शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६५ करण्याचा घाट; १५०० नवे विद्यार्थी वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 20:55 IST

Yawatmal News दीर्घ अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना होईल, अशी बाजू मांडत कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६५ करण्याचा घाट घातला जात आहे.

 

विलास गावंडे

यवतमाळ : दीर्घ अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना होईल, अशी बाजू मांडत कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६५ करण्याचा घाट घातला जात आहे. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास कृषी शाखेतून प्राध्यापक पदासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना आणखी काही वर्षे नोकरीपासून दूर राहावे लागणार आहे.

महाराष्ट्रातील १३६ कृषी महाविद्यालयांमध्ये आज १,५००हून अधिक प्राध्यापक कार्यरत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीचे वय सध्या ६२ वर्षे आहे. पहिल्यांदा निवृत्तीचे वय वाढवून ६० करण्यात आले. त्यानंतर ६२ आणि आता ६५ करण्याची तयारी केली जात आहे. या प्राध्यापकांचे वय वाढविणे म्हणजे नवीन लोकांना संधीपासून दूर ठेवणे आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.

सरकारच्या धोरणामुळे प्राध्यापकाची नोकरी मिळण्याच्या आशेवर पाणी फेरले जात आहे. कार्यरत प्राध्यापकांमधून अनेकांच्या निवृत्तीचा काळ जवळ आला आहे. तत्पूर्वी निवृत्तीचे वय वाढवून घेण्यासाठी संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वारंवार वाढविण्यात सरकारला काय स्वारस्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विद्यापीठात ६० टक्के जागा रिक्त

कृषी विद्यापीठाच्या शिक्षणाचा गाडा केवळ ४० टक्के प्राध्यापक हाकत आहेत. मागील सात ते आठ वर्षांपासून शासनाने शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांची पदभरतीच केली नाही. एकीकडे नव्याने भरती नाही, तर दुसरीकडे जुन्याच लोकांना संधी दिली जात आहे. हा प्रकार बेरोजगारांमध्ये नैराश्य निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहे.

प्रस्थापित शिक्षकांचा सेवाकाळ वाढविण्याच्या हट्टापायी हजारो उच्चशिक्षित कृषी पदवीधर बेरोजगार राहात आहेत. प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय वाढविल्यास आंदोलन केले जाईल. शासनाने रिक्त पदांच्या भरतीला तातडीने मंजुरी दिल्यास कृषी पदवीधरांना रोजगार संधी उपलब्ध होईल.

- प्रणव टोम्पे, अध्यक्ष, पदवीधर संघटना

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र