शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

खूनसत्रावर उपचाराची नस पोलिसांना सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 23:27 IST

शांत शहर म्हणून ओळख असलेल्या यवतमाळात दर आठवड्याला खुनाची घटना घडत आहे. दिवसाढवळ्या खून होत आहे. जानेवारीपासून चार महिन्यात एक-दोन नव्हे तब्बल १४ खून झाले. आरोपी पोलिसांच्या हातीही लागत आहे.

ठळक मुद्देचार महिन्यात १४ खून : नवख्यांची मानसिकता ओळखण्यात अपयश

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शांत शहर म्हणून ओळख असलेल्या यवतमाळात दर आठवड्याला खुनाची घटना घडत आहे. दिवसाढवळ्या खून होत आहे. जानेवारीपासून चार महिन्यात एक-दोन नव्हे तब्बल १४ खून झाले. आरोपी पोलिसांच्या हातीही लागत आहे. मात्र खुनाचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. पोलीस यंत्रणेच्या अनेक मर्यादा या खून सत्राने उघड झाल्या. प्रत्येक खुनात नवीनच आरोपी असतात. नवख्या आरोपींची मानसिकता ओळखण्यात अपयश आल्याने पोलिसांना उपचाराची नसही सापडत नाही.यवतमाळ शहराची ओळख गुन्हेगारांचे शहर अशी होऊ लागली आहे. येथील गुन्हेगारीचा प्रश्न थेट विधिमंडळातही गाजला. शहरात खुनाचे सत्र सुरू आहे. एकट्या यवतमाळ शहरात जानेवारी ते २५ एप्रिलपर्यंत तब्बल १४ खून झाले. भर रस्त्यात, वर्दळीच्या ठिकाणी खुनाच्या घटना घडत आहे. या खुनांमुळे शहरातील सर्वसामान्य नागरिक दहशतीत आले आहे. खून झाला की पोलीस आरोपींना तातडीने अटक करतात. पुढची कारवाई होते. परंतू खुनाचे सत्र थांबविण्यासाठी पोलिसांकडे कोणतेच नियोजन दिसत नाही. रेकॉर्डवरील गुन्हेगार नाही म्हणून पोलीस हात वर करतात. नवघ्याना कसे ओळखायचे, कुणाचे कोणाशी वैर आहे याची माहिती मिळणे शक्य नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या घटना सातत्याने वाढत आहे.शहरात घडलेल्या प्रत्येक खुनामागील कारणांची मिमांसा केली तर त्यात वेगवेगळी कारणे आढळून येतात. सावकारीपासून भाईगिरीपर्यंत सर्वच कारणांचा यात समावेश आहे. अल्पवयीन आणि नवयुवकही दिवसाढवळ्या खून करण्यात मागे नाही. यवतमाळ शहरातील गुन्हेगारीवर वचक आणण्यासाठी पोलिसांचे योग्य नियोजनच दिसत नाही. विधिमंडळात गुन्हेगारीची मुद्दा गाजल्यानंतर पोलीस रस्त्यावर उतरले.काही दिवस वाहनधारकांची तपासणी केली. मात्र आता ही मोहिमही थंड बस्त्यात पडली आहे. खून होताच मात्र आरोपींनाही अटक करतोच की असे अफलातून उत्तर दिले जाते. पोलीस ठाण्यामध्ये अनेक वर्षापासून मुक्कामी कर्मचारी आहे. त्यांना प्रत्येक हालचालीची माहिती सुद्धा मिळते. परंतु कारवाई करण्याची मानसिकता नाही. केवळ आपले पद कायम ठेवण्यासाठी तजविज केली जाते. याला बाहेरुन आलेल्या अधिकाऱ्यांनाही भक्कम साथ दिली जाते. जमादाराकडे बीट सोपविण्यात येते. त्यावर अधिकाºयाचे नियंत्रण असते. परंतू प्रत्यक्षात कोणाचे लक्ष दिसत नाही. दिलेला कार्यक्रम राबवून सोपस्कार पूर्ण करण्याची मानसिकता झाली आहे. याच कारणामुळे खुनाच्या सत्रावर उपचाराची नस पोलिसांच्या हाती सापडत नाही.नव्या आकृतीबंधाची गरजशहर पोलीस ठाण्यानंतर अवधूत वाडी ठाणे तयार झाले. त्यानंतर लोहारा ठाण्याचीही निर्मिती झाली. मात्र येथे पुरेसा अधिकारी-कर्मचारी वर्ग नाही. शहराची लोकसंख्या अडीच लाखाच्या घरात आहे. त्या तुलनेत पोलीस अधिकारी, कर्मचारी नाही. मंजूर असलेला आकृतीबंध हा १५ वर्षापूर्वीचा आहे. त्यातही अनेक पदे रिक्त आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करण्याची गरज आहे. राजकीय मानसिकता नसल्याने नवीन आकृतीबंध तयार होत नाही.

टॅग्स :Crimeगुन्हा