शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या सोन्यात शेतकऱ्यांची लूट

By admin | Updated: January 12, 2015 23:00 IST

निसर्गाचा लहरीपणा आणि नापिकीमुळे हवालदिल झालेल्या बळीराजाला आता कापूस खरेदीतही नागविले जात आहे. दलालांनी कापूस खरेदीवर चांगलीच पकड घेत काहींनी त्यांचा कापूस चक्क आपल्या

वणी : निसर्गाचा लहरीपणा आणि नापिकीमुळे हवालदिल झालेल्या बळीराजाला आता कापूस खरेदीतही नागविले जात आहे. दलालांनी कापूस खरेदीवर चांगलीच पकड घेत काहींनी त्यांचा कापूस चक्क आपल्या नावे टाकण्यास सुरूवात केल्याची माहिती आहे. यात एकाच्याच नावे शेकडो क्विंटल कापूस चक्क सीसीआयला विकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.यावर्षी नापिकीमुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कापूस आणि सोयाबिनच्या उताऱ्यात प्रचंड घट आली आहे. एकरी उत्पादन चांगलेच घटले आहे. त्यामुळे बळीराजा त्रस्त आहे. कापसाचे उत्पादन घटल्याने त्यांच्यासमोर कुटुंबाचा गाडा हाकणे आणि पुढील वर्षीचा प्र्रपंच सांभाळण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यात आता कापूस विक्रीतही त्यांची नाडवणूक होत आहे. कापूस खरेदीत दलालांनी हैदोस घातल्याने शेतकरी नागविले जात आहेत. आता कपाशी उलंगण्याच्या मार्गावर आहे. आत्तापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवला होता. काहींनी घरखर्च व इतर देणी देण्यासाठी कापूस विकला होता. तथापि बहुतांश कापूस साठवून होता. बँकेचे कर्ज आणि इतर देणी फेडण्यासाठी आता शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीस काढला आहे. शेतकरी बैलबंडी अथवा इतर वाहनाने कापूस भरून वणीकडे येतात. या बैलबंडी आणि वाहनांना काही दलाल रस्त्यातच गाठतात. त्यांना अमुक व्यापाऱ्याकडे कापूस विक्रीसाठी नेण्याचा आग्रह धरतात. संबंधित व्यापाऱ्यांशी त्यांचे ‘साटेलोटे’ असते. शेतकरी संबंधीत व्यापाऱ्याकडे गेल्यानंतर कापसाचा दर ठरतो. वणीत सध्या तीन हजार ९00 रूपयांच्यावरच प्रती क्विंटलचे दर आहे. मात्र चुकारा नगदी हवा असल्यास जादा दर देण्याचे आमिष शेतकऱ्यांना दाखविले जाते. याच आमिषाला शेतकरी फसतात. जादा दराच्या आमिषाने ते कापूस विकतात. मात्र संबंधित काही दलाल लगेच त्या शेतकऱ्याच्या कापसाचा परस्पर चुकारा उचलून तो आपल्याजवळ ठेवतात. आठ ते १५ दिवस हा चुकारा वापरून नंतर पैसे शेतकऱ्याला देण्यात येते. त्यातून दलाली कापण्यास मात्र ते विसरत नाहीत. वणीत सीसीआयची कापूस खरेदी सुरू आहे. सीसीआय थेट शेतकऱ्यांकडून कापूस घेते. कापसाचा धनादेश शेतकऱ्याच्या हाती देण्यात येतो. मात्र दलाल मधातच शेतकऱ्यांना गाठून त्यांना नगदी चुकारा, जादा दर आदींच्या आमिषात भूलवून ठेवतात. त्यात बळीराजा फसतो. काही दलाल तर चक्क आपल्याच नावे सीसीआयकडून धनादेश घेत असल्याचीही चर्चा आहे. सीसीआयला व्यापाऱ्यांनीच जादा कापूस विकला असावा, असा कयास वर्तविण्यात येत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)