शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६५ करण्याचा घाट; १५०० नवे विद्यार्थी वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 20:55 IST

Yawatmal News दीर्घ अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना होईल, अशी बाजू मांडत कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६५ करण्याचा घाट घातला जात आहे.

 

विलास गावंडे

यवतमाळ : दीर्घ अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना होईल, अशी बाजू मांडत कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६५ करण्याचा घाट घातला जात आहे. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास कृषी शाखेतून प्राध्यापक पदासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना आणखी काही वर्षे नोकरीपासून दूर राहावे लागणार आहे.

महाराष्ट्रातील १३६ कृषी महाविद्यालयांमध्ये आज १,५००हून अधिक प्राध्यापक कार्यरत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीचे वय सध्या ६२ वर्षे आहे. पहिल्यांदा निवृत्तीचे वय वाढवून ६० करण्यात आले. त्यानंतर ६२ आणि आता ६५ करण्याची तयारी केली जात आहे. या प्राध्यापकांचे वय वाढविणे म्हणजे नवीन लोकांना संधीपासून दूर ठेवणे आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.

सरकारच्या धोरणामुळे प्राध्यापकाची नोकरी मिळण्याच्या आशेवर पाणी फेरले जात आहे. कार्यरत प्राध्यापकांमधून अनेकांच्या निवृत्तीचा काळ जवळ आला आहे. तत्पूर्वी निवृत्तीचे वय वाढवून घेण्यासाठी संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वारंवार वाढविण्यात सरकारला काय स्वारस्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विद्यापीठात ६० टक्के जागा रिक्त

कृषी विद्यापीठाच्या शिक्षणाचा गाडा केवळ ४० टक्के प्राध्यापक हाकत आहेत. मागील सात ते आठ वर्षांपासून शासनाने शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांची पदभरतीच केली नाही. एकीकडे नव्याने भरती नाही, तर दुसरीकडे जुन्याच लोकांना संधी दिली जात आहे. हा प्रकार बेरोजगारांमध्ये नैराश्य निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहे.

प्रस्थापित शिक्षकांचा सेवाकाळ वाढविण्याच्या हट्टापायी हजारो उच्चशिक्षित कृषी पदवीधर बेरोजगार राहात आहेत. प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय वाढविल्यास आंदोलन केले जाईल. शासनाने रिक्त पदांच्या भरतीला तातडीने मंजुरी दिल्यास कृषी पदवीधरांना रोजगार संधी उपलब्ध होईल.

- प्रणव टोम्पे, अध्यक्ष, पदवीधर संघटना

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र