शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

पोलीस महानिरीक्षक ग्रामीण ठाण्यात धडकले

By admin | Updated: May 10, 2017 00:20 IST

पोलीस ठाण्यांमधील मालखाना व कर्मचाऱ्यांना उपयोगी पडणाऱ्या साहित्याची अवस्था काय, याची तपासणी करण्याचे आदेश राज्याचे अपर पोलीस महासंचालक

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : पोलीस ठाण्यांमधील मालखाना व कर्मचाऱ्यांना उपयोगी पडणाऱ्या साहित्याची अवस्था काय, याची तपासणी करण्याचे आदेश राज्याचे अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमरावतीचे पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव जिल्ह्यातील काही ठाण्यांची आता जाता-जाता पाहणी करणार आहे. विठ्ठल जाधव यांची राज्याच्या कारागृह विभागाचे महानिरीक्षक म्हणून पुण्याला बदली झाली आहे. मात्र अद्याप ते कार्यमुक्त झाले नाही. त्यांचे दौरे व अकस्मात भेटी सुरूच आहेत. पोलीस ठाण्यांची स्थिती तपासण्याच्या सूचना महासंचालकांनी केल्या आहेत. पोलीस ठाण्यांचा परिसर स्वच्छ आहे का, हातकड्या, बंदुका, रिव्हॉल्वर, भाला, लाठ्याकाठ्या, हेलमेट पुरेशा संख्येने आहेत का, याची विचारणा करण्यात आली आहे. शिवाय दीड महिन्यानंतर पावसाळा सुरू होणार आहे. त्यावेळी पूरपरिस्थिती उद्भवण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी आवश्यक असलेले दोर, लाईफ जॅकेट आहेत का, हे तपासण्याचे आदेश आहे. पुरातून कुणालाही बाहेर काढता यावे यासाठी पट्टीच्या पोहोणाऱ्यांची यादी पोलीस ठाण्याला अपडेट ठेवण्याच्या सूचना आहेत. अपर महासंचालक बिपीन बिहारी यांनी केलेल्या सूचनांची खातरजमा करण्यासाठी पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव मंगळवारी दुपारी २ वाजता जिल्हा दौऱ्यावर आले. त्यांनी यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याला भेट देऊन तेथील स्थितीची पाहणी केली. महानिरीक्षक जिल्ह्यातील पांढरकवडा, वणी व आणखी काही ठाण्यांना भेटी देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या भेटीत ते महासंचालकांनी सूचविलेल्या सर्व बारकाव्यांची पडताळणी करणार आहे. महानिरीक्षक विठ्ठल जाधव बदलीवर जाता-जाताही तपासणीत स्वत:ला व्यस्त ठेवत आहे. मात्र त्यांच्या या दौऱ्याने काही ठाणेदार नाके मुरडत असल्याचे चित्रही पहायला मिळते. बुधवारी महानिरीक्षक आणखी कोणकोणत्या ठाण्याला भेटी देतात याकडे ठाणेदारांचे लक्ष लागले आहे. नापास ठाणेदारांवर कारवाई कधी ? काही दिवसांपूर्वी महासंचालकांच्या सूचनेवरून जिल्ह्यात ठाणेदारांचे स्टिंग आॅपरेशन राबविले गेले होते. त्यात प्रत्येक जिल्ह्यात दोन ठाण्यात बनावट फिर्यादी पाठवून पोलिसांकडून मिळणारी ट्रीटमेंट तपासली गेली. यातील ठाणेदारांवर कारवाईचे निर्देश संबंधित पोलीस अधीक्षकांना दिले गेले होते. मात्र त्यानंतरही या ठाणेदारांना महानिरीक्षकांनी पेशीत बोलविल्याचे सांगितले जाते. स्टिंग आॅपरेशनमध्ये नापास झालेल्या ठाणेदारांवर कारवाई काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.