शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस गस्त टपरी चालकांच्या मुळावर

By admin | Updated: July 16, 2014 00:28 IST

स्थानिक पोलीस ठाण्याचे पथक आणि चार्ली पोलीस पथकाची रात्री शहरात गस्त असते. ही गस्त आता टपरीचालकांच्या मूळावर उठली आहे. चार्ली पोलीस पथकाचा रात्री ११ वाजताच टपऱ्या बंद करण्यावर भर आहे.

बंद करण्यावर चार्लीचा भर : स्थानिक पोलिसांचा जोर मात्र दुकाने उघडण्यावरयवतमाळ : स्थानिक पोलीस ठाण्याचे पथक आणि चार्ली पोलीस पथकाची रात्री शहरात गस्त असते. ही गस्त आता टपरीचालकांच्या मूळावर उठली आहे. चार्ली पोलीस पथकाचा रात्री ११ वाजताच टपऱ्या बंद करण्यावर भर आहे. ही बाब स्वागतार्ह असली तरी त्यांची व्यावसायिक आणि ग्राहकांशी वागण्याची पध्दत चूकीची आहे. तर स्थानिक पोलीस स्वत:च्या जिभेचे चोचले त्यातही विनामूल्य भागविण्यासाठी चार्ली पथकाने बंद केलेली दुकाने उघडायला लावतात, हे विशेष!वर्षभरापासून यवतमाळ शहर आणि वडगाव रोड हद्दीत सुरू असलेले जबरी चोरी व घरफोडीचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. चोरट्यांना हुडकून काढा, त्यांना चोरीतील मुद्देमालासह अटक करा, यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून यवतमाळ शहर, वडगाव रोड, स्थानिक गुन्हे शाखा, चार्ली पोलीस पथक यांची दररोजच कानउघाडणी केजी जाते. मात्र एकाही घटनेचा छडा लावण्यात अद्याप पोलिसांना यश आले नाही. त्यामध्ये यश येत नसले तरी या घटनांना आळा बसावा, म्हणून आता रात्रगस्त नित्यनेमाने केली जात आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांचे आणि चार्ली पोलीस पथक रात्रीदरम्यान शहरात गस्त घालतात. चार्ली पोलीस पथकाकडून व्यापारी प्रतिष्ठाने बंद करण्याबरोबरच संशयित आणि मद्यपींची चौकशी केली जाते. विशेष करून टपऱ्या बंद करून नागरीकांना घराकडे परतवून लावण्याकडे त्यांचा भर असतो. ही बाब कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने स्वागतार्ह आहे. मात्र हे करीत असतानाच अनेक प्रतिष्ठीत नागरिकांशी पथकातील कर्मचारी असभ्य वर्तन करतात. त्यांना शिविगाळ केली जाते. टपरी चालकांना मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. त्यामुळे चार्ली पोलीस पथकाकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टीकोन आता बदलत चालला आहे. उगाच वैर कशाला म्हणून टपरी चालक आपले दुकान गुंडाळतात. घराकडे निघण्याच्या बेतात असतानाच स्थानिक पोलिसांची गस्ती पथक तेथे पोहोचते. तसेच जिभेचे चोचले पुरविण्यासाठी बंद केलेले दुकान उघडायला लावतात. विशेष असे की, बहुतांश पोलीस कर्मचारी या टपरीचालकांना पैसे न देताच निघून जातात. पुन्हा दुकान बंद करताना चार्ली पोलिसांच्या हाती लागले की, शिवीगाळ, वाहनातील चाकांची हवा सोडणे, चालान अशा प्रकारांना त्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे टपरी चालकांची स्थिती अडकीत्त्यात अडकलेल्या सुपारीसारखी झाली असल्याचे दिसते. (स्थानिक प्रतिनिधी)