शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या कामास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:39 IST

यासंदर्भात संघाच्यावतीने राज्याचे मुख्य सचिव तसेच सर्व संबंधितांना पत्र पाठविण्यात आले आहे. तलाठी संवर्गाकडून तालुकास्तरीय पीएम किसान योजनेची अंमलबजावणी ...

यासंदर्भात संघाच्यावतीने राज्याचे मुख्य सचिव तसेच सर्व संबंधितांना पत्र पाठविण्यात आले आहे.

तलाठी संवर्गाकडून तालुकास्तरीय पीएम किसान योजनेची अंमलबजावणी प्रमुखांनी करून घेतली. हे काम करून घेत असताना तलाठी संवर्गावर दबावतंत्राचा वापर करण्यात आला. त्याउपरही सामाजिक उत्तरदायित्व म्हणून तलाठी संवर्गाने हे काम पूर्णत्वास नेऊन जवळपास १०० टक्के शेतकऱ्यांना लाभ देण्याकरिता अहोरात्र मेहनत घेऊन प्रामाणिक प्रयत्न केले. त्याचीच फलश्रुती म्हणून सदर योजनेची प्रभावी व यशस्वी अंमलजावणी झाली. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाला केंद्र सरकारने सन्मानित केले; परंतु ही योजना यशस्वी होण्यासाठी प्रत्यक्षात काम करणाऱ्या महसूल विभागातील तलाठी ते जिल्हाधिकारी यांचा कुठेही साधा उल्लेखसुद्धा केल्याचे दिसत नाही.

ही बाब दुर्दैवी असून राज्यातील महसूल विभागाचे मनोबल खच्चीकरण करणारी आहे. त्याचा प्रशासनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या योजनेचे जवळपास ९५ टक्के काम तलाठी संवर्गाने पूर्णत्वास नेले आहे. राज्यातील तलाठी संवर्गाच्या तीव्र भावनांचा विचार करता या योजनेचे काम हे गैरमहसुली असल्याने यापुढील पीएम किसान योजनेचे संपूर्ण काम नम्रपणे नाकारत असल्याचे विदर्भ पटवारी संघ नागपूरचे केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्ण गाढवे व सरचिटणीस संजय अनव्हाने यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.