शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांनी केली बचत गट महिलांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 22:54 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदी यांनी आर्णी विधानसभा मतदारसंघातील दाभडी गावात ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात पहिल्यांदा बचत गटाच्या महिलांसाठी बिनव्याजी कर्ज, लघुउद्योग उभारणी, घरबसल्या रोजगार यासारख्या घोषणा केल्या गेल्या. परंतु पाच वर्षात यापैकी एकही घोषणा प्रत्यक्षात साकारली गेली नाही. या घोषणा म्हणजे केवळ आश्वासने ठरल्या.

ठळक मुद्देकाँग्रेसचा आरोप : दाभडी, पांढरकवडा पाठोपाठ औरंगाबादमध्येही खोटी आश्वासने

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी बचत गटाच्या गोरगरीब लाखो महिलांची कर्ज व निधीचे आमिष दाखवून दिशाभूल करीत आहेत. याच महिलांचा मग प्रचारातील गर्दी वाढविण्यासाठी वापर केला जातो. पांढरकवडा येथे १६ फेब्रुवारी रोजी याच महिलांचा आधार घेऊन प्रचारसभा यशस्वी केली गेली, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी केला आहे.अ‍ॅड. मोघे म्हणाले, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदी यांनी आर्णी विधानसभा मतदारसंघातील दाभडी गावात ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात पहिल्यांदा बचत गटाच्या महिलांसाठी बिनव्याजी कर्ज, लघुउद्योग उभारणी, घरबसल्या रोजगार यासारख्या घोषणा केल्या गेल्या. परंतु पाच वर्षात यापैकी एकही घोषणा प्रत्यक्षात साकारली गेली नाही. या घोषणा म्हणजे केवळ आश्वासने ठरल्या. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी १६ फेब्रुवारी २०१९ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच आर्णी विधानसभा मतदारसंघात पांढरकवडा येथे सभा घेतली. या सभेतसुद्धा बचत गटाच्या महिलांना पुन्हा कर्ज, निधी यासारखी आश्वासने दिली गेली. त्यावरून सहा महिने लोटले. मात्र अद्याप या आश्वासनांची पूर्ती झालेली नाही. आता दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमध्येसुद्धा मोदींनी पुन्हा बचत गटाच्या महिलांपुढे एक लाखापर्यंत कर्ज, जनधन खात्यात पाच हजाराचा ओव्हरड्राफ्ट आदी आश्वासने दिली. औरंगाबादमधील या मेळाव्यातून तर मोदींच्या फसव्या आश्वासनांची जणू पोलखोल झाली आहे. त्यांनी बचत गटाच्या महिलांना दिलेले कोणतेच आश्वासन पाळलेले नाही. उलट या आश्वासनांच्या बळावर सदर महिलांच्या गर्दीचा आपल्या सभा यशस्वी करण्यासाठी व गर्दी जमविण्यासाठी उपयोग केल्याचा आरोप मोघे यांनी केला आहे.खोट्या आश्वासनांसाठी दाभडी-पांढरकवडाचा वापरमोदी यांनी खोट्या प्रचार व दिशाभूल करणाऱ्या आश्वासनांसाठी कायम यवतमाळ जिल्ह्यातील आणि विशेषत: आर्णी विधानसभा मतदारसंघातील भूमीचा वापर केला आहे. मोदींनी बचत गटाच्या महिलांचीच नव्हे तर देशातील तमाम जनतेचीसुद्धा प्रत्येकाच्या बँक खात्यता १५ लाख रुपये जमा करू, हे आश्वासन देऊन व त्याची पूर्तता न करून दिशाभूल केली आहे. बचत गटाच्या महिलांची दिशाभूल करून भाजपने लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळविले. आर्णी मतदारसंघातसुद्धा याच बळावर भाजपला ५८ हजार मतांची लोकसभेत आघाडी मिळाली.भाजप आमदारांना फटकाआता बचत गटाच्या महिलांचा मोदींच्या फसव्या आश्वासनामुळे गैरसमज दूर झाला असून विधानसभा निवडणुकीत बचत गटाच्या महिला मोदींच्या या फसव्या आश्वासनांना थारा देणार नाही, भाजपची ही पैशाची जादू आता चालणार नाही, असेही शिवाजीराव मोघे यांनी सांगितले. मोदींच्या या फसव्या आश्वासनांचा आगामी विधाससभा निवडणुकीत भाजपच्या आमदारांना गावागावात मोठा फटका बसण्याची शक्यताही अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी वर्तविली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी