शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६५ करण्याचा घाट; १५०० नवे विद्यार्थी वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 20:55 IST

Yawatmal News दीर्घ अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना होईल, अशी बाजू मांडत कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६५ करण्याचा घाट घातला जात आहे.

 

विलास गावंडे

यवतमाळ : दीर्घ अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना होईल, अशी बाजू मांडत कृषी विद्यापीठातील प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६५ करण्याचा घाट घातला जात आहे. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास कृषी शाखेतून प्राध्यापक पदासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना आणखी काही वर्षे नोकरीपासून दूर राहावे लागणार आहे.

महाराष्ट्रातील १३६ कृषी महाविद्यालयांमध्ये आज १,५००हून अधिक प्राध्यापक कार्यरत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीचे वय सध्या ६२ वर्षे आहे. पहिल्यांदा निवृत्तीचे वय वाढवून ६० करण्यात आले. त्यानंतर ६२ आणि आता ६५ करण्याची तयारी केली जात आहे. या प्राध्यापकांचे वय वाढविणे म्हणजे नवीन लोकांना संधीपासून दूर ठेवणे आहे, अशी भावना व्यक्त होत आहे.

सरकारच्या धोरणामुळे प्राध्यापकाची नोकरी मिळण्याच्या आशेवर पाणी फेरले जात आहे. कार्यरत प्राध्यापकांमधून अनेकांच्या निवृत्तीचा काळ जवळ आला आहे. तत्पूर्वी निवृत्तीचे वय वाढवून घेण्यासाठी संघटनांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू झाले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वारंवार वाढविण्यात सरकारला काय स्वारस्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विद्यापीठात ६० टक्के जागा रिक्त

कृषी विद्यापीठाच्या शिक्षणाचा गाडा केवळ ४० टक्के प्राध्यापक हाकत आहेत. मागील सात ते आठ वर्षांपासून शासनाने शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांची पदभरतीच केली नाही. एकीकडे नव्याने भरती नाही, तर दुसरीकडे जुन्याच लोकांना संधी दिली जात आहे. हा प्रकार बेरोजगारांमध्ये नैराश्य निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहे.

प्रस्थापित शिक्षकांचा सेवाकाळ वाढविण्याच्या हट्टापायी हजारो उच्चशिक्षित कृषी पदवीधर बेरोजगार राहात आहेत. प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय वाढविल्यास आंदोलन केले जाईल. शासनाने रिक्त पदांच्या भरतीला तातडीने मंजुरी दिल्यास कृषी पदवीधरांना रोजगार संधी उपलब्ध होईल.

- प्रणव टोम्पे, अध्यक्ष, पदवीधर संघटना

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र