शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

पोलीस वसाहत मोडकळीस

By admin | Updated: September 2, 2015 04:00 IST

नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असणारे दिग्रसचे पोलीस मात्र आपल्या शासकीय वसाहतीतील घरांमध्ये असुक्षित

दिग्रस : नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असणारे दिग्रसचे पोलीस मात्र आपल्या शासकीय वसाहतीतील घरांमध्ये असुक्षित आहेत. ब्रिटिशकालीन पोलीस वसाहत मोडकळीस आली असून अनेक घरांची पडझड झाली आहे. परिणामी ७० च्यावर पोलीस शहरात विविध ठिकाणी भाड्याचे घर घेऊन राहत आहे. या पोलीस वसाहतीचा प्रश्न अद्यापही धूळ खात पडून आहे.दिग्रस शहरात ब्रिटीश काळापासून पोलीस ठाणे आहे. पोलीस ठाण्यालगतच त्याच वेळी पोलीस वसाहत बांधण्यात आली होती. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना तत्काळ उपस्थित राहता यावे, हा त्या मागचा उद्देश होता. आतापर्यंत अनेक जण या वसाहतीत राहत होते. परंतु अलीकडच्या काळात या वसाहतीची अवस्था दयनीय झाली आहे. सध्या पोलीस वसाहतीत ३१ निवासस्थाने असून ठाणेदारांसाठी स्वतंत्र बंगला आहे. या ३१ निवासस्थानात सध्या १५ पोलीस कुटुंबीय जीव मुठीत घेऊन वास्तव्यास आहे. तर उर्वरित ७० पोलीस कर्मचारी या ठिकाणी राहावयास तयार नाही. मूलभूत सुविधा नसल्याने कर्मचारी शहरात भाड्याचे घर घेऊन राहतात. वसाहतीच्या निर्मितीनंतर देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे या वसाहतीची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे.पोलीस वसाहतीच्या छतावरील कौल फुटून गेले आहे. ठिकठिकाणी तुकडेतुकडे झाले आहे. पावसाळ्यात या निवासस्थानात अक्षरश: धारा लागतात. या वसाहतीत राहणारे कर्मचारी आपल्या घरावर प्लास्टिक टाकून गळणाऱ्या पाण्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करतात. छतासारखीच दारे आणि खिडक्यांचीही अवस्था झाली आहे. दार आणि खिडक्या खिळखिळ्या झाल्या असून अनेक वसाहतीची दारे तर लागतच नाही. खिडक्या केवळ नावालाच आहे. या परिसरातील शौचालयही घाणीने बरबटले असून प्रत्येक शौचालयाचे दार तुटलेले आहे. या दारातून सरपटणारे प्राणी आत येण्याची भीती कायम असते. घरांच्या भिंतींना मोठ्ठाले तडे गेले असून भिंती कधी कोसळेल याचा नेम नाही. घरातील फर्शा केव्हाच उखडल्या असून तशीच अवस्था शौचालयाची आहे. नळाचे पाईप ठिकठिकाणी फुटले असल्याने नळाला देखील पाणी येत नाही. शौचालय बंद असल्याने कर्मचाऱ्यांना उघड्यावर जाण्याची वेळ आली आहे. या वसाहतीच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा भिंतही बांधली नाही. सांडपाण्याची व्यवस्थापन होत नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून घरांच्या आजूबाजूला गाजर गवत उगवले आहे. या गाजर गवतात अनेक विषारी प्राणी दिसतात. परंतु कुणीही याकडे लक्ष देत नाही.(शहर प्रतिनिधी)ब्रिटिशकालीन वसाहतीकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष४दिग्रस येथे ब्रिटिशांनी बांधलेल्या या निवासस्थानांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी जाताना त्यांंना घराचीच काळजी लागली असते. रात्रपाळीतील कर्मचारी तर तासा-दोन तासाला फोन करून ख्याली खुशाली विचारत असतो. घरच सुरक्षित नसेल तर पोलीस जनतेचे काय रक्षण करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. या वसाहतीच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. परंतु अद्यापही त्यावर कोणतीच उपाययोजना झाली नाही. त्यामुळे वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यात नाराजीचा सूर दिसत आहे.