शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान म्हणतात मुलींना संधी, प्रशासनाच्या पत्रात मात्र बंदी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 11:28 IST

Yawatmal News महाराष्ट्रासह देशभरात सध्या सैनिकी शाळांच्या सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत प्रशासनाने मुलींना प्रवेश स्पष्टपणे नाकारला आहे. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

 

अविनाश साबापुरे

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : देशाच्या विकासात महिलांना समान संधी देण्यात येईल. त्यामुळे यापुढे सैनिकी शाळांमध्ये मुलींनाही प्रवेश दिला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केली. प्रत्यक्षात महाराष्ट्रासह देशभरात सध्या सैनिकी शाळांच्या सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत प्रशासनाने मुलींना प्रवेश स्पष्टपणे नाकारला आहे. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.   (Girls ban in Military schools)

डेहरादून येथील राष्ट्रीय इंडियन मिलीटरी कॉलेज या शासकीय संस्थेत इयत्ता आठवीपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी कॉलेजच्या कमांडंन्टनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला पत्र पाठवून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबाबत अवगत करण्याची सूचना केली आहे; परंतु या पत्रात मुलींना प्रवेश देणार नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यानुसार, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी महाराष्ट्रातील शिक्षण विभागासह अन्य संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतचे पत्र पाठविले आहे. देशात २८ सैनिकी शाळा आहेत. त्या सर्व ठिकाणी मुलींना प्रवेश दिला जात नाही. आता इयत्ता आठवीपासून केवळ मुलांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. त्यासाठी १८ डिसेंबर रोजी पुणे येथे प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. सातव्या वर्गात शिकणारे विद्यार्थी त्यासाठी पात्र असून, त्यांना ३० ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. एकीकडे ही प्रक्रिया सुरू असतानाच स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश देणार असल्याचे घोषित केले. त्यामुळे शासनाच्या लेखी सैनिकी शाळांमध्ये मुलींना संधी, तर प्रशासनाच्या लेखी मात्र बंदी, असे विराेधाभासी चित्र निर्माण झाले आहे.

मिलीटरी कॉलेज घोषणेचा सन्मान राखणार का?

पंतप्रधानांचे भाषण आधीच तयार झालेले असते; मात्र हे भाषण तयार करताना सैनिकी शाळांच्या सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेचा पंतप्रधान कार्यालयाने आढावा घेतला नसेल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेचा सन्मान राखून सैनिकी शाळांनी आपली प्रवेश प्रक्रिया थांबवून त्यात मुलींच्या प्रवेशाबाबत सुधारणा का केली नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मिलीटरी कॉलेज पंतप्रधानांच्या घोषणेचा सन्मान राखणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सैनिकी शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात मुलींना प्रवेश नाही. पंतप्रधानांच्या घोषणेनुसार त्यात बदल करायचा म्हटले तरी तो तत्काळ शक्य होईल, असे वाटत नाही. कदाचित हा बदल पुढील सत्रापासून होईल, असे वाटते.

- डॉ. तुकाराम सुपे

आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र