शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

पाऊस अन् पुनर्गठणाच्या प्रतीक्षेत घेतले विष

By admin | Updated: July 14, 2015 01:50 IST

बैलजोडी विकून केलेली पेरणी पावसाविना वाया गेली. गडप झालेल्या पावसाची आणि कर्ज पुनर्गठणाची आस बाळगून

यवतमाळ : बैलजोडी विकून केलेली पेरणी पावसाविना वाया गेली. गडप झालेल्या पावसाची आणि कर्ज पुनर्गठणाची आस बाळगून त्याने कशीबशी दुबार पेरणी केली. तीही उलटली. अखेर शासनाच्या नाकर्तेपणाकडे अंगुलीनिर्देश करीत त्याने विषाचा घोट घेतलाच. पुंडलिकराव सुपलकर या शेतकऱ्याच्या आत्महत्येने दुबार पेरणीचे संकटाची तीव्रता लक्षात आणून देणारे ठरले.पुंडलिकराव बापूराव सुपलकर (६५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. बाभूळगाव तालुक्यातील दाभा (पहूर) येथील या वृद्ध शेतकऱ्याने कर्ज पुनर्गठण झाले नाही म्हणून बैलजोडी विकून चार एकर शेतात सोयबीनची पेरणी केली. मात्र, पाऊस नसल्याने त्यांचे पीक उगवलेच नाही. याच भीतीने त्यांनी भल्या पहाटे विषाचा घोट घेतला. सुपलकर यांनी मागील वर्षी सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र, त्यांच्या हाती पीक आले नाही. परिणामी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज थकले. या थकीत कर्जाची परतफेड न झाल्यामुळे यावर्षीच्या खरिपासाठी कर्ज मिळाले नाही. सरकारच्या धोरणानुसार आज ना उद्या बँकेतील कर्जाचे पुनर्गठण केले जाईल, या आशेवरच सुपलकर यांनी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले. त्यातूनच चार एकरात सोयाबीनची पेरणी केली. खासगी सावकाराची मुदत संपत आल्याने सावकाराने तगादा लावणे सुरू केले होते. तसेच पाऊस नसल्याने शेत पडीत पडण्याची वेळ आली. याच विचारात पुंडलीकराव सुपलकर यांनी २९ जून रोजी सकाळी उठून घरची कामे आटोपली. नंतर घराबाहेर जाऊन विष प्राशन केले. त्यांना गंभीर अवस्थेत कुटुंबीयांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. शेवटी सोमवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. या शेतकरी आत्महत्येने शासनाचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर आणला आणि निसर्गाचा आघात असह्य असल्याचेही स्पष्ट केले. आता तरी प्रशासनाने दुबार पेरणीचे संकट सोसत असलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे. पुंडलिकरावांच्या मागे मुलगा ज्ञानेश्वर आहे. तो सध्या रोजमजुरी करून आपला संसार चालवित आहे. वडिलांच्या अकस्मात जाण्याने त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (कार्यालय प्रतिनिधी) पावसाच्या दडीने घेतला शेतकऱ्याचा बळी घरची बैलजोडी ४० हजारात विकली. यातील बहुतांश रक्कम सावकाराचे कर्ज परतफेड करण्यातच खर्च झाली. पावसात खंड पडल्याने शेतातील सोयाबीनचे पीक निघाले नाही. त्यामुळे बैलजोडीच्या उरलेल्या पैशातून दुबार पेरणी केली. यावरही पाऊस आलाच नाही. नियमित कर्ज परतफेड करणारा शेतकरी कर्जबाजारी झाला.