शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
3
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
4
Ishant Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
5
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
6
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
7
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
8
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
9
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
10
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
11
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
12
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
13
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
14
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
15
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
16
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
17
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
18
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
19
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
20
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस वसाहतीला प्लास्टिक छप्पर

By admin | Updated: June 30, 2015 02:03 IST

पोलिसांवर समाजात शांतता व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी असते. तथापि समाजाच्या सुरक्षिततेची काळजी

मारेगाव : पोलिसांवर समाजात शांतता व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी असते. तथापि समाजाच्या सुरक्षिततेची काळजी घेणाऱ्या पोलिसांची निवासस्थानेच असुरक्षित आहेत. परिणामी भटकंती करणाऱ्या फिरस्त्याप्रमाणे घरावर प्लॅस्टिक टाकून त्यांना असुरक्षित जीवन जगावे लागत आहे. निवासस्थानाअभावी पोलीस कुटुंबांची वाताहत होत आहे.चार दशकापूर्वी येथे पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी २२ क्वॉर्टरची निर्मिती करण्यात आली. मारेगाव शहर त्यावेळी लोकसंख्येने लहान होते. शहराला ग्रामीण ‘टच’ असल्याने पोलिसांची वसाहत नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय होती. या वसाहतीला शहरी ‘बाज’ होता. मात्र पोलीस निवासस्थानांच्या निर्मितीपासून या निवासस्थानांच्या दुरूस्तीकडे विभागाने लक्षच न दिल्याने या निवासस्थानाची आता प्रचंड दुरवस्था झाली आहे. घरांच्या भींतींना तडे गेले असून अनेक ठिकाणचे प्लॅस्टर निघाले आहे. आता तर भिंतीला हात लागताच प्लॅस्टर निघते. खिडक्या, दरवाजांची स्थितीही दयनीय असून या दोन्ही वस्तू केवळ नावापुरत्याच शिल्लक उरल्या आहेत. पोलीस निवासस्थानावर कवेलू असून पावसाळ्यात घराच्या छताची केविलवाणी अवस्था असते. पाऊस लागताच घरातच धारा लागतात. गळणारे पाणी धरायला घरातील भांडे कमी पडतात. घराच्या छतावरचे फाटे तुटलेले असल्याने घरावरील कवेलूही बदलविता येत नाही. त्यामुळे यावर उपाय म्हणून निवासस्थानात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण छतावर आता प्लॅस्टिक टाकून गळणाऱ्या पाण्यापासून कुटुंबांना वाचविण्याचा प्रयत्न चालविला आहे. सोबतच खिडक्यांनाही प्लॅस्टिक लावले आहे. खाली बसवलेली फरशी फुटकी असल्याने फुटक्या ठिकाणी सिमेंट व रेती टाकून तो भाग बुजविण्याचा प्रयत्न चालविला आहे. यापेक्षा भयावह स्थिती निवासस्थानातील शौचालयांची आहे. तुटलेले दरवाजे, फुटलेल्या शौचालयाच्या सिटा, चोकप झालेले संडास, याचा सामना करीत पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना अक्षरश: नरक यातनाचा अनुभव घेत जीवन जगावे लागत आहे. (शहर प्रतिनिधी)सर्वांसाठी घर, पोलिसांचे काय ?येथील पोलीस ठाण्यातर्फे अनेकदा वरिष्ठांना निवासस्थाने दुरूस्तीबाबत कळविण्यात आले. मात्र वरिष्ठांकडून दुरूस्तीसाठी आजतागायत प्रतिसाद मिळाला नाही. केंद्र शासनाने नुकतीच सर्वांसाठी घर, ही योजना सुरू केली. त्याबाबत बोलताना एक पोलीस कर्मचारी म्हणाला, सरकारला कर्मचाऱ्यांनाच घर देता येत नाही, तर सर्वांना सरकार घर कोठून उपलब्ध करून देणार. शासनाने पहिल्यांदा कर्मचाऱ्यांना घर उपलब्ध करून द्यावे, मगच सर्वांसाठी घर या योजनेची घोषणा करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.