतर नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी नदी पात्रात पाणी सोडण्याचे आदेश दिले. मात्र १२ दलघमी पाणी सोडून १५ दिवस लोटल्यानंतरही पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले नाही. गांजेगाव बंधाऱ्यांच्यावरील गावच्या शेतकऱ्यांनी गेट बंद करून पाणी अडविले. त्यांनी गेट काढण्यास नकार दिला. एकत्रित आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्येच पाणी मिळविण्यासाठी वाद झाला.अखेर बुधवारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी महसूल, पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत गेट काढले. त्यामुळे पाण्याच्या कारणावरून तू पोलिसांचा मार खाऊन आलास, असे मस्करीत म्हटल्यावरून शेतकऱ्यांमध्ये हाणामारी सुरू झाली. शेवटी हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले.ढाणकी-पळसपूर परिसरात तणावया घटनेने ढाणमी, पळसपूर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. बंधाऱ्यावरील गावातील साईनाथ जाधव यांच्या तक्रारीवरून सहा आणि आणि बंधाºया खालील गावातील मदनराव जाधव यांच्या तक्रारीवरून पाच, अशा ११ जणांविरूद्ध दिहमायतनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पाण्याचा वाद आता चांगलाच पेटला असून १५ दिवसांच्या परिश्रमाने मिळविलेल्या पाण्यावरून शेतकºयांमध्येच मारामारी होऊ लागली आहे.