शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

खते-बियाण्यात शेतकऱ्यांची लूट

By admin | Updated: June 25, 2015 02:34 IST

वणी तालुक्यातील काही ठिकाणच्या कृषी केंद्र चालकांकडून खताची चढ्या भावाने विक्री सुरू आहे.

नांदेपेरा : वणी तालुक्यातील काही ठिकाणच्या कृषी केंद्र चालकांकडून खताची चढ्या भावाने विक्री सुरू आहे. यात शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात आहे. याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे. कृषी केंद्र चालक मनमानीने किंमती आकारून खत, बियाण्यांची विक्री करीत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला मात्र चुना लागत आहे.यावर्षी मृग नक्षत्राचा पाऊस पेरणीयोग्य झाल्याने शेतकऱ्यांनी कापसू, तूर लागवडीसह सोयाबीन, ज्वारी आदी पिकांची आता पेरणी केली आहे. जवळपास ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. सोयाबिनची पेरणी पूर्णत्वास जात आहे. मृग नक्षत्रात पडलेला पाऊस खरीप पिकाला जादा उपयुक्त समजला जातो. त्यामुळे मिळेल त्या भावाने बियाणे, खते घेण्याची शेतकऱ्यांची तयारी असते. त्याचाच लाभ घेत तालुक्यातील काही कृषी केंद्र चालक मागणी असलेल्या कपाशी बियाणांच्या एका पाकिटामागे १०० ते १५० रूपये जादा आकारून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत आहे. वणी तालुक्यात काही नामांकित कृषी केंद्र चालकांनी रासायनिक खताच्या गोदामामध्ये अवैध साठा करून ठेवला आहे. खत उपलब्ध असूनसुद्धा खताचा तुटवडा दाखविला जात आहे. खते उपलब्ध नाही, असे सांगून शेतकऱ्यांकडून १०० ते २०० रूपये चढ्या भावाने आकारून खताची विक्री सुरू केली आहे. काही कृषी दुकानदारांचे कृषी अधिकऱ्यांसोबत ‘मधुर‘ संबंध असल्याची चर्चा आहे. मोठे कृषी दुकानदार सोडून लहान कृषी दुकानदारांची कृषी विभागाकडून चौकशी केली जाते. मात्र नामांकित कृषी केंद्र चालकांच्या दुकानाची व गोदामाची चौकशी कृषी अधिकाऱ्यांकडून केली जात नाही, असा आरोप छोटे कृषी केंद्र चालकच करीत आहे. ज्या बियाण्यांना कृषी केंद्रात विक्री करायची परवानगी नाही, असेही बियाणे दुकानदारांकडून विक्री केले जात असल्याचा संशय आहे. अनेक कृषी केंद्रांमध्ये दर फलक, स्टॉकबुकही उपलब्ध नसते. सध्या युरिया खताचा तुटवडा असल्याचे कृषी केंद्र चालक सांगत सुटले आहे. वणी तालुक्यात दरवर्षी खताचा तुटवडा भासतो. मात्र यावर्षी पिंपळखुटी येथे खताचा रॅक पॉर्इंट सुरू झाल्याने शेतकरी समाधानी होते. केंद्रीय रसायन व खत राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या रॅक पॉर्इंटमुळे शेतकऱ्यांना खते भरपूर प्रमाणात व कमी किंमतीमध्ये मिळतील, असे सांगितले होते. तथापि जवळ खताचा रॅक पॉर्इंट होऊनसुद्धा खताच्या किंमती कमी झाल्या नाही, तुटवडाही कमी झाला नाही. शासनाने प्रत्येक कपाशीच्या बीटी बियाण्याच्या पाकिटच्या किंमतीमागे १०० रूपये कमी केले. मात्र काही कृषी केंद्र चालक अजूनही चढ्या भावाने बियाण्यांची विक्री करीत आहे व शेतकऱ्यांना कच्चे बिल देण्यात येत आहे. सध्या फुली बाद टोबणीसाठी शेतकरी कपाशीचीे बियाणे खरेदी करीत आहेत. मात्र त्यांची जादा भावामुळे फसगत होत आहे. त्यातच अनेक शेतकरी उधारीवर बियाणे, खते घेत असल्याने त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करीत चढ्या दराने बियाणे, खते विकत घ्यावे लागत आहे. (वार्ताहर)