शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

पोलीस वसाहतीला प्लास्टिक छप्पर

By admin | Updated: June 30, 2015 02:03 IST

पोलिसांवर समाजात शांतता व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी असते. तथापि समाजाच्या सुरक्षिततेची काळजी

मारेगाव : पोलिसांवर समाजात शांतता व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी असते. तथापि समाजाच्या सुरक्षिततेची काळजी घेणाऱ्या पोलिसांची निवासस्थानेच असुरक्षित आहेत. परिणामी भटकंती करणाऱ्या फिरस्त्याप्रमाणे घरावर प्लॅस्टिक टाकून त्यांना असुरक्षित जीवन जगावे लागत आहे. निवासस्थानाअभावी पोलीस कुटुंबांची वाताहत होत आहे.चार दशकापूर्वी येथे पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी २२ क्वॉर्टरची निर्मिती करण्यात आली. मारेगाव शहर त्यावेळी लोकसंख्येने लहान होते. शहराला ग्रामीण ‘टच’ असल्याने पोलिसांची वसाहत नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय होती. या वसाहतीला शहरी ‘बाज’ होता. मात्र पोलीस निवासस्थानांच्या निर्मितीपासून या निवासस्थानांच्या दुरूस्तीकडे विभागाने लक्षच न दिल्याने या निवासस्थानाची आता प्रचंड दुरवस्था झाली आहे. घरांच्या भींतींना तडे गेले असून अनेक ठिकाणचे प्लॅस्टर निघाले आहे. आता तर भिंतीला हात लागताच प्लॅस्टर निघते. खिडक्या, दरवाजांची स्थितीही दयनीय असून या दोन्ही वस्तू केवळ नावापुरत्याच शिल्लक उरल्या आहेत. पोलीस निवासस्थानावर कवेलू असून पावसाळ्यात घराच्या छताची केविलवाणी अवस्था असते. पाऊस लागताच घरातच धारा लागतात. गळणारे पाणी धरायला घरातील भांडे कमी पडतात. घराच्या छतावरचे फाटे तुटलेले असल्याने घरावरील कवेलूही बदलविता येत नाही. त्यामुळे यावर उपाय म्हणून निवासस्थानात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण छतावर आता प्लॅस्टिक टाकून गळणाऱ्या पाण्यापासून कुटुंबांना वाचविण्याचा प्रयत्न चालविला आहे. सोबतच खिडक्यांनाही प्लॅस्टिक लावले आहे. खाली बसवलेली फरशी फुटकी असल्याने फुटक्या ठिकाणी सिमेंट व रेती टाकून तो भाग बुजविण्याचा प्रयत्न चालविला आहे. यापेक्षा भयावह स्थिती निवासस्थानातील शौचालयांची आहे. तुटलेले दरवाजे, फुटलेल्या शौचालयाच्या सिटा, चोकप झालेले संडास, याचा सामना करीत पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना अक्षरश: नरक यातनाचा अनुभव घेत जीवन जगावे लागत आहे. (शहर प्रतिनिधी)सर्वांसाठी घर, पोलिसांचे काय ?येथील पोलीस ठाण्यातर्फे अनेकदा वरिष्ठांना निवासस्थाने दुरूस्तीबाबत कळविण्यात आले. मात्र वरिष्ठांकडून दुरूस्तीसाठी आजतागायत प्रतिसाद मिळाला नाही. केंद्र शासनाने नुकतीच सर्वांसाठी घर, ही योजना सुरू केली. त्याबाबत बोलताना एक पोलीस कर्मचारी म्हणाला, सरकारला कर्मचाऱ्यांनाच घर देता येत नाही, तर सर्वांना सरकार घर कोठून उपलब्ध करून देणार. शासनाने पहिल्यांदा कर्मचाऱ्यांना घर उपलब्ध करून द्यावे, मगच सर्वांसाठी घर या योजनेची घोषणा करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.