शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

पंतप्रधानांनी केली बचत गट महिलांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 22:54 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदी यांनी आर्णी विधानसभा मतदारसंघातील दाभडी गावात ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात पहिल्यांदा बचत गटाच्या महिलांसाठी बिनव्याजी कर्ज, लघुउद्योग उभारणी, घरबसल्या रोजगार यासारख्या घोषणा केल्या गेल्या. परंतु पाच वर्षात यापैकी एकही घोषणा प्रत्यक्षात साकारली गेली नाही. या घोषणा म्हणजे केवळ आश्वासने ठरल्या.

ठळक मुद्देकाँग्रेसचा आरोप : दाभडी, पांढरकवडा पाठोपाठ औरंगाबादमध्येही खोटी आश्वासने

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी बचत गटाच्या गोरगरीब लाखो महिलांची कर्ज व निधीचे आमिष दाखवून दिशाभूल करीत आहेत. याच महिलांचा मग प्रचारातील गर्दी वाढविण्यासाठी वापर केला जातो. पांढरकवडा येथे १६ फेब्रुवारी रोजी याच महिलांचा आधार घेऊन प्रचारसभा यशस्वी केली गेली, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी केला आहे.अ‍ॅड. मोघे म्हणाले, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदी यांनी आर्णी विधानसभा मतदारसंघातील दाभडी गावात ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात पहिल्यांदा बचत गटाच्या महिलांसाठी बिनव्याजी कर्ज, लघुउद्योग उभारणी, घरबसल्या रोजगार यासारख्या घोषणा केल्या गेल्या. परंतु पाच वर्षात यापैकी एकही घोषणा प्रत्यक्षात साकारली गेली नाही. या घोषणा म्हणजे केवळ आश्वासने ठरल्या. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी १६ फेब्रुवारी २०१९ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच आर्णी विधानसभा मतदारसंघात पांढरकवडा येथे सभा घेतली. या सभेतसुद्धा बचत गटाच्या महिलांना पुन्हा कर्ज, निधी यासारखी आश्वासने दिली गेली. त्यावरून सहा महिने लोटले. मात्र अद्याप या आश्वासनांची पूर्ती झालेली नाही. आता दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमध्येसुद्धा मोदींनी पुन्हा बचत गटाच्या महिलांपुढे एक लाखापर्यंत कर्ज, जनधन खात्यात पाच हजाराचा ओव्हरड्राफ्ट आदी आश्वासने दिली. औरंगाबादमधील या मेळाव्यातून तर मोदींच्या फसव्या आश्वासनांची जणू पोलखोल झाली आहे. त्यांनी बचत गटाच्या महिलांना दिलेले कोणतेच आश्वासन पाळलेले नाही. उलट या आश्वासनांच्या बळावर सदर महिलांच्या गर्दीचा आपल्या सभा यशस्वी करण्यासाठी व गर्दी जमविण्यासाठी उपयोग केल्याचा आरोप मोघे यांनी केला आहे.खोट्या आश्वासनांसाठी दाभडी-पांढरकवडाचा वापरमोदी यांनी खोट्या प्रचार व दिशाभूल करणाऱ्या आश्वासनांसाठी कायम यवतमाळ जिल्ह्यातील आणि विशेषत: आर्णी विधानसभा मतदारसंघातील भूमीचा वापर केला आहे. मोदींनी बचत गटाच्या महिलांचीच नव्हे तर देशातील तमाम जनतेचीसुद्धा प्रत्येकाच्या बँक खात्यता १५ लाख रुपये जमा करू, हे आश्वासन देऊन व त्याची पूर्तता न करून दिशाभूल केली आहे. बचत गटाच्या महिलांची दिशाभूल करून भाजपने लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळविले. आर्णी मतदारसंघातसुद्धा याच बळावर भाजपला ५८ हजार मतांची लोकसभेत आघाडी मिळाली.भाजप आमदारांना फटकाआता बचत गटाच्या महिलांचा मोदींच्या फसव्या आश्वासनामुळे गैरसमज दूर झाला असून विधानसभा निवडणुकीत बचत गटाच्या महिला मोदींच्या या फसव्या आश्वासनांना थारा देणार नाही, भाजपची ही पैशाची जादू आता चालणार नाही, असेही शिवाजीराव मोघे यांनी सांगितले. मोदींच्या या फसव्या आश्वासनांचा आगामी विधाससभा निवडणुकीत भाजपच्या आमदारांना गावागावात मोठा फटका बसण्याची शक्यताही अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी वर्तविली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी