अपहरणाचे प्रकरण : शहर पोलिसांचे पथकलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कंत्राटदाराचे अपहरण करून बेदम मारहाण केल्याप्रकरणी कुख्यात अक्षय टोळीच्या मागावर यवतमाळ पोलीस असून गत काही दिवसांपासून टोळी विरोधी पथक, शहर पोलीस ठाण्यातील पथक नागपुरात तळ ठोकून आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात शहर पोलिसांनी सात जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविले आहे. कुख्यात अक्षय राठोड बाहेर आल्यानंतर त्याने आठवडाभरातच खंडणीसाठी सचिन किसनराव मांगुळकर (३३) रा. चांदोरेनगर यांचे अपहरण करून बाभुळगाव येथील त्याचा सहकारी अनिकेत गावंडे यांच्या घरात डांबून बेदम मारहाण केली. सुदैवाने यातून कशीबशी कंत्राटदाराची सुटका झाली. तेव्हापासून पोलीस अक्षय राठोड टोळीच्या मागावर आहे. या टोळीचा भविष्यातील उद्रेक वाढू नये म्हणून पूर्णत: बिमोड करण्यासाठी पोलिस प्रयत्नात आहेत. त्यासाठी संपूर्ण कायदेशीर आयुधाचा वापर करण्यावर जोर आहे. या टोळील बगीरा, करण, पोपट व इतर दोघांचा पोलिसांना शोध आहे. एका कारवाईत अनिकेत गावंडे नागपूर येथील सोनेगाव पोलिसांच्या कारवाईत अडकल्याची माहिती आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी शहर पोलिसांचे पथक नागपूरकडे रवाना झाले आहे. अनिकेत गावंडेवरही अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. अक्षय कारागृहात गेल्यानंतर स्थानिक नेटवर्क अनिकेतच सांभाळत असल्याची पोलीस दफ्तरी नोंद आहे. अनिकेत हाती लागल्यास संपूर्ण टोळीलाच जेरबंद करण्यात यश येईल, असे सांगितले जात आहे. तर टोळी विरोधी पथकाकडून मिळणारी ट्रिमेंटच्या भितीतून अनिकेतनेच सोनेगावात आर्र्म अॅक्ट लावून घेतल्याचीही चर्चा आहे. गुन्हेगारीचा बीमोड करणारयवतमाळ शहरात गत काही दिवसांपासून गुन्हेगारी टोळ्यांनी डोके वर काढले आहे. या टोळ्यांचा बीमोड करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. त्याचाच भाग म्हणून अक्षय टोळीला जेरबंद करण्याचा प्रयत्न शहर पोलिसांतर्फे केला जात आहे.
अक्षय राठोड टोळीच्या शोधात पोलीस नागपुरात
By admin | Updated: June 13, 2017 01:16 IST