शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

कृषी बाजार समित्यांनी मागितले पोलीस संरक्षण

By admin | Updated: April 22, 2017 01:42 IST

शेवटच्या दिवशी तूर खरेदीसाठी जिल्ह्यातील बाजार समित्यांनी पोलीस संरक्षण मागितले.

तूर खरेदीचा आज शेवटचा दिवस : स्फोटक स्थितीचा धोका यवतमाळ : शेवटच्या दिवशी तूर खरेदीसाठी जिल्ह्यातील बाजार समित्यांनी पोलीस संरक्षण मागितले. यावरून या केंद्रांवरील शेतकऱ्यांचा रेटा लक्षात घेता स्थिती स्फोटक होण्याचा धोका वाढला आहे. शासकीय तूर खरेदीसाठी शनिवार, २२ एप्रिल हा शेवटचा दिवस उरला आहे. अखेरच्या दिवशी तूर खरेदीसाठी शासकीय खरेदी केंद्रांना आता बाजार समित्यांनी पोलीस संरक्षण मागितले आहे. आत्तापर्यंत शासकीय तूर खरेदी केंद्राने दीड लाख क्विंटल तुरीची खरेदी केली. अद्याप ६० हजार क्विंटलच्यावर तूर केंद्रावर पडून आहे. ही तूर मोजावी म्हणून शेतकरी धडपडत आहे. मात्र मर्यादित मनुष्यबळामुळे खरेदी केंद्रांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी २२ एप्रिलपर्यंत तूर खरेदी करण्याचे पत्र बाजार समित्यांना दिले. याच पत्रात त्यांनी शेतकऱ्यांकडून कमी दर्जाची तूर खरेदी करण्यासाठी दबाव येत असल्याचा उल्लेख केला. त्यासाठी शेवटच्या दिवशी रेटा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली. यामुळे पोलीस संरक्षण घेण्याचे त्यांनी बाजार समित्यांना सांगितले. त्यानुसार बाजार समित्यांनी पोलीस संरक्षण मागितले आहे. शेतकरी झाले सैरभैर २२ एप्रिलपर्यंत तूर खरेदीचे पत्र धडकल्याने टोकनवर तूर खरेदी नोंदविणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. ते वाट्टेल त्या वाहनाने तूर केंद्रांवर आणत आहे. प्रत्येक केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी आहे. या तुरीचे मोजमाप करणेही अवघड झाले. अशा स्थितीत अखेरचा दिवस आल्याने शेतकरी सैरभैर झाले आहेत. सरकारची भूमिका दुटप्पी या कठीण प्रसंगी सरकारने शेतकऱ्यांसोबत असणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. सरकार दुटप्पी भूमिकेत असल्याचा आरोप कळंब बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख यांनी केला. यवतमाळ बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक यांनी शेतकऱ्यांना आंदोलनाशिवाय पर्याय उरला नसल्याचे स्पष्ट केले. सर्व सभापतींची २३ एप्रिलला या संदर्भात बैठक होत असून त्यात आंदोलनाची भूमिका ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. (शहर वार्ताहर)