शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पूरबाधित २२ गावांतील नागरिकांना भूखंड

By admin | Updated: July 23, 2014 23:50 IST

जिल्ह्यातील काही गावांना दरवर्षी पावसाळ्यात पुराचा फटका बसतो. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की, नदी काठांवरील या गावांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होते. अशा २२ गावातील नागरिकांना

यवतमाळ : जिल्ह्यातील काही गावांना दरवर्षी पावसाळ्यात पुराचा फटका बसतो. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की, नदी काठांवरील या गावांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होते. अशा २२ गावातील नागरिकांना दुसरीकडे आपले घर उभे करण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पुनर्वसन समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यातील अन्य प्रलंबित आणि जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचे प्रश्न या बैठकीत निकाली काढण्यात आले. प्रत्येक मंगळवारी पुनर्वसन उपसमितीची बैठक होते. या मंगळवारी झालेल्या बैठकीत अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या २२ गावांबाबत निर्णय घेण्यात आला. या गावांना घरासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात येऊन त्यावर भूखंड पाडण्यात येऊन ते सबंधितांना देण्यात येईल. गेल्यावर्षी उन्हाळयात ठिकठिकाणी पाणीटंचाई निवारणार्थ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते. परंतु अधिग्रहणाचा मोबदला सबंधित विहिर मालकांना काही उपविभागीय अधिकाऱ्यांच्या द्यायचा राहुन गेला होता. अशा विहिर अधिग्रहणाचा मोबदला देण्याचा निर्णय झाला असून हा निधी संबंधितांना लवकरच दिला जाईल. टिपेश्वर अभयारण्यामुळे पुनर्वसन झालेल्या मारेगाव वन या गावाच्या पुनर्वसनासाठी आवश्यक निधी प्रशासनाच्या वतीने वारंवार शासनास मागण्यात आला होता. निधीअभावी सबंधित गावातील नागरिकांना देय रक्कम व पुनर्वसित गावांची विकासाची कामे रखडली होती. तांत्रिक बाबींमध्ये यासाठी आदिवासी विकास विभाग निधी देऊ शकत नव्हता. त्यासाठी विशेष बाब म्हणून या बैठकीत १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. यामुळे पुनर्वसनाची उर्वरित कामे तातडीने होणार आहेत. गेल्या काही वर्षात सतत झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानापोटी बाधितांना देय असलेली ३२ कोटीची रक्कम गेल्या बैठकीत मंजूर झाली होती. ती रक्कम वित्त विभागाने ताबडतोब उपलब्ध करून द्यावी, असा निर्णयही या बैठकीत झाला. पूरबाधित २२ गावांचा निर्णय, मारेगाव वन व टिपेश्वर या गावांसाठी निधी, अतिवृष्टीची प्रलंबित रक्कम तसेच विहिर अधिग्रहणाचा मोबदला या गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित बाबी या बैठकीत निकाली निघाल्याने जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात अजुनही पाणीटंचाईची स्थिती आहे. शासनाने टंचाई आराखडा ३० जुलैपर्यंत राबविण्यास मुदतवाढ दिली होती. उप समितीने ही मुदत आणखी वाढविण्याची शिफारस कॅबिनेटला केली असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. या बैठकीला सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे व सबंधित सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)