शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

नियोजन लाखांचे, उपाययोजना शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:00 IST

अर्थसंकल्पातील ही आकडेवारी अनेकांना सुखावणारी आहे. प्रत्यक्षात नगरपालिकेचे काम पाहिले तर निर्धारित निधी खर्च झाला किंवा नाही, अशी शंका नक्कीच उपस्थित होते. सध्या शहरातील कुठल्याही भागात गेले तरी नाल्या तुंबलेल्या दिसतात. मुख्यत: शहरातील प्रमुख नाल्यांकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष झाले. या नाल्यांमध्ये प्रचंड कचरा साचला आहे. हा कचरा पुलाच्या तोंडावर जाऊन फसला आहे.

ठळक मुद्देमान्सूनपूर्व कामाला मुहूर्तच नाही : नगरपरिषदेचा ढिम्म कारभार, यवतमाळकरांना संकटाचा सामना करावा लागणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपालिकेने पावसापूर्वीचे नियोजन करण्यासाठी लाखोंची तरतूद केली आहे. असे असले तरी प्रत्यक्षात पावसाळ्यापूर्वी हाती घेतली जाणारी कामे शहरात झाली नाही. थातूरमातूर कामांमुळे यवतमाळकर संकटात सापडणार आहे.यवतमाळ नगरपरिषदेने २०२०-२१ या वर्षाकरिता अडीचशे कोटी रुपयांचे बजेट अर्थसंकल्पात सादर केले. या बजेटमध्ये ६६ लाख रुपयांचे नियोजन विविध उपाययोजनांवर दाखविण्यात आले.त्यामध्ये प्रामुख्याने शहरातील मोठे नाले सफाई करण्यासाठी २० लाख रुपयांचे बजेट आहे. काटेरी झाडे झुडूपे तोडण्यासाठी सहा लाख रुपयांचे नियोजन आहे. मोकाट जनावरांना पकडण्यासाठी १० लाख रुपयांचे बजेट आहे तर घनकचरा विल्हेवाट लावण्यासाठी ३० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.अर्थसंकल्पातील ही आकडेवारी अनेकांना सुखावणारी आहे. प्रत्यक्षात नगरपालिकेचे काम पाहिले तर निर्धारित निधी खर्च झाला किंवा नाही, अशी शंका नक्कीच उपस्थित होते. सध्या शहरातील कुठल्याही भागात गेले तरी नाल्या तुंबलेल्या दिसतात. मुख्यत: शहरातील प्रमुख नाल्यांकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष झाले. या नाल्यांमध्ये प्रचंड कचरा साचला आहे. हा कचरा पुलाच्या तोंडावर जाऊन फसला आहे. त्यामध्ये थर्माकॉल, प्लॅस्टिकच्या बॉटल आणि इतर घाण साचली आहे. पाऊस आला तर संपूर्ण पाणी पुलाजवळ अडणार आहे. यातून खोलगट वस्त्यांमध्ये पाणी शिरुन हाहाकार उडण्याची शक्यता आहे.साध्या नागरिकांना हा कचरा डोळ्याने दिसतो आहे. नगरपालिकेच्या नजरेत हा कचरा का येत नसेल हा खरा प्रश्न आहे. काही भागामध्ये तर मोठ्या नाल्यांमध्ये कचऱ्याचे डोंगर उभे केले आहे. हा भला मोठा कचरा नाल्यांमध्ये ठेवणे कितपत योग्य आहे असा प्रश्न या ठिकाणावरुन जाणाºया प्रत्येकांनाच पडतो. मागासवस्त्यांमध्ये हे चित्र पावसाळ्यापूर्वीचे आहे.जून महिन्याला प्रारंभ होऊन आठवडा झाला. यानंतरही नगरपालिकेची यंत्रणा जागेवरुन हलायला तयार नाही. काही भागात नावापुरते जेसीबी यंत्र फिरले. थोडा कचरा काढला, पुन्हा दोन दिवसांनी स्थिती जैसे थे अशीच झाली. अनेक नाल्यांमध्ये झाडे झुडूपे वाढली आहे. काही नाल्यातील पाणी तर वर्षभर रस्त्यावरून वाहत आहे. मग सफाई करणारे कर्मचारी नेमके काम कुठे करतात हा खरा प्रश्न आहे. आता पावसाळ्याच्या तोंडावर शहरात विविध भागात पाणी तुंबून पूरपरिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. नगरपरिषद प्रशासन यानंतरही लक्ष देत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.पालिकेत चालले तरी काय ?प्रभागांमध्ये कुठलाही प्रश्न निर्माण झाल्यावर नागरिक नगरसेवकांकडे जातात. यावेळी आम्हाला सफाई कामगार मिळत नाही, मुख्याधिकाऱ्यांकडूनही सहकार्य मिळत नसल्याचे नगरसेवक सांगतात. तर मुख्याधिकारी आपण सर्वांनाच मदत करतो असे म्हणतात. नगराध्यक्षांची धडपड आहे पण प्रशासनाची त्यांना तेवढी साथ मिळत नाही. या स्थितीत शहरातील नियोजन करताना अनेक ठिकाणी गोंधळ निर्माण होतो.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका