शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
4
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
5
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
6
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
7
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
8
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
9
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
10
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
11
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
12
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
13
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
14
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
15
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
16
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
17
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
18
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
19
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
20
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल

पोलीस पाटलाच्या खुनाने प्रशासन हादरले

By admin | Updated: July 5, 2015 02:18 IST

यवतमाळ तालुक्याच्या यावली (ईजारा) येथील पोलीस पाटील वीरेंद्र राठोड यांच्या खुनाने सरकार व प्रशासन हादरले आहे.

तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार : पालकमंत्री, एसपींची भेटअकोलाबाजार : यवतमाळ तालुक्याच्या यावली (ईजारा) येथील पोलीस पाटील वीरेंद्र राठोड यांच्या खुनाने सरकार व प्रशासन हादरले आहे. वीरेंद्र यांच्या पार्थिवावर शनिवारी तणाव पूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके यांनी यावली येथे भेटी देऊन नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले. या खुनप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. त्यामध्ये महादेव टेकाम, हुसेन आत्राम, शंकर अंजीकर (आत्राम), सुदाम शिवणकर, भगवान शिवणकर, दिवाण आत्राम यांचा समावेश आहे. न्यायालयाने त्यांना ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी पहाटे खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर गावात ४० पोलीस, चार्ली पथक तैनात करण्यात आले. यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने स्वत: या तपासावर लक्ष ठेऊन आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनात वडगाव जंगल पोलीस तपास करीत आहे. शनिवारी वीरेंद्र राठोड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा अमेय याने चितेला भडाग्नी दिला. नागपूर येथील प्रा. मोहन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा पार पडली. यावेळी एल.एच. पवार, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष हरकरे, महेश पवार आदींनी शोकसंवेदना व्यक्त केल्या. पालकमंत्री संजय राठोड यांनी गावात भेट दिली. त्यांनी वीरेंद्र यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. ते म्हणाले, वीरेंद्र राठोड यांना दारूबंदी समर्थनार्थ वीरमरण आले असून त्यांचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. शासनासाठी पोलीस पाटील म्हणून कर्तव्य बजावत असताना त्यांना निशाणा बनविले गेले. यातील आरोपींचा युद्धस्तरावर शोध घेण्याचे निर्देश दिले आहे. पोलिसांचा हलगर्जीपणा असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. शासन वीरेंद्र राठोड व कुटुंबीयांना न्याय देण्यात कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही संजय राठोड यांनी दिली. यवतमाळ जिल्हा दारूबंदी संबंधी शासन निश्चितच धोरणात्मक निर्णय घेईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावलीतील कोलाम पोडावर दारूवरून सुरू असलेल्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या वीरेंद्र राठोड यांचा गुरुवारच्या रात्री दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. दारू विक्रीला विरोध हेच प्रमुख कारण या खुनामागे सांगितले जाते. राठोड यांनी दिवाण आत्राम याची दारू वाहतूक करणारी इंडिका स्वत: पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली होती. दिवाण व साथीदारांवर गुन्हेही नोंदविले गेले. तेव्हापासूनच पोलीस पाटील वीरेंद्र यांचा वचपा काढण्याची तयारी सुरू होती, अशी चर्चा गावात आहे. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिसांनी त्या रात्री वेळीच दखल घेतली असती तर वीरेंद्र यांचा प्राण वाचला असता, असा संतप्त सूर नागरिकांमधून ऐकायला मिळाला. (वार्ताहर) कॅन्डल मार्चने वीरेंद्र राठोड यांना श्रद्धांजली यवतमाळ तालुक्यातील यावली (ईजारा) येथील पोलीस पाटील वीरेंद्र राठोड यांचा दारू विक्रीला विरोध करतात म्हणून निर्घृण खून करण्यात आला होता. त्यांंना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी यवतमाळच्या महात्मा फुले पुतळ्यापासून शनिवारी सायंकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये स्वामिनी मंडळ, गुरुदेव सेवा मंडळ, समाजकार्य महाविद्यालय, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसह कारेगाव यावली येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.