शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बंदोबस्तात गांजेगाव बंधाऱ्याचे गेट काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 21:38 IST

इसापूर धरणातून पैनगंगा नदी पात्रात सोडलेले पाणी गांजेगाव येथील बंधाऱ्याचे गेट अडवून रोखण्यात आले. बुधवारी पोलीस बंदोबस्तात हे गेट काढण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याने हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद झाले. ही घटना दुपारी २.३० वाजता घडली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये हाणामारी : उमरखेड तालुक्यात इसापूर धरणाचे पाणी पेटले, हिमायत नगरात गुन्हे दाखल

अविनाश खंदारे ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : इसापूर धरणातून पैनगंगा नदी पात्रात सोडलेले पाणी गांजेगाव येथील बंधाऱ्याचे गेट अडवून रोखण्यात आले. बुधवारी पोलीस बंदोबस्तात हे गेट काढण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याने हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद झाले. ही घटना दुपारी २.३० वाजता घडली.नदी पात्रात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी विदर्भ व मराठवाड्यातील ९० गावांतील शेतकऱ्यांनी तब्बल १५ दिवस आंदोलन केले होते. त्यानंतर नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. मात्र हे पाणी गांजेगाव येथील बंधाऱ्याचे गेट बंद करून अडविण्यात आले. परिणामी पाणी टेलपर्यंत पोहोचलेच नाही. त्यामुळे गांजेगाव बंधाºयाचे गेट काढून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवा, अशी मागणी बंधाऱ्याखालील गावकऱ्यांनी केली होती. बुधवारी पाटबंधारे विभागाने पोलीस बंदोबस्तात हे गेट काढले. यामुळे मराठवाडा हद्दीतील गेटवरील आणि गेटखालील गावकºयांत हाणामारी झाली. पैनगंगा नदी कोरडी पडल्याने पाणी प्रश्न गंभीर बनला. आंदोलनानंतर नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी नदी पात्रात पाणी सोडण्याचे आदेश दिले. मात्र १२ दलघमी पाणी सोडून १५ दिवस लोटल्यानंतरही पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले नाही. गांजेगाव बंधाऱ्यांच्यावरील गावच्या शेतकऱ्यांनी गेट बंद करून पाणी अडविले. त्यांनी गेट काढण्यास नकार दिला. एकत्रित आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्येच पाणी मिळविण्यासाठी वाद झाला.अखेर बुधवारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी महसूल, पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत गेट काढले. त्यामुळे पाण्याच्या कारणावरून तू पोलिसांचा मार खाऊन आलास, असे मस्करीत म्हटल्यावरून शेतकऱ्यांमध्ये हाणामारी सुरू झाली. शेवटी हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले.ढाणकी-पळसपूर परिसरात तणावया घटनेने ढाणमी, पळसपूर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. बंधाऱ्यावरील गावातील साईनाथ जाधव यांच्या तक्रारीवरून सहा आणि आणि बंधाºया खालील गावातील मदनराव जाधव यांच्या तक्रारीवरून पाच, अशा ११ जणांविरूद्ध दिहमायतनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पाण्याचा वाद आता चांगलाच पेटला असून १५ दिवसांच्या परिश्रमाने मिळविलेल्या पाण्यावरून शेतकºयांमध्येच मारामारी होऊ लागली आहे.