शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

पोलीस वसाहतीला प्लास्टिक छप्पर

By admin | Updated: June 30, 2015 02:03 IST

पोलिसांवर समाजात शांतता व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी असते. तथापि समाजाच्या सुरक्षिततेची काळजी

मारेगाव : पोलिसांवर समाजात शांतता व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी असते. तथापि समाजाच्या सुरक्षिततेची काळजी घेणाऱ्या पोलिसांची निवासस्थानेच असुरक्षित आहेत. परिणामी भटकंती करणाऱ्या फिरस्त्याप्रमाणे घरावर प्लॅस्टिक टाकून त्यांना असुरक्षित जीवन जगावे लागत आहे. निवासस्थानाअभावी पोलीस कुटुंबांची वाताहत होत आहे.चार दशकापूर्वी येथे पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी २२ क्वॉर्टरची निर्मिती करण्यात आली. मारेगाव शहर त्यावेळी लोकसंख्येने लहान होते. शहराला ग्रामीण ‘टच’ असल्याने पोलिसांची वसाहत नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय होती. या वसाहतीला शहरी ‘बाज’ होता. मात्र पोलीस निवासस्थानांच्या निर्मितीपासून या निवासस्थानांच्या दुरूस्तीकडे विभागाने लक्षच न दिल्याने या निवासस्थानाची आता प्रचंड दुरवस्था झाली आहे. घरांच्या भींतींना तडे गेले असून अनेक ठिकाणचे प्लॅस्टर निघाले आहे. आता तर भिंतीला हात लागताच प्लॅस्टर निघते. खिडक्या, दरवाजांची स्थितीही दयनीय असून या दोन्ही वस्तू केवळ नावापुरत्याच शिल्लक उरल्या आहेत. पोलीस निवासस्थानावर कवेलू असून पावसाळ्यात घराच्या छताची केविलवाणी अवस्था असते. पाऊस लागताच घरातच धारा लागतात. गळणारे पाणी धरायला घरातील भांडे कमी पडतात. घराच्या छतावरचे फाटे तुटलेले असल्याने घरावरील कवेलूही बदलविता येत नाही. त्यामुळे यावर उपाय म्हणून निवासस्थानात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण छतावर आता प्लॅस्टिक टाकून गळणाऱ्या पाण्यापासून कुटुंबांना वाचविण्याचा प्रयत्न चालविला आहे. सोबतच खिडक्यांनाही प्लॅस्टिक लावले आहे. खाली बसवलेली फरशी फुटकी असल्याने फुटक्या ठिकाणी सिमेंट व रेती टाकून तो भाग बुजविण्याचा प्रयत्न चालविला आहे. यापेक्षा भयावह स्थिती निवासस्थानातील शौचालयांची आहे. तुटलेले दरवाजे, फुटलेल्या शौचालयाच्या सिटा, चोकप झालेले संडास, याचा सामना करीत पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना अक्षरश: नरक यातनाचा अनुभव घेत जीवन जगावे लागत आहे. (शहर प्रतिनिधी)सर्वांसाठी घर, पोलिसांचे काय ?येथील पोलीस ठाण्यातर्फे अनेकदा वरिष्ठांना निवासस्थाने दुरूस्तीबाबत कळविण्यात आले. मात्र वरिष्ठांकडून दुरूस्तीसाठी आजतागायत प्रतिसाद मिळाला नाही. केंद्र शासनाने नुकतीच सर्वांसाठी घर, ही योजना सुरू केली. त्याबाबत बोलताना एक पोलीस कर्मचारी म्हणाला, सरकारला कर्मचाऱ्यांनाच घर देता येत नाही, तर सर्वांना सरकार घर कोठून उपलब्ध करून देणार. शासनाने पहिल्यांदा कर्मचाऱ्यांना घर उपलब्ध करून द्यावे, मगच सर्वांसाठी घर या योजनेची घोषणा करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.