शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान म्हणतात मुलींना संधी, प्रशासनाच्या पत्रात मात्र बंदी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 11:28 IST

Yawatmal News महाराष्ट्रासह देशभरात सध्या सैनिकी शाळांच्या सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत प्रशासनाने मुलींना प्रवेश स्पष्टपणे नाकारला आहे. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

 

अविनाश साबापुरे

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : देशाच्या विकासात महिलांना समान संधी देण्यात येईल. त्यामुळे यापुढे सैनिकी शाळांमध्ये मुलींनाही प्रवेश दिला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केली. प्रत्यक्षात महाराष्ट्रासह देशभरात सध्या सैनिकी शाळांच्या सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत प्रशासनाने मुलींना प्रवेश स्पष्टपणे नाकारला आहे. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.   (Girls ban in Military schools)

डेहरादून येथील राष्ट्रीय इंडियन मिलीटरी कॉलेज या शासकीय संस्थेत इयत्ता आठवीपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी कॉलेजच्या कमांडंन्टनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला पत्र पाठवून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबाबत अवगत करण्याची सूचना केली आहे; परंतु या पत्रात मुलींना प्रवेश देणार नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. त्यानुसार, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी महाराष्ट्रातील शिक्षण विभागासह अन्य संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतचे पत्र पाठविले आहे. देशात २८ सैनिकी शाळा आहेत. त्या सर्व ठिकाणी मुलींना प्रवेश दिला जात नाही. आता इयत्ता आठवीपासून केवळ मुलांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे. त्यासाठी १८ डिसेंबर रोजी पुणे येथे प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. सातव्या वर्गात शिकणारे विद्यार्थी त्यासाठी पात्र असून, त्यांना ३० ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. एकीकडे ही प्रक्रिया सुरू असतानाच स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकी शाळांमध्ये मुलींना प्रवेश देणार असल्याचे घोषित केले. त्यामुळे शासनाच्या लेखी सैनिकी शाळांमध्ये मुलींना संधी, तर प्रशासनाच्या लेखी मात्र बंदी, असे विराेधाभासी चित्र निर्माण झाले आहे.

मिलीटरी कॉलेज घोषणेचा सन्मान राखणार का?

पंतप्रधानांचे भाषण आधीच तयार झालेले असते; मात्र हे भाषण तयार करताना सैनिकी शाळांच्या सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेचा पंतप्रधान कार्यालयाने आढावा घेतला नसेल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेचा सन्मान राखून सैनिकी शाळांनी आपली प्रवेश प्रक्रिया थांबवून त्यात मुलींच्या प्रवेशाबाबत सुधारणा का केली नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. मिलीटरी कॉलेज पंतप्रधानांच्या घोषणेचा सन्मान राखणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सैनिकी शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात मुलींना प्रवेश नाही. पंतप्रधानांच्या घोषणेनुसार त्यात बदल करायचा म्हटले तरी तो तत्काळ शक्य होईल, असे वाटत नाही. कदाचित हा बदल पुढील सत्रापासून होईल, असे वाटते.

- डॉ. तुकाराम सुपे

आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र