शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा मुलगा व मुलगी झाले पोलीस उपनिरीक्षक

By admin | Updated: March 18, 2015 02:24 IST

वडील शेतकरी, गावात राहून शेती करीत असताना आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे, असे स्वप्न त्यांनी बघितले होते.

आर्णी : वडील शेतकरी, गावात राहून शेती करीत असताना आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे, असे स्वप्न त्यांनी बघितले होते. आणि त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. अशोक जेता राठोड रा.आंबोडा या शेतकऱ्याचे मुलगा व मुलगी हे दोघेही पोलीस उपनिरीक्षक झाले.अशोक राठोड यांच्या मुलांनी आपल्या शेतकरी पित्याचे स्वप्न पूर्ण केले. दोन्ही मुलांनी प्रचंड मेहनत घेवून हे यश संपादन केले. वडील शेतकरी असल्याने त्यांचे शिक्षण आर्णी येथे काकाकडे झाले. काका म.द. भारती शाळेत आहेत. तर बहीण नम्रता ही उमरखेडला पोलीस असलेल्या काकांकडे शिक्षणासाठी होती. भाऊ विकास याने प्राथमिक शिक्षण आर्णीला तर पुढील शिक्षण पुसद व चंद्रपूरला पूर्ण केले. एम.एस्सी. बी.एड. केल्यानंतर विकासने प्राध्यापक म्हणून चंद्रपूरला एक वर्ष नोकरी केली. त्यानंतर ही नोकरी कायम ठेवण्यासाठी त्याला पैसे मोजावे लागणार होते. आपण हे करू शकणार नाही, याची त्याला जाणिव झाल्याने त्याने पीएसआयसाठी तयारी सुरू केली, तर दुसरीकडे बहीण नम्रता हिने बी.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काकांप्रमाणे आपणही पोलीस खात्यात जावे यासाठी पीएसआय होण्याचे ठरविले. दोन्ही भावंडांनी सातत्याने अभ्यास करून हे यश संपादन केले. २०१३ मध्ये दोघेही परीक्षेला बसले. आणि उत्तीर्ण होवून त्यांची निवडही झाली. यामध्ये विकास महाराष्ट्रातून व्हीजे प्रवर्गातून १३ व्या स्थानी तर नम्रता ही सातव्या स्थानी होती. या दोघांनीही आपल्या यशाचे श्रेय काका, काकू, आई, वडील व शिक्षक यांना दिले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलेही कठोर परिश्रमाने इतरांप्रमाणेच यश संपादन करू शकतात, हे या दोघांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. (शहर प्रतिनिधी)